शहरं
Join us  
Trending Stories
1
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
2
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
3
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
4
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
5
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
6
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
7
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
8
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
9
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
10
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
11
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
12
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान
13
युक्रेन युद्धादरम्यान रशियाने केली धोकादायक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी, ‘स्टॉर्म शॅडो क्रूज’ ला रोखणे अशक्य
14
गृहकर्ज घेताय? 'या' सरकारी आणि खासगी बँका देत आहेत सर्वात स्वस्त दरात होम लोन; लगेच तपासा व्याजदर
15
"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय
16
2016 चौकार...! एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक चौकार लगावणारे ७ फलंदाज, कितव्या क्रमांकावर रोहित आणि विराट?
17
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण; गुन्हा दाखल एकीकडे, आरोपी PSI बदने हजर दुसरीकडे!
18
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
19
इंग्लंड दौऱ्यानंतर गंभीर, आगरकरने काढलं संघाबाहेर, त्याच फलंदाजाने कुटल्या १७४ धावा, केली चौकार, षटकारांची बरसात
20
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा

एटीएसकडून आंतरराष्ट्रीय टेलिफोन एक्स्चेंजचे अवैध रॅकेट उद्ध्वस्त, सात जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 06:09 IST

मुंबईतून चालविण्यात येणारे आंतरराष्ट्रीय टेलिफोन एक्स्चेंजचे अवैध रॅकेट महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) उद्ध्वस्त करत सात जणांना अटक केली आहे.

मुंबई : मुंबईतून चालविण्यात येणारे आंतरराष्ट्रीय टेलिफोन एक्स्चेंजचे अवैध रॅकेट महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) उद्ध्वस्त करत सात जणांना अटक केली आहे. या टोळीने गेल्या सहा महिन्यांत शासनाची तब्बल ३७ कोटी ५० लाखांची फसवणूक केली आहे. आरोपींकडे पोलीस अधिक तपास करत आहेत.नाझीम खान (२९), फैजल बाटलीवाला उर्फ अकबर (४०), समीर दरवेज (३०), हुसैन सय्यद (३९), मंदार आचरेकर (३६), सिब्तेन मर्चंट (३३) आणि इम्तियाज शेख (३८) अशी अटक आरोपींची नावे आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून आरोपी हे रॅकेट चालवत असल्याचे तपासात समोर आले.गोवंडीतील शिवाजीनगरमधून इंटरनेट सर्व्हिस पुरविणाऱ्याच्या माध्यमातून एक अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंज सेंटर सुरू असल्याची माहिती मिळताच एटीएसने तपास सुरू केला. एटीएसप्रमुख देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सात पथके नेमण्यात आली. पथकाने तपास करत शिवाजीनगरसह मुंबईतील मस्जीद बंदर, डोंगरी, वरळी तर कल्याण आणि नवीन पनवेलमध्ये छापेमारी करत कारवाई केली. त्यात गोवंडीत याचे मुख्य सर्व्हर असल्याचे समोर आले.हे रॅकेट विदेशातून इंटरनेटच्या माध्यमातून आलेल्या ग्राहकाचा कॉल व्हॉइस कॉलमध्ये रूपांतरित करायचे. तो कॉल आरोपी आपल्याकडील सिमकार्डच्या माध्यमातून भारतातील त्या संबंधित व्यक्तीला जोडून देत. यासाठी ते इंटरनेट प्रोटोकॉल आणि पीआरआय लाइन्सचादेखील वापर करत होते. यामुळे दूरसंचार विभागासोबतच मोबाइल कंपन्यांचीही मोठ्या प्रमाणात फसवणूक होत होती. तसेच आरोपी वेगवेगळी सिमकार्ड वापरत असल्याने आणि विदेशातून इंटरनेट कॉल आल्याने कॉल करणाºया व्यक्तीबद्दल काहीच माहिती किंवा रेकॉर्ड भारतीय यंत्रणा, मोबाइल कंपन्यांकडे मिळू शकत नव्हता. याचाच फायदा घेत या टोळीने हे रॅकेट मोठ्या प्रमाणात सुरू ठेवले असून यातील एका आरोपीला याआधीही अशाच गुन्ह्यात अटक करण्यात आल्याचे एटीएसच्या तपासात समोर आले आहे.३७ कोटी ५० लाख रुपयांचे नुकसानयूएई, कतार, बहरीन आणि कुवेत अशा आखाती देशांतून येणारे इंटरनेट कॉल या टेलिकॉम एक्स्चेंजच्या माध्यमातून व्हॉइस कॉलमध्ये रूपांतरित करून भारत सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागाचे ३७ कोटी ५० लाख रुपयांचे नुकसान करण्यात आल्याचे उघड झाले आहे.५१३ सिमकार्ड जप्तआरोपींकडून मुख्य सर्वर, ९ सिम बॉक्स, ५१३ सिमकार्ड, ३ लॅपटॉप, ४ डेक्सटॉप, ७ वायफाय राऊटर, २ इंटरनेट टर्मिनेटिंग स्विच आणि ११ मोबाइल असा एकूण ६ लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.यापूर्वीच्या कारवायाभारतीय लष्कर तळांची आणि देशातील गुप्त माहिती मिळविण्यासाठी पाकिस्तानच्या आयएसआयकडून वापरण्यात येणाºया अवैध दूरसंचार यंत्रणेवर महाराष्ट्र एटीएसने २०१७ मध्ये कारवाई करत राज्यातील १२ केंद्रे उद्ध्वस्त केली होती. लातूरसह राज्यभरात आणि हैदराबादमध्ये अवैधरीत्या चालविण्यात येणाºया टेलिफोन एक्स्चेंज रॅकेट उद्ध्वस्त केले. एटीएसने या प्रकरणात शंकर बिरादार (३३) आणि रवी साबडे (२७) यांना अटक केली. त्यापाठोपाठ मुंबईतील गोवंडी, मानखुर्द, शिवाजीनगर आणि ट्रॉम्बे परिसरात सुरू असलेल्या टेलिफोन एक्स्चेंजचा पर्दाफाश केला. यात नूरमोहम्मद अश्रफ शेख, नासीर हुसैन कादीर हुसैन शेख, नाझीम मोहम्मद नसीम खान, शम्स आलम शेख आणि शाहिद जमाल जमालउद्दीन झाकी यांना अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस