शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

भांडुपमध्ये शाळेत विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 14:46 IST

गोवंडीच्या शिवाजी नगरमधील पालिकेच्या संजय नगर महापालिका उर्दू माध्यमातील शाळेत पालिकेतर्फे दिल्या जाणाऱ्या औषधातून अनेक विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती. यात चांदणी साहिल शेख या चिमुरड्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता.

मुंबई - भांडुप पश्चिमेकडील शिवाजी तलावाजवळ असलेल्या सह्याद्री विद्यामंदिर शाळेत सातवी इयत्तेत शिकणाऱ्या १६ विद्यार्थ्यांना आणि एका शिक्षिकेला खिचडीतून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. हि घटना आज  वाजताच्या सुमारास घडली असून विषबाधा झालेल्या सर्वांना अग्रवाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. सह्याद्री विद्यामंदिर शाळेत आज सकाळी 11 खिचडी विद्यार्थ्यांना देण्यात आली होती. दरम्यान खिचडी खाल्ल्यानंतर सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि एका शिक्षिकेला पोटात मळमळ आणि उलट्या होऊ लागल्या. त्यानंतर या सर्वांना अग्रवाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे अग्रवाल रुग्णालयाचे डॉक्टर उषा मोहप्रेकर यांनी सांगितले. रुग्णालयात दाखल विद्यार्थ्यांची मुलुंडचे आमदार तारा सिंग यांनी भेट घेऊन विचारपूस केली आहे. मात्र, नुकतेच गोवंडीच्या शिवाजी नगरमधील पालिकेच्या संजय नगर महापालिका उर्दू माध्यमातील शाळेत पालिकेतर्फे दिल्या जाणाऱ्या औषधातून अनेक विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती. यात चांदणी साहिल शेख या चिमुरड्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे शाळेत दिल्या जाणाऱ्या औषध आणि अन्न पदार्थ हे पालकांसाठी चिंतेचे विषय बनले आहेत. 

सकाळी 11 वाजता या शाळेतील मुलांना जेवणात डाळ आणि खिचडी देण्यात आली होती. जेवणानंतर अर्ध्या तासानं मुलांच्या पोटात दुखू लागलं, त्यांना उलट्या होऊ लागल्या. प्राथमिक माहितीनुसार, या मुलांना विषबाधा झाली असल्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाMumbaiमुंबईfood poisoningअन्नातून विषबाधाStudentविद्यार्थीSchoolशाळाhospitalहॉस्पिटल