शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Shocking! पतीसोबत भांडण झाल्यावर महिलेने दोन लेकरांना विहिरीत ढकललं, रात्रभर तिथे बसून रडत राहिली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2021 15:31 IST

एका महिलेने आपल्या दोन पोटच्या पोरांना विहिरीत धक्का दिला. दोन लेकरांमधील मुलीचं वय ९ वर्षे आणि मुलाचं वय ५ वर्षे होतं. विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून दोघांचाही मृत्यू झाला.

ओडिशाच्या (Odisha) कंधमाल जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेबाबत वाचून सगळ्यांनाच धक्का बसला आहे. इथे एका महिलेने रागाच्या भरात असं पाउल उचललं ज्याचा कुणी विचारही करू शकत नाही. कंधमालमध्ये एका महिलेने आपल्या दोन पोटच्या पोरांना विहिरीत धक्का (Woman pushes her two kids in Well) दिला. दोन लेकरांमधील मुलीचं वय ९ वर्षे आणि मुलाचं वय ५ वर्षे होतं. विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून दोघांचाही मृत्यू झाला.

पोलिसांनुसार, महिलेने पतीसोबत झालेल्या भांडणानंतर रागाच्या भरात हे कृत्य केलं. कंधमाल जिल्ह्याच्या रायकिया ब्लॉकमधील पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, साही येथे राहणारी भाग्यलक्ष्मी पात्राचं तिचा पती एस राजेश पात्रासोबत भांडण झालं होतं. त्यानंतर शुक्रवारी दुपारी ती आपल्या दोन्ही लेकरांना घेऊन घरातून निघून गेली होती. (हे पण वाचा : पत्नीने फावड्याने दारूड्या पतीची केली हत्या, पोलिसांसमोर दोन मुलींनी केला खुलासा)

महिलेने उडी न घेता मुलांना ढकललं

रायकिया पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्रीकांत खमारी म्हणाले की, महिलेने आपल्या दोन्ही मुलांना विहिरीत धक्का दिला. ज्यामुळे दोघांचाही मृत्यू झाला. महिलेने स्वत: विहिरीत उडी घेतली नाही. तिचा पती आणि गावातील लोकांना ती सकाळी विहिरीजवळ रडताना दिसली. मोठ्या मुश्कीलीने बचाव पथकाने दोन्ही मृतदेह बाहेर काढले. (हे पण वाचा : धक्कादायक! वडिलांनी केली होती तीन लग्ने, दुसऱ्या पत्नीच्या मुलाने एक एक करून केले तीन मर्डर)

महिलेला अटक

महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तिची स्थिती आता स्थिर आहे. पोलीस म्हणाले की, तिच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून तिला अटक केली जाईल. तेच दुसरीकडे महिलेच्या भावाने तिच्या पतीवर अनैतिक संबंध ठेवण्याचा आरोप लावला आहे.  

टॅग्स :OdishaओदिशाCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू