शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

Farmers Protest : भयंकर! सिंघू सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात गोळीबार, घटनेने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 17:31 IST

Farmers Protest : काही अज्ञातांनी सिंघू बॉर्डरवर गोळीबार केल्याची भयंकर घटना घडली आहे.

नवी दिल्ली - दिल्लीमध्ये कडाक्याच्या थंडीत गेल्या कित्येक दिवसांपासून केंद्राच्या तीन नवीन कृषी कायद्यांविरूद्ध शेतकरी आंदोलन (Farmers Protest) सुरू आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्री काही अज्ञातांनी सिंघू बॉर्डरवर गोळीबार केल्याची भयंकर घटना घडली आहे. टीडीआय सिटी जवळीव लंगरमध्ये जेवणाच्या बहाण्याने कारमधून आलेल्या काही अज्ञातांनी लंगरच्या ठिकाणी गोळीबार केला आणि ते पसार झाले आहेत. कुंडली पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.

शेतकरी आंदोलनात सहभागी असलेल्या शेतकर्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदीगड येथील असणाऱ्या ऑडी कारमधून काही अज्ञात हल्लेखोर आले होते. त्यांनी लंगरमध्ये जेवणाचा आणि पाणी पिण्याचा बहाणा केला होता. त्यानंतर अज्ञातांनी घटनास्थळावरच हवाई गोळीबार केला आहे. तसेच थोड्या अंतरावर जावून तीन वेगवेगळ्या ठिकाणी हवेत गोळीबार केला आहे. शेतकरी आंदोलनात अशाप्रकरे हवाई गोळीबार होणं, एक गंभीर गोष्ट आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे. 

शेतकरी आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, रविवारी रात्री उशिरा एका वाहनातून आलेल्या काही अज्ञातांनी टीडीआय सिटीसमोरील सिंघू सीमेसमोर हवेत गोळीबार केला आहे. हरियाणा आणि पंजाबमधील शेतकऱ्यांत अंतर्गत वादाला सुरुवात करण्यासाठी हे कृत्य केलं असावं. हे कृत्य एका मोठ्या राजकीय षडयंत्राचा भाग असू शकतो. हे तरुण पंजाबमधील असल्याचं सांगण्यात येत होतं, तर त्यांनी हरियाणाच्या शेतकऱ्यांशी वाद घातला. पोलिसांनी या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्यावर कडक कारवाई केली जाईल. त्यासाठी विशेष पथकंही तयार करण्यात आली आहेत. तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा शोध घेवून तपास केला जात आहे. याप्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक केली जाईल असं म्हटलं आहे. एका हिदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

"सरकारच्या मौनातून शेतकरी आंदोलनाविरोधात मोठं पाऊल उचलण्याची तयारी", राकेश टिकैत यांचा गंभीर आरोप

भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी गंभीर आरोप केला आहे. "सरकारच्या मौनातून शेतकरी आंदोलनाविरोधात मोठं पाऊल उचलण्याची तयारी" असल्याचं म्हटलं आहे. मोदी सरकारवर संशय व्यक्त केला आहे. शेतकरी आंदोलनाविरोधात केंद्र सरकार काहीतरी करत आहे. सरकारच्या मौनातून शेतकरी आंदोलनाविरोधात लवकरच काहीतरी होणार याचे संकेत मिळत आहेत असं टिकैत यांनी म्हटलं आहे. 

"गेल्या 15-20 दिवसांपासून सरकार गप्प आहे. सरकार कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीची तयारी आहे. केंद्राचे नवीन कृषी कायदे लागू होत नाही तोपर्यंत दिल्लीतून मागे हटणार आहे. आंदोलन कधी संपवायचं या निर्णय आता केंद्र सरकारने घ्यायचा आहे. तसेच सरकारने सर्व मागण्या मान्य केल्यास शेतकरी आपल्या गावी परततील. असं झालं नाही तर शेतकरी शेतीही पाहतील आणि आंदोलनही करतील" असं देखील राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे. आंदोलक शेतकरी आणि सरकारमध्ये अनेकदा चर्चा झाली असून शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनFarmerशेतकरीFiringगोळीबारIndiaभारतPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी