शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

घरातून पळून गेलेल्या मुलीला समजली प्रियकराच्या पगाराची रक्कम, ऐनवेळी लग्नास दिला नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 19:29 IST

दोघांनाही धौलपूर रेल्वे स्टेशनवर चाइल्ड लाइनने आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं आणि दोघांनाही बाल कल्याण समितीकडे सोपवलं.

एक अल्पवयीन मुलगा आणि मुलीची फेसबुकवर मैत्री झाली आणि दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. मुलगी प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी आग्र्याहून धौलपूरला गेली. मुलगी १६ वर्षांची आणि मुलगा १७ वर्षांचा. दोघांनाही धौलपूर रेल्वे स्टेशनवर चाइल्ड लाइनने आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं आणि दोघांनाही बाल कल्याण समितीकडे सोपवलं. दोघांनाही घरातून पळून येण्याचं कारण विचारलं तर त्यांनी सांगितलं की, दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे आणि त्यांना लग्न करायचं आहे.

बाल कल्याण समितीने दोघांच्या आई-वडिलांना याबाबत माहिती दिली आहे. यादरम्यान दोघांचीही काउन्सेलिंग करण्यात आली. जेव्हा मुलीला समजलं की तिच्या प्रियकराकडे केवळ १४०० रूपये आहेत. इतक्या पैशात काहीच होणार नाही हे तिच्या लक्षात येताच मुलीने प्रियकरासोबत लग्नास नकार दिला. त्यानंतर बाल कल्याण समितीने मुलाला कोविड सेंटरमध्ये तर मुलीला चाइल्ड लाइनमध्ये पाठवलं. (हे पण वाचा : फूस लावून पळवून नेलेल्या युवतीचा लावला शोध)

कल्याण समितीचे सदस्य गिरीश गुर्जर यांनी सांगितलं की, अल्पवयीन मुलगी आग्र्याची राहणारी आहे आणि मुलगा राजस्थानच्या धौलपूरचा आहे. दोघांची ओळख फेसबुकच्या माध्यमातून झाली होती. दोघांनाही लग्न करायचं होतं. त्यासाठी मुलगी पळून धौलपूरला आली होती. जेव्हा मुलीने प्रियकराला पगार किती आहे विचारलं त्याने १४०० रूपये सांगितले. यानंतर मुलीने त्याच्यासोबत लग्नास नकार दिला.

मुलीच्या परिवाराला याबाबत माहिती देण्यात आली आहे आणि त्यांना तिला नेण्यासाठी धौलपूरला बोलण्यात आलंय. सध्या मुलीला चाइल्ड लाइनमध्ये पाठवण्यात आलं आहे. समितीच्या सदस्यांनी सांगितलं की, मुलीच्या घरचे लोक आल्यावर मुलीचं हित लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थानUttar Pradeshउत्तर प्रदेश