शहरं
Join us  
Trending Stories
1
चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 
2
खळबळजनक! नांदेडमध्ये मशीन गनचे ३९१ राऊंड कालव्यात सापडले
3
Exit Poll : कंगना राणौत की विक्रमादित्य सिंह... कोण मारणार बाजी?; जाणून घ्या, मंडीचा एक्झिट पोल
4
दोन राज्यांत मतमोजणी, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची मुसंडी, तर सिक्कीममध्ये SKM निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने 
5
T20 WC, USA vs CAN: यजमानांचा दबदबा! १० सिक्स आणि ४ फोर; एकट्या 'जोन्स'ने कॅनडाला घाम फोडला
6
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
7
आयकर विभागाचा मोठा छापा; हवाला व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांकडून २५ कोटींची रोकड, हिरे, सोनं जप्त
8
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
9
सातवा टप्पाही पूर्ण; निकालाची प्रतीक्षा; ८,३६० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद
10
'मी केदारनाथला गेल्यावर..'; सुशांतच्या बहिणीची भावूक पोस्ट, फोटो शेअर करत सांगितलं खास कनेक्शन
11
किती खरे आणि किती खोटे ठरले यापूर्वीचे ‘एक्झिट पाेल’?, मतदानानंतर सर्वांचे असते याकडे लक्ष
12
T20 WC 2024: ऑस्ट्रेलिया नाही! पण भारत फायनल खेळणार; 'युवी'ने सांगितला खेळ भावनांचा
13
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
14
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
15
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
17
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
18
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
19
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 
20
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली

पोलीस उपअधीक्षकांच्या सतर्कतेमुळे केवळ चार तासात सापडला घर सोडून गेलेला मुलगा 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2018 8:06 PM

वसई - पालकांचा अभ्यास करण्यासाठी सतत तगाद्यामुळे वैतागून घर सोडून गेलेला अल्पवयीन मुलगा पोलीस अधिकाऱ्याच्या सतर्कतेमुळे अवघ्या ४ तासात सुखरूप घरी पोचला आहे. सौम्य सिंग (वय १२) असं या मुलाचे नाव आहे. वसईतून तो मुंबईला जाणार होता. पोलिसांना तो वेळीच सापडला नसता तर अनर्थ घडला असता. मात्र, पोलिसाच्या सतर्कतेमुळे सौम्य ...

वसई - पालकांचा अभ्यास करण्यासाठी सतत तगाद्यामुळे वैतागून घर सोडून गेलेला अल्पवयीन मुलगा पोलीस अधिकाऱ्याच्या सतर्कतेमुळे अवघ्या ४ तासात सुखरूप घरी पोचला आहे. सौम्य सिंग (वय १२) असं या मुलाचे नाव आहे. वसईतून तो मुंबईला जाणार होता. पोलिसांना तो वेळीच सापडला नसता तर अनर्थ घडला असता. मात्र, पोलिसाच्या सतर्कतेमुळे सौम्य वसई सोडण्याआधीच सापडला. 

नालासोपारा विभागाचे पोलीस उपअधीक्षक दत्ता तोटेवाड काल रात्री साडेअकराच्या सुमारास रात्रीच्या गस्तीवर होते. वसईच्या हद्दीत त्यांना एक मुलगा भेदरलेल्या अवस्थेत दिसला. तोटेवाड यांनी लगेच आपले वाहन थांबवून त्याची चौकशी केली. तेव्हा तो मुलगा काहीच सांगायला तयार नव्हता. माझे हात पाय तोडा, मारून टाका पण मी घरचा पत्ता सांगणार नाही, असे त्याने सांगितले. त्या मुलाची नाजूक मानसिक अवस्था पाहून पोलिसांनी हे प्रकरण संयमाने हाताळण्याचे ठरवले. पोलीस त्याला आपल्या गाडीतून रात्रभर फिरवून समजूत काढत होते. मात्र, तो काहीच ताकास तूर लागू देत नव्हता. दरम्यान, पोलिसांनी कुठे मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल आहे का ते तपासले. तर अशी कुठलीही तक्रार नव्हती. त्यामुळे पेच आणखीन वाढला. 

तोटेवाड यांनी समजूत काढल्यानंतर दोन तासांनी त्याने आपले नाव सौम्य सिंह (वय १२) असल्याचे सांगितले. तो नालासोपारा पश्चिमेच्या सेंट्रल पार्क येथे राहणारा होता. आई वडील सतत अभ्यासासाठी दबाब टाकत असल्याने तो वैतागला होता आणि घर सोडून निघाला होता. लोकलल ट्रेन पकडून मुंबईला जाऊन काहीतरी काम करून रहायचे असे त्याने ठरवले होते. मात्र पोलिसांना तो वेळीच सापडल्याने पुढील अनर्थ टळला. त्याच्या पालकांनी रात्री उशीरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. याबाबत बोलताना उपअधीक्षक दत्ता तोटेवाड यांनी सांगितले की, हा चांगल्या घरातील मुलगा होता. पुन्हा कधी घरी जायचे नाही या निश्चयाने तो बाहेर पडला होता त्याच्याकडे मोबाईल नव्हता की पैसे नव्हते. ट्रेनने मुंबईला गेला असता तर समाजकंटकांच्या हाती पडला असता. आणि नको ते घडले असते, वाम मार्गाला गेला असता असे त्यांनी पुढे सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस