शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

१५ तोळे दागिन्याची बॅग पळविली; दिवसाढवळ्या सराफी दुकानात चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 15:57 IST

Robbery : मोटारसायकलीवरुन आलेल्या दोघांचे कृत्य

ठळक मुद्देयाबाबत सागर ज्वेलर्सचे मालक दत्ताजी रघुनाथ साळुखे (रा.घनश्याम नगर, सांगली) यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सांगली : माधवनगर ( ता. मिरज) येथे मोटारसायकलीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी सागर ज्वेलर्समधून १५ तोळ्याचे सोने आणि चांदीचे दागिन्याची बॅग लंपास केली. ही घटना रविवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत सागर ज्वेलर्सचे मालक दत्ताजी रघुनाथ साळुखे (रा.घनश्याम नगर, सांगली) यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, माधवनगरमध्ये दत्ताजी साळुंखे यांचे सागर ज्वेलर्स हे सराफी दुकान आहे. रविवारी सकाळी साडेनऊ वाजता नेहमीप्रमाणे साळुंखे यांनी सराफी दुकान उघडले. त्यांनी घरातून १५ तोळ्याच्या सोन्याच्या आणि चांदीच्या दागिन्याची बॅग दुकानांतील काऊंटरच्या आतील बाजूस ठेवली. ते दुकानात साफसफाई करत होते. याचवेळी दोन तरुण मोटारसायकलीवरुन त्यांच्या दुकानात आले. 

चोरट्यांनी त्यांना तुमचे पैसे दुकानाबाहेर पडले आहेत, असे सांगितले. त्यामुळे साळुंखे ते पडलेले पैसे घेण्यासाठी दुकानाच्या बाहेर गेले. तितक्यात  दोघा चोरट्यांनी त्यांच्या दुकानात प्रवेश करुन आतील बाजूस ठेवलेली सोने आणि चांदीच्या दागिन्याची पिशवी घेतली आणि मोटारसायकलीवरून पळून गेले. ते तरुण पळून का गेले, हे साळुखे पहात असताना त्यांना त्यांच्या दागिन्याची पिशवी दिसून आली नाही. त्यामुळे त्यांनी तात्काळ संजयनगर पोलिसांना माहिती दिली. संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक उमेश चिकणे आणि त्यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरु केला आहे. या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :RobberyचोरीJalgaonजळगावPoliceपोलिसGoldसोनं