शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आई, उद्या सकाळी मला लवकर उठव, तरुणीची विनंती; पण काही तासांतच जीवन संपवल्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 15:35 IST

दुसऱ्या दिवशी तिला उठवण्यासाठी आईने फोन केल्यानंतर प्रियंकाने फोन उचलला नाही. त्यामुळे आई-वडिलांनी आयआयटी प्रशासनाला याबाबत सांगितलं.

कानपूरमधील हॉस्टेलमध्ये आयआयटीमधील पीएचडीची विद्यार्थिनी असलेल्या तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्रियंका जयस्वाल असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव असून तिने टोकाचं पाऊल उचलल्याने कुटुंबियांना धक्का बसला आहे. मात्र प्रियंकाने हे धक्कादायक पाऊल उचलण्याच्या काही तास आधीच आपल्या कुटुंबीयांशी फोनवरून संवाद साधला होता. यावेळी तिने मला उद्या सकाळी फोन करून लवकर झोपेतून उठव, अशी विनंतीही आपल्या आईला केली होती. असं असताना काही तासांत असं नेमकं काय झालं की प्रियंकाला आपला जीव नकोसा झाला, याबाबत गूढ निर्माण झालं आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रियंकाने मद्रास इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथून एमटेकचं शिक्षण घेतलं होतं. यामध्ये ती चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याने तिला आयआयटीमध्ये प्रवेश मिळाला होता. त्यानंतर ती जोमाने अभ्यासही करत होती. मात्र आता तिने थेट जीवन संपवण्याचा निर्णय घेतल्याने खळबळ उडाली आहे.

फोनवर आई-वडिलांशी काय बोलणं झालं होतं?

बुधवारी रात्री प्रियंका अगदी मनमोकळेपणाने आपल्या आई-वडिलांशी बोलली होती. तसंच झोपेतून उठायला उशीर होत असल्याने नाश्ता करायला उशीर होतो, त्यामुळे उद्या सकाळी ७ वाजता मला फोन करून उठव, असंही तिने आपल्या आईला सांगितलं होतं. दुसऱ्या दिवशी तिला उठवण्यासाठी आईने फोन केल्यानंतर प्रियंकाने फोन उचलला नाही. त्यामुळे आई-वडिलांनी आयआयटी प्रशासनाला याबाबत सांगितलं. आयआयटी प्रशासनाने चौकशी केली असता त्यांना प्रियंका मृतावस्थेत आढळून आली. 

दरम्यान, प्रियंकाने गळफास घेण्यासाठी ऑनलाइन दोन दोऱ्या मागवल्या होत्या, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. मात्र तिने कोणत्या कारणातून आत्महत्या केली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 

टॅग्स :Kanpur IITकानपूर आयआयटीUttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी