शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

...म्हणून बिहार पोलिसांचे पथक मुंबईत धडकल्याने रियाने घेतली सुप्रीम कोर्टात धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2020 22:55 IST

याप्रकरणी बिहार पोलिसांचे पथक मुंबईत धडकले आहे. त्यामुळे रियाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली.

ठळक मुद्देमानेशिंदे यांनी अंतरिम जामीनासाठी मंगळवारीच कागदोपत्री प्रक्रिया केली होती.

मुंबई - सुशात सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात सध्या अनेक हालचाली पाहायला मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणात तपासाला वेग आला आहे. महत्त्वाचं म्हणजे सुशांतचे वडील कुंदन कुमार यांनी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला असून बिहार येथील कोर्टात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी बिहार पोलिसांचे पथक मुंबईत धडकले आहे. त्यामुळे रियाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली.

 

बिहार पोलिसांचं पथक चौकशीसाठी मुंबईत आल्याने रिया चक्रवर्तीने तपास मुंबईतच वर्ग करण्यासाठी सुप्रीम कोर्टात तातडीची याचिका केली आहे. रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी ही माहिती दिली आहे.

 

मानेशिंदे यांनी अंतरिम जामीनासाठी मंगळवारीच कागदोपत्री प्रक्रिया केली होती. सुशांतच्या वडिलांनी सात पानी एफआयआरमध्ये सुशांतच्या अकाउंटमधून १५ कोटी रुपये ट्रान्सफर केल्याची माहिती दिली होती. रिया मुद्दाम सुशांतला मानसिकरित्या आजारी असल्याचं दाखवत होते असंही सुशांतचे वडील केके सिंह यांनी सांगितले.सतीश मानेशिंदे हे देशातील सर्वात प्रसिद्ध आणि सेेेलिब्रेटींचे वकील म्हणून ओळखले जातात. सतीश मानेशिंदे हे रियाची ही केस लढणार आहेत. याआधी मानेशिंदे यांनी सलमान खान आणि संजय दत्तचा खटला लढविला होता. 

 

१९९८ मधील काळवीट शिकार प्रकरण असो की संजय दत्तची १९९३ मधील मुंबंई साखळी हल्ला असो दोघांचीही वकिली मानेशिंदे यांनी केली होती. आज रिया अंतरिम जामीनासाठी अर्ज करू शकते.

 

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSuicideआत्महत्याSupreme Courtसर्वोच्च न्यायालयadvocateवकिलRhea Chakrabortyरिया चक्रवर्ती