शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

लग्नाचे वचन देऊन ठेवलेले शरीर संबंधास सरसकट बलात्कार मानू नये

By पूनम अपराज | Published: December 19, 2020 7:15 PM

दिल्ली उच्च न्यायालयाने केले स्पष्ट   

ठळक मुद्दे‘जर एखादी महिला आपल्या मर्जीने खूप काळ शरीर संबंध ठेवत असेल तर तो बलात्कार नाही’, असे दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

लग्नाचे वचन देऊन ठेवण्यात आलेले शरीर संबंध सरसकटपणे बलात्कार मानले जाऊ नयेत’, असं दिल्ली उच्च न्यायालयाने आपल्या एका सुनावणीत निरीक्षण नोंदवले आहे. ‘जर एखादी महिला आपल्या मर्जीने खूप काळ शरीर संबंध ठेवत असेल तर तो बलात्कार नाही’, असे दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

बऱ्याच कालावधीपर्यंत एका व्यक्तीबरोबर शरीर संबंध ठेवल्यानंतर एका महिलेने त्या व्यक्तीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालय सुनावणी करत असताना हे महत्वाचे निरीक्षण नोंदवले आहे. या प्रकरणी ही याचिका फेटाळत उच्च न्यायालयाने म्हटले की, ‘जर दोघांमधील शरीरसंबंध खूप काळ असतील तर केवळ लग्नाचं वचन देऊन ते ठेवण्यात आले म्हणून त्याला बलात्कार म्हणता येणार नाही’.

‘काही प्रकरणांमध्ये लग्नाचं वचन हे शरीर संबंधांच्या लालसेपोटी दिलेलं असू शकतं. मात्र, महिलेची इच्छा नसल्याने अशा प्रकरणांमध्ये महिला एखाद वेळेसच पूर्ण संमतीने शरीर संबंधांसाठी होकार देते. पण जेव्हा प्रियकराचा खोटेपणा तिच्या लक्षात येतो तेव्हा ती आपली संमती नसल्याचंही स्पष्ट करते. त्यामुळे महिलेला लग्नाचं अमिष दाखवून शरीरसंबंधासाठी तयार करणं म्हणजे महिलेच्या सहमतीचा दुरुपयोग करणं आहे. त्यामुळे केवळ अशा मर्जी विरोधात ठेवण्यात आलेल्या शरीर संबंधांच्या प्रकरणांमध्ये भारतीय दंड विधान सेक्शन 375 अंतर्गत बलात्काराची शिक्षा होऊ शकते’, असं न्यायालयाने नमूद केले आहे.

न्यायमूर्ती विभू बाखरू यांनी याप्रकरणी सुनावणी घेतली. खूप काळापर्यंत एकत्र असलेल्या प्रेमीयुगुलात शरीरसंबंध होते. लग्नासाठीचं वचनही तिच्या जोडीदाराकडून महिलेला देण्यात आलं होतं. मात्र नंतर हे नातं संपुष्टात आल्यानंतर त्या महिलेने बलात्काराची तक्रार केली. याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली, अशी माहिती टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयRapeबलात्कारmarriageलग्नdelhiदिल्ली