शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
4
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
5
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
6
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
7
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
8
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
9
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
10
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
11
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
12
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
13
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
14
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
15
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
16
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
17
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
18
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
19
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
20
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं

धक्कादायक! फेसबुक लव्हरसाठी महिलेने नवजात मुलाला सोडले, प्रँकमध्ये मुलासह तिघेजण जीवानिशी गेले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 13:41 IST

Crime News: एक महिला आपल्या नवजात बाळाला सोडून फेसबुक लव्हरसोबत पळून गेली. यादरम्यान संपूर्ण घटना प्रँकच्या स्वरूपात पुढे आली आहे. मात्र या सर्व घडामोडीत महिलेच्या दोन नातेवाईकांसह तिच्या नवजात मुलाचा मृत्यू झाला आहे.

तिरुवनंतपुरम - केरळमधील कोल्लम जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील कल्लूवथुक्कल गावातील रहिवासी असलेली एक महिला आपल्या नवजात बाळाला सोडून फेसबुक लव्हरसोबत पळून गेली. (Crime News) यादरम्यान संपूर्ण घटना प्रँकच्या स्वरूपात पुढे आली आहे. मात्र या सर्व घडामोडीत महिलेच्या दोन नातेवाईकांसह तिच्या नवजात मुलाचा मृत्यू झाला आहे. (Woman leaves newborn baby for Facebook lover, three die in prank)

केरळ पोलिसांनी अत्यंत चपळाईने तपास करत या प्रकरणाचा छडा लावला आहे. रेश्मा नावाच्या या महिलेच्या तथाकथित फेसबुक लव्हरचे अकाऊंट तिच्याच दोन नातेवाईकांकडून चालवण्यात येत असल्याचे तपासात उघड झाले. म्हणजेच हे दोन नातेवाईक प्रियकर बनून रेश्माशी बोलत होत्या. मात्र पोलिसांकडून पकडले जाण्याच्या आणि प्रँक चुकीच्या दिशेने जात असल्याच्या भीतीने या दोघींनीही आत्महत्या केली.

२४ वर्षीय रेश्माला पोलिसांनी तिच्या नवजात मुलाच्या हत्येप्रकरणी अटक केली. तिच्यावर तिच्या मुलाला कोल्लम जिल्ह्यातील कल्लूवथुक्कल गावातील एका रबराच्या शेतात सोडून गेल्याचा आणि हत्या केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या मुलाचा मृत्यू रुग्णालयात उपचारांदरम्यान झाला होता. रेश्माला अटक करण्यात पोलिसांना अपयश येत होते. मृत नवजात मुलाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांना अनेक महिलांचे डीएनए सँपल घेतले होते. त्यानंतर २२ जून रोजी रेश्माला अटक करण्यात आली.

रेश्माने पोलिसांना सांगितले की, तिच्या मित्राने तिला सांगितले होते की तो तिला कुठल्याही अन्य मुलासह स्वीकारू शकतो. एसीपी वाय. निजा मुद्दीन यांनी सांगितले की. २४ वर्षीय रेश्मा हिचा पती विष्णू हा चार महिन्यांपूर्वी कामानिमित्त आखाती देशांत गेला होता. त्यानंतर रेश्मा हिची फेसबुकवरून कुठल्यातरी व्यक्तीशी मैत्री झाली होती. यादरम्यान, ती गर्भवती होती. दरम्यान, फेसबुकवरील मित्राशी असलेली तिची मैत्री प्रेमात बदलली होती. मात्र ती गर्भवती असल्याचे तिने तिच्या घरात कुणाला सांगितले नव्हते.

रेश्मा ही तिची चुलत बहीण आर्याकडून घेतलेले सिमकार्ड वापरत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर रेश्माला अटक झाल्यावर पोलिसांनी तिच्या या बहिणीलाही समन्स बजावले आहे. याच सिमकार्डचा वापर फेसबुक फ्रेंडशी संपर्क करण्यासाठी झाला असल्याचा पोलिसांना संशय होता.

मात्र हे समन्स बजावल्यानंतर एका दिवसानंतर आर्या आणि रेश्माच्या वहिनीची मुलगी ग्रीष्मा ह्या बेपत्ता झाल्या. दोघांचेही मृतदेह तिच्या घराजवळच्या नदीकिनाऱ्यावर सापडले. या दोघीही चांगल्या मैत्रिणी होत्या. एसीपींनी सांगितले की, आम्हाला ग्रीष्माच्या प्रियकराकडून माहिती मिळाली होती. ग्रीष्माने सांगितले की, तिचा प्रियकर रेश्मा हिच्यासोबत प्रँक करत होता. तसेच परिस्थिती हाताबाहेर गेली होती. पोलिसांनी समन्स बजावल्यानंतर आर्याने तिच्या सासूला संपूर्ण माहिती सांगितली. जेव्हा तिची सासू कामावर गेली तेव्हा तिने ग्रीष्मासोबच नदीत उडी मारून आत्महत्या केली.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKeralaकेरळSocial Mediaसोशल मीडियाFacebookफेसबुक