शहरं
Join us  
Trending Stories
1
'वीर सावरकर पुरस्कार' नाकारला! काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी HRDS इंडियाचा प्रस्ताव फेटाळला; 'सहमतीशिवाय घोषणा केल्याने' वाद
2
२०२६ मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर, भाऊबीजेला अतिरिक्त सुट्टी; सरकारकडून अधिसूचना जारी
3
कोण सरस...? टाटा नेक्सॉन आणि मारुती विक्टोरिसची समोरासमोर टक्कर झाली; दोन्ही ५ स्टार, कोणाची काय हालत...
4
रुपया गडगडल्यामुळे देशात महागाई वाढणार? आयातदारांची चिंता वाढली, RBI आता काय करणार?
5
Silver Price Today: चांदीचा दर विक्रमी उच्चांकावर, किंमत १.९० लाख रुपयांच्या पुढे; आता गुंतवणूक करणं योग्य होईल का?
6
Nana Patole: निवडणूक आयोगाच्या कारभारावर आक्षेप; आयुक्तांना पदावरून हटवण्याची पटोलेंची मागणी
7
याला म्हणतात नशीब! गरिबीशी लढणाऱ्या २ मित्रांचं आयुष्यच बदललं; सापडला ५० लाखांचा हिरा
8
धक्कादायक! लग्नासाठी जमीन विकली; २ वेळा बनला नवरदेव, पण दोन्ही वेळा फसला, चुना लावून वधू पसार
9
टेस्लाला मोठा झटका, VinFast बनली EV मार्केटची 'महाराणी'! आता असा आहे इलॉन मस्क यांच्या फ्यूचर प्लॅन
10
मालवणीतील वादाप्रकरणी मंत्री मंगलप्रभात लोढा आणि आमदार अस्लम शेख यांच्यात शाब्दिक चकमक
11
VIDEO: लग्नमंडपात काकूंचीच हवाsss... नवरा-नवरी वरमाला घालत असताना हवेत ५ राऊंड्स गोळीबार
12
उगाच नाही पुतिन भारतात आले! रशिया-भारत शस्त्रास्त्र उत्पादक कंपन्यांची मोठी बैठक; कामालाही झाली सुरुवात
13
Vastu Tips: घरात गोलाकार किंवा अंडाकृती आरसा आहे? मग 'हे' वास्तू नियम वाचा; धोका टाळा 
14
"चहा प्यायला चला..." चक्क मराठीत बोलणारा हा पाकिस्तानी क्रिकेटपटू आहे तरी कोण?
15
२०० रुपये रोजंदारीने काम करणाऱ्या शेतमजुराला लागली दीड कोटींची लॉटरी, पण आता घर सोडावं लागलं
16
Kangana Ranaut : "त्या व्यक्तीत काहीच दम नाही..."; जर्मनी दौऱ्यावरून कंगना राणौतने राहुल गांधींना डिवचलं
17
Social Media Ban: आता १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी, जगातील ऐतिहासिक निर्णय!
18
कृतिका कामराने कन्फर्म केलं रिलेशनशिप, 'या' प्रसिद्ध क्रिकेट होस्टला डेट करतीये अभिनेत्री
19
लवकर श्रीमंत व्हायचंय? मग एसआयपी नाही तर 'स्टेप-अप SIP' करा; बघा ११ कोटींचा फंड कसा जमा होईल
20
सोने व्यापाऱ्याचा डोळा लागला अन्...!  ‘सिद्धेश्वर एक्स्प्रेस’च्या एसी कोचमधून ₹५.५ कोटींचे दागिने चोरीला
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! लग्नासाठी जमीन विकली; २ वेळा बनला नवरदेव, पण दोन्ही वेळा फसला, चुना लावून वधू पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 13:45 IST

वैवाहिक जीवनाची नवी सुरुवात करण्यासाठी त्याने आपली वडिलोपार्जित जमीन विकली, दोन वेळा बोहल्यावर चढला, पण प्रत्येक वेळी त्याच्या पदरी फक्त फसवणूक आणि मानसिक त्रास आला.

लग्न करून संसार थाटण्याचे स्वप्न एका ३० वर्षीय तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. वैवाहिक जीवनाची नवी सुरुवात करण्यासाठी त्याने आपली वडिलोपार्जित जमीन विकली, दोन वेळा बोहल्यावर चढला, पण प्रत्येक वेळी त्याच्या पदरी फक्त फसवणूक आणि मानसिक त्रास आला. उत्तर प्रदेशच्या अलीगढमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असून, हरिज्ञान सिंह नावाच्या या पीडित तरुणाला मध्यस्थांनी दोन वेगवेगळ्या महिलांशी लग्न लावले, पण लग्नानंतर काही तासांतच दोन्ही नववधू दागिने आणि रोकड घेऊन पसार झाल्या.

दिल्लीतील एका हॉटेलमध्ये नोकरी करणारा हरिज्ञान सिंह आयुष्यात एकटी पडलेली पत्नीची जागा भरून काढण्यासाठी खूप उत्सुक होता. त्याला वाटले होते की तो लवकरच आपल्या वैवाहिक जीवनाची सुरुवात करेल, म्हणून त्याने आपल्या पैशाची पर्वा न करता आपली जमीन विकून टाकली. या विक्रीतून मिळालेले ४.५ लाख रुपये त्याने लग्नाच्या तयारीसाठी वापरले. पण, लग्नाच्या नावाखाली गावकऱ्यांनी केलेल्या फसवणुकीमुळे त्याला आपला पैसा, दागिने आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनःशांती गमवावी लागली.

एक रात्र राहिली आणि दागिने घेऊन पसार

हरिज्ञानला लग्न करण्यासाठी गावातील एका दाम्पत्याने आणि एका अन्य तरुणाने गाठले. लग्नाचे आश्वासन देत त्यांनी हरिज्ञानकडून पहिल्यांदा १.२० लाख रुपये घेतले. मध्यस्थांनी त्याचे बुलंदशहर येथील गीता नावाच्या महिलेशी लग्न लावले. हरिज्ञानने मोठ्या थाटामाटात लग्न केले, पण त्याचे हे सुख फार काळ टिकले नाही. लग्नानंतर अवघ्या एका रात्रीत, पहाटे ४ च्या सुमारास, गीता सोन्याचे झुमके, चांदीचे पैंजण आणि अन्य दागिने घेऊन घरातून फरार झाली.

पैसे परत मागण्यासाठी हरिज्ञान आणि त्याचा भाऊ राजू मध्यस्थांकडे गेले असता, त्यांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीमुळे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले, पण गावकऱ्यांच्या मध्यस्थीने ते शांत झाले.

दीड लाखांना घातला गंडा, 'बहिणी'सोबत झाली गायब!

पहिल्या फसवणुकीनंतर हरिज्ञान सावरत असतानाच, चार महिन्यांनी तेच मध्यस्थ पुन्हा आले. यावेळी त्यांनी हरिज्ञानला पुन्हा एकदा लग्नाचे आमिष दाखवले. दुसऱ्या लग्नासाठी त्यांनी हरिज्ञानकडून पुन्हा १.५० लाख रुपये उकळले. यावेळी हरिज्ञानचे लग्न बुलंदशहर येथील रिंकू देवी नावाच्या महिलेशी लावले.

पुन्हा एकदा हरिज्ञान नवरदेव बनला, पण रिंकूही त्याच्यासोबत फार काळ राहिली नाही. अवघे तीन दिवस सोबत राहिल्यानंतर रिंकूने अशक्तपणाचे कारण सांगितले. ती तिचा कथित 'भाऊ' असल्याचे सांगणाऱ्या एका तरुणासोबत दिल्लीला जाण्याचा बहाणा करून घरातून निघाली. जाताना तिने घरात असलेली रोकड, दागिने आणि काही मौल्यवान वस्तू सोबत नेल्या. त्यानंतर ती सासरी परतलीच नाही, किंवा तिच्या माहेरचाही पत्ता लागला नाही.

पोस्टर घेऊन रस्त्यावर, 'माझी बायको परत मिळवून द्या'!

या दोन्ही घटनांमध्ये हरिज्ञानचे एकूण २.७० लाख रुपये फसवणुकीत गेले. जमीन विकून मिळालेले पैसेही लग्नाच्या खर्चात आणि फसवणुकीत वाया गेले. या दोन्ही तथाकथित वधू दागिने आणि रोकड घेऊन फरार झाल्यामुळे हरिज्ञानवर मोठे आर्थिक संकट आले आहे.

सतत पोलीस ठाण्याच्या पायऱ्या झिजवूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने, निराश झालेल्या हरिज्ञानने एक अनोखे पाऊल उचलले आहे. त्याने एक पोस्टर बनवले आहे, ज्यावर स्पष्ट लिहिले आहे—‘मला माझी बायको परत मिळवून द्या!’ हे पोस्टर हातात घेऊन तो अलीगढच्या रस्त्यांवर फिरत आहे. हरिज्ञानची एकच मागणी आहे: "माझी जमीन गेली, माझे पैसे गेले, पण निदान मला माझी पत्नी तरी परत मिळवून द्या. मला फक्त न्याय हवा आहे."

तपास सुरू; दोषींवर होणार कारवाई!

या संपूर्ण प्रकरणाची तक्रार हरिज्ञानने एसएसपी नीरज जादौन यांच्याकडे केली आहे. सीओ गभाना धनंजय सिंह यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, 'या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल,' असे आश्वासन दिले आहे. मात्र, अद्यापपर्यंत दोन्ही फरार वधू आणि मध्यस्थ-दाम्पत्याचा कोणताही मागमूस लागलेला नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीWeddingशुभविवाहUttar Pradeshउत्तर प्रदेश