शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

"साहब को परेशानी ना हो इसलिए?"; सुशांत आत्महत्या प्रकरणात कंगनाने थेट आदित्य ठाकरेंनाच ओढलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 17:41 IST

नेमकं आदित्य ठाकरे यांचे नाव या प्रकरणात कसं आलं हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, पण कंगना रणौतच्या डिजिटल टीमनं याबाबत ट्विट केले आहे.

मुंबई – अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांचा तपास सुरु आहे, आतापर्यंत अनेक कलाकार आणि निर्मात्यांचे मुंबई पोलिसांनी जबाब नोंदवले आहेत. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीवर जोरदार टीका होऊ लागली, चाहत्यांनी यावरुन करण जोहर, सलमान खान यांना लक्ष्य केले होते.

यातच अभिनेत्री कंगना रणौत हिनेही या प्रकरणात सातत्याने आवाज उचलला आहे. याबाबत कंगना रणौतने आता ट्विट करुन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. नेमकं आदित्य ठाकरे यांचे नाव या प्रकरणात कसं आलं हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, पण कंगना रणौतच्या डिजिटल टीमनं याबाबत ट्विट केले आहे. त्यात म्हटलं आहे की, करण जोहर यांच्या मॅनेजरला समन्स पाठवण्यात आलं, पण करण जोहर यांना नाही कारण ते आदित्य ठाकरे म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा जवळचा मित्र आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी सुशांत सिंग राजपूतच्या हत्येची चेष्टा थांबवावी असा टीका कंगना रणौतने केली आहे.

याच ट्विटला जोडून कंगनानं आणखी एक ट्विट केलं आहे. कंगना रणौतच्या मॅनेजरला समन्स बजावण्यात आलं नाही, तिथे मात्र थेट कंगनाला समन्स बजावलं, मग करण जोहरच्या मॅनेजरला समन्स बजावण्यात आलं, मुंबई पोलिसांनी नेपोटिझम थांबवावा, करण जोहरला समन्स नाही कारण साहब को परेशानी ना हो इसलिये? असा आरोप तिने लावला आहे. त्यामुळे कंगनाच्या आरोपांमुळे नवा राजकीय वादही निर्माण होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सुशांत सिंग राजपूत प्रकरणात दिग्दर्शक आणि निर्माता महेश भट्ट यांना वांद्रे पोलीस ठाण्यात बोलविण्यात आले होते. महेश भट्ट यांना मुंबई पोलिसांनी पोलीस ठाण्यात हजर राहायला सांगितले होते. त्यांचा जबाब सांताक्रूझ पोलिस स्टेशनमध्ये सुमारे दोन तास नोंदविण्यात आला. येथे या प्रकरणातील तपास अधिकारी व इतर पथक त्यांच्यासमवेत उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता महेश भट्ट हे पोलीस ठाण्यातून आपल्या घराकडे परतले आहेत.

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतAaditya Thackerayआदित्य ठाकरेSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतMumbai policeमुंबई पोलीसKaran Joharकरण जोहर