शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

एटीएसकडून आंतरराष्ट्रीय टेलिफोन एक्स्चेंजचे अवैध रॅकेट उद्ध्वस्त, सात जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 06:09 IST

मुंबईतून चालविण्यात येणारे आंतरराष्ट्रीय टेलिफोन एक्स्चेंजचे अवैध रॅकेट महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) उद्ध्वस्त करत सात जणांना अटक केली आहे.

मुंबई : मुंबईतून चालविण्यात येणारे आंतरराष्ट्रीय टेलिफोन एक्स्चेंजचे अवैध रॅकेट महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) उद्ध्वस्त करत सात जणांना अटक केली आहे. या टोळीने गेल्या सहा महिन्यांत शासनाची तब्बल ३७ कोटी ५० लाखांची फसवणूक केली आहे. आरोपींकडे पोलीस अधिक तपास करत आहेत.नाझीम खान (२९), फैजल बाटलीवाला उर्फ अकबर (४०), समीर दरवेज (३०), हुसैन सय्यद (३९), मंदार आचरेकर (३६), सिब्तेन मर्चंट (३३) आणि इम्तियाज शेख (३८) अशी अटक आरोपींची नावे आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून आरोपी हे रॅकेट चालवत असल्याचे तपासात समोर आले.गोवंडीतील शिवाजीनगरमधून इंटरनेट सर्व्हिस पुरविणाऱ्याच्या माध्यमातून एक अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंज सेंटर सुरू असल्याची माहिती मिळताच एटीएसने तपास सुरू केला. एटीएसप्रमुख देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सात पथके नेमण्यात आली. पथकाने तपास करत शिवाजीनगरसह मुंबईतील मस्जीद बंदर, डोंगरी, वरळी तर कल्याण आणि नवीन पनवेलमध्ये छापेमारी करत कारवाई केली. त्यात गोवंडीत याचे मुख्य सर्व्हर असल्याचे समोर आले.हे रॅकेट विदेशातून इंटरनेटच्या माध्यमातून आलेल्या ग्राहकाचा कॉल व्हॉइस कॉलमध्ये रूपांतरित करायचे. तो कॉल आरोपी आपल्याकडील सिमकार्डच्या माध्यमातून भारतातील त्या संबंधित व्यक्तीला जोडून देत. यासाठी ते इंटरनेट प्रोटोकॉल आणि पीआरआय लाइन्सचादेखील वापर करत होते. यामुळे दूरसंचार विभागासोबतच मोबाइल कंपन्यांचीही मोठ्या प्रमाणात फसवणूक होत होती. तसेच आरोपी वेगवेगळी सिमकार्ड वापरत असल्याने आणि विदेशातून इंटरनेट कॉल आल्याने कॉल करणाºया व्यक्तीबद्दल काहीच माहिती किंवा रेकॉर्ड भारतीय यंत्रणा, मोबाइल कंपन्यांकडे मिळू शकत नव्हता. याचाच फायदा घेत या टोळीने हे रॅकेट मोठ्या प्रमाणात सुरू ठेवले असून यातील एका आरोपीला याआधीही अशाच गुन्ह्यात अटक करण्यात आल्याचे एटीएसच्या तपासात समोर आले आहे.३७ कोटी ५० लाख रुपयांचे नुकसानयूएई, कतार, बहरीन आणि कुवेत अशा आखाती देशांतून येणारे इंटरनेट कॉल या टेलिकॉम एक्स्चेंजच्या माध्यमातून व्हॉइस कॉलमध्ये रूपांतरित करून भारत सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागाचे ३७ कोटी ५० लाख रुपयांचे नुकसान करण्यात आल्याचे उघड झाले आहे.५१३ सिमकार्ड जप्तआरोपींकडून मुख्य सर्वर, ९ सिम बॉक्स, ५१३ सिमकार्ड, ३ लॅपटॉप, ४ डेक्सटॉप, ७ वायफाय राऊटर, २ इंटरनेट टर्मिनेटिंग स्विच आणि ११ मोबाइल असा एकूण ६ लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.यापूर्वीच्या कारवायाभारतीय लष्कर तळांची आणि देशातील गुप्त माहिती मिळविण्यासाठी पाकिस्तानच्या आयएसआयकडून वापरण्यात येणाºया अवैध दूरसंचार यंत्रणेवर महाराष्ट्र एटीएसने २०१७ मध्ये कारवाई करत राज्यातील १२ केंद्रे उद्ध्वस्त केली होती. लातूरसह राज्यभरात आणि हैदराबादमध्ये अवैधरीत्या चालविण्यात येणाºया टेलिफोन एक्स्चेंज रॅकेट उद्ध्वस्त केले. एटीएसने या प्रकरणात शंकर बिरादार (३३) आणि रवी साबडे (२७) यांना अटक केली. त्यापाठोपाठ मुंबईतील गोवंडी, मानखुर्द, शिवाजीनगर आणि ट्रॉम्बे परिसरात सुरू असलेल्या टेलिफोन एक्स्चेंजचा पर्दाफाश केला. यात नूरमोहम्मद अश्रफ शेख, नासीर हुसैन कादीर हुसैन शेख, नाझीम मोहम्मद नसीम खान, शम्स आलम शेख आणि शाहिद जमाल जमालउद्दीन झाकी यांना अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस