शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मूत मोठी घडामोड! दहशतवाद्यांनी लपवलेला सॅटेलाईट डिव्हाइस सापडला, सीमापार सुरु होता संपर्क
2
इराणने अमेरिका-इस्रायलवर हल्ला करण्याची धमकी दिली, सरकारविरोधी निदर्शने तीव्र, २०३ जणांचा मृत्यू
3
Nashik Municipal Corporation Election 2026 : "दोन्ही भावांमध्ये राम उरला नाही, जो राम का नहीं वो किसी काम के नहीं"; देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर साधला निशाणा
4
BMC Election 2026 : जय जवान पथकातील गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर दिली होती सलामी
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहितनं रचला नवा इतिहास; असा पराक्रम करणारा क्रिकेट जगतातील तो पहिलाच
6
स्वत: दोन बायका केल्या, पण आपलं लग्न लावून देत नाहीत, संतापलेल्या मुलाने वडिलांची केली हत्या
7
"मला अजित पवारांवर कालही विश्वास होता आणि आजही आहे" सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
8
अमेरिकेने हाय टॅरिफ लादला; भारताने 'या' देशांकडे वळवला मोर्चा, निर्यातीत मोठी वाढ, पाहा आकडेवारी
9
भारत-बांगलादेश वादात पाकिस्तानची 'लुडबुड'; स्वतःच्या देशात सुरक्षेचा पत्ता नाही आणि म्हणतंय...
10
भारतावर विश्वास ठेवा, इतरांच्या दाव्यांकडे दुर्लक्ष करा; भारत-अमेरिका करारावर गोयल यांची स्पष्टोक्ती
11
"मी यांना चॅलेंज देतो की, या ठाकरे बंधूंनी..."; भाजपच्या गिरीश महाजन यांचा आक्रमक पवित्रा
12
IND vs NZ 1st ODI : न्यूझीलंडकडून सलामी जोडीनंतर डॅरिल मिचेलची बॅट तळपली! टीम इंडियासमोर ३०१ धावांचं आव्हान
13
₹३६३४१२००००००० स्वाहा...! देशातील 7 कंपन्यांना मोठा फटका, रिलायन्सचं सर्वाधिक नुकसान 
14
‘आमच्यावर बॉम्ब फेकले तर अमेरिकेचे..., तणाव वाढत असताना इराणची थेट धमकी   
15
“हिंदू समाजाने एकत्र राहणे गरजेचे, २० वर्षांत भारत देश विश्वगुरू बनून जगाला...”: मोहन भागवत
16
भाजपा बलात्काऱ्यांनाही संधी देणारा पक्ष, बेटी बचाव बेटी पढाव नाही तर…’, काँग्रेसची बोचरी टीका
17
PM Modi: भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या वाटेवर; पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य
18
इलेक्ट्रिक वाहनांची 'सुसाट' धाव! २०२५ मध्ये २३ लाख ई-वाहनांची नोंदणी; कोणतं राज्य अव्वल?
19
IND vs NZ : डॉक्टर तरुणीची रोहितसाठी हटके फलकबाजी; मैत्रिणीने वामिकाचा उल्लेख करत विराटकडे केली 'ही' मागणी
20
१८० किमी प्रति तास वेग, कपल कूप ते शॉवर सुविधा; स्लीपर वंदे भारत सेवेस सज्ज, १७ जानेवारीला…
Daily Top 2Weekly Top 5

५ वेळा मदत मागायला गेली, तरी दुर्लक्ष; पालकांना 'ऍडजस्ट' करायला सांगणाऱ्या शिक्षिकेच्या बेफिकिरीमुळे गेला चिमुरडीचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 16:01 IST

Jaipur School Girl Death: जयपूरमधील नीरजा मोदी स्कूलमध्ये इयत्ता चौथीतील एका ९ वर्षीय विद्यार्थिनीने शाळेच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या ...

Jaipur School Girl Death: जयपूरमधील नीरजा मोदी स्कूलमध्ये इयत्ता चौथीतील एका ९ वर्षीय विद्यार्थिनीने शाळेच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. या हृदयद्रावक प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या सीबीएसई समितीच्या अहवालातून शाळा व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाचा खुलासा झाला आहे. शाळेच्या दुर्लक्षामुळे सीबीएसईने आता शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

चौकशी अहवालानुसार, मृत विद्यार्थिनीला गेल्या १८ महिन्यांपासून तिच्या वर्गमित्रांकडून सातत्याने शाब्दिक छळ आणि अत्याचाराला सामोरे जावे लागत होते. पालकांनी जुलै २०२४ मध्ये शिक्षकांकडे तक्रार केली होती. तर सप्टेंबर २०२५ मध्ये वडिलांनी एका मुलाला तिला छळताना पाहून थेट वर्गशिक्षकांकडे धाव घेतली होती. मात्र शाळेने कोणतीही कारवाई केली नाही. इतकेच नाही, तर शिक्षिकेने वडिलांना, मुलीने जुळवून घ्यावे असा सल्ला दिला होता. दीड वर्षांत तीनपेक्षा जास्त वेळा तक्रारी होऊनही शाळेच्या अँटी-बुलिंग कमिटीने एकदाही हस्तक्षेप केला नाही.

शेवटच्या ४५ मिनिटांत ५ वेळा शिक्षिकेकडे धाव

सीबीएसई समितीच्या अहवालानुसार, आत्महत्येपूर्वीच्या शेवटच्या ४५ मिनिटांत ती मुलगी वर्गातील शिक्षिकेकडे मदतीसाठी पाच वेळा गेली होती. परंतु शिक्षिकेने तिच्या तक्रारीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. शिक्षिकेने स्वतःच्या जबाबात कबूल केले की मुलगी त्रासलेली होती, पण त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. उलट तिच्यावर ओरडले होते. यामुळे सीबीएसईने शिक्षिकेच्या निष्काळजीपणावर तीव्र ताशेरे ओढले आहेत.

सुरक्षा आणि संरचनेत गंभीर त्रुटी

छळाच्या तक्रारींव्यतिरिक्त, समितीला शाळेत अनेक सुरक्षा आणि पायाभूत सुविधांच्या त्रुटीही आढळल्या आहेत. ज्या जिन्यावरून मुलीने उडी मारली, त्याचे कठडे सहजपणे चढता येण्यासारखे होते. अपुरे सीसीटीव्ही मॉनिटरिंग, तसेच मुलीला त्रास होत असतानाही शाळेने तिला कोणताही मानसिक आधार न देणे, हे सीबीएसई मार्गदर्शक तत्त्वांचे थेट उल्लंघन असल्याचे अहवालात नमूद आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : School's Negligence Leads to Tragic Suicide of Jaipur Student

Web Summary : Jaipur school's negligence, despite repeated complaints of bullying, resulted in a student's suicide. The CBSE report reveals the school failed to act on bullying reports and lacked safety measures, holding the teacher accountable for ignoring the victim's pleas for help. A notice has been served to the school.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSchoolशाळा