शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

धक्कादायक! रात्री साडे दहा वाजेपर्यंत सुरु होतं मतदान 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 8:29 PM

निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कारभारामुळे अनेक मतदार वंचित; 2 मशीनची गरज असताना एकच मशीनमूळे मतदारांना त्रास

ठळक मुद्देमशीन धीम्या गतीने चालत असल्याने मतदान करायला वेळ लागत होता. पाणी आणि अन्नाशिवाय रांगेत उभे राहिल्याने काही जण कंटाळून मतदान न करता घरी निघून गेल्याचेही विश्वसनीय सूत्रांकडून कळते.ज्यांनी मतदान केले नाही किंवा मतदानापासून वंचित राहिले त्यांना मतदान करण्याची संधी देण्यात यावी अशी मागणी केली आहे. 

नालासोपारा - नालासोपारा पूर्वेकडील पेल्हार येथे रात्री उशिरापर्यंत मतदान चालू होतं या ठिकाणी सकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी मतदानाला सुरुवात झाली. मशीन धीम्या गतीने चालत असल्याने मतदान करायला वेळ लागत होता. एका मतदाराला 15 मिनिटे असा वेळ लागत असल्याने मतदारांना सकाळपासून चार ते पाच तास रांगेत उभे राहावे लागले होते. पाणी आणि अन्नाशिवाय रांगेत उभे राहिल्याने काही जण कंटाळून मतदान न करता घरी निघून गेल्याचेही विश्वसनीय सूत्रांकडून कळते.

महाआघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांना चांगल्या प्रमाणे मतदान होत असल्याने राजकीय खेळी करून मतदारांना मतदान करण्यापासून मशीनच्या रूपाने रोखले असल्याचा आरोप नगरसेविका आणि वकील अंजली पाटील यांनी केला असून शासनाचा ढिसाळ कारभार या मतदान केंद्रावर दिसल्याचेही सांगितले. अधिकाऱ्यांना तक्रार करूनही त्यांच्याकडे कानाडोळा केला असल्याचाही आरोप केला आहे. तर ज्यांनी मतदान केले नाही किंवा मतदानापासून वंचित राहिले त्यांना मतदान करण्याची संधी देण्यात यावी अशी मागणी केली आहे. 

पेल्हार येथील मतदान केंद्रावर अतिशय संथ गतीने मतदान सुरू असल्याने मतदारांना दुपारपासून तीन तीन तास रांगेत उभे राहिल्याचा आरोप स्थानिक रहिवाशी प्रकाश पाटील यांनी केला आहे. या मतदान केंद्रावर दोन मशीनची आवश्यकता असतानाही एकाच मशीनवर मतदान झाल्याने 6 वाजून गेल्यानंतरही मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या होत्या व रात्री साडे दहा वाजेपर्यंत मतदान सुरू होते. मतदान यंत्रात काही वेळ बिघाड झाल्याच्या तक्रारी मतदारांनी केल्या पण बुथवरील अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्यामुळे रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होते असे नागरिकांचे म्हणणे आहे. याबाबत माहिती घेण्यासाठी नालासोपारा मतदार संघ 132 चे मतदार नोंदणी अधिकारी अर्चना कदम यांना फोन करून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही.

टॅग्स :ElectionनिवडणूकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक