शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
जगदीप धनखड यांना किती मते मिळाली होती?; उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांची मते यंदा दुपटीनं वाढली
3
एकीकडे मोदींना 'मित्र' म्हणायचं तर दुसरीकडे 'हे' पाऊल उचलायचं; ट्रम्पचा नेमका 'प्लॅन' काय?
4
बायकोने नवऱ्याला ट्रॅक करून पकडलेले आठवतेय...; Jio ने तस्सेच डिव्हाईस आणले, एकदा चार्ज केले की...
5
आधी चर्चेला बोलावलं अन् नंतर हाकलून लावलं; नेपाळमध्ये Gen-Zसोबत चर्चेचा खेळ गडबडला?
6
ITR भरण्याची अंतिम तारीख जवळ; आता मोबाईल ॲपवरूनही सहज करता येणार रिटर्न फाइल
7
Gold Silver Price 10 September: मोठ्या तेजीनंतर सोन्या-चांदीचे दर आज घसरले; पाहा १४ ते २४ कॅरेटसाठी आता किती खर्च करावा लागणार
8
Video - परिस्थिती भीषण! जे दिसलं, ते सर्वच लुटलं... नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनकर्त्यांचा धुडगूस
9
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
10
iPhone 17: भारत, दुबई, अमेरिका की इतर कुठे; कोणत्या देशात आयफोन १७ मिळतोय स्वस्त? वाचा
11
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
12
सगळ्यात स्वस्त ७ सीटर असणाऱ्या 'या' कारची किंमत ९६ हजारांनी झाली कमी! आता कितीला मिळणार?
13
'मुंबईत घर घेणं आम्हाला परवडत नाही'; ८१ टक्के लोकांचं स्पष्ट मत, सर्वेक्षणात काय म्हटलंय? 
14
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
15
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
16
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
17
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
18
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
19
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
20
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?

एटीएसकडून आंतरराष्ट्रीय टेलिफोन एक्स्चेंजचे अवैध रॅकेट उद्ध्वस्त, सात जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 06:09 IST

मुंबईतून चालविण्यात येणारे आंतरराष्ट्रीय टेलिफोन एक्स्चेंजचे अवैध रॅकेट महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) उद्ध्वस्त करत सात जणांना अटक केली आहे.

मुंबई : मुंबईतून चालविण्यात येणारे आंतरराष्ट्रीय टेलिफोन एक्स्चेंजचे अवैध रॅकेट महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) उद्ध्वस्त करत सात जणांना अटक केली आहे. या टोळीने गेल्या सहा महिन्यांत शासनाची तब्बल ३७ कोटी ५० लाखांची फसवणूक केली आहे. आरोपींकडे पोलीस अधिक तपास करत आहेत.नाझीम खान (२९), फैजल बाटलीवाला उर्फ अकबर (४०), समीर दरवेज (३०), हुसैन सय्यद (३९), मंदार आचरेकर (३६), सिब्तेन मर्चंट (३३) आणि इम्तियाज शेख (३८) अशी अटक आरोपींची नावे आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून आरोपी हे रॅकेट चालवत असल्याचे तपासात समोर आले.गोवंडीतील शिवाजीनगरमधून इंटरनेट सर्व्हिस पुरविणाऱ्याच्या माध्यमातून एक अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंज सेंटर सुरू असल्याची माहिती मिळताच एटीएसने तपास सुरू केला. एटीएसप्रमुख देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सात पथके नेमण्यात आली. पथकाने तपास करत शिवाजीनगरसह मुंबईतील मस्जीद बंदर, डोंगरी, वरळी तर कल्याण आणि नवीन पनवेलमध्ये छापेमारी करत कारवाई केली. त्यात गोवंडीत याचे मुख्य सर्व्हर असल्याचे समोर आले.हे रॅकेट विदेशातून इंटरनेटच्या माध्यमातून आलेल्या ग्राहकाचा कॉल व्हॉइस कॉलमध्ये रूपांतरित करायचे. तो कॉल आरोपी आपल्याकडील सिमकार्डच्या माध्यमातून भारतातील त्या संबंधित व्यक्तीला जोडून देत. यासाठी ते इंटरनेट प्रोटोकॉल आणि पीआरआय लाइन्सचादेखील वापर करत होते. यामुळे दूरसंचार विभागासोबतच मोबाइल कंपन्यांचीही मोठ्या प्रमाणात फसवणूक होत होती. तसेच आरोपी वेगवेगळी सिमकार्ड वापरत असल्याने आणि विदेशातून इंटरनेट कॉल आल्याने कॉल करणाºया व्यक्तीबद्दल काहीच माहिती किंवा रेकॉर्ड भारतीय यंत्रणा, मोबाइल कंपन्यांकडे मिळू शकत नव्हता. याचाच फायदा घेत या टोळीने हे रॅकेट मोठ्या प्रमाणात सुरू ठेवले असून यातील एका आरोपीला याआधीही अशाच गुन्ह्यात अटक करण्यात आल्याचे एटीएसच्या तपासात समोर आले आहे.३७ कोटी ५० लाख रुपयांचे नुकसानयूएई, कतार, बहरीन आणि कुवेत अशा आखाती देशांतून येणारे इंटरनेट कॉल या टेलिकॉम एक्स्चेंजच्या माध्यमातून व्हॉइस कॉलमध्ये रूपांतरित करून भारत सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागाचे ३७ कोटी ५० लाख रुपयांचे नुकसान करण्यात आल्याचे उघड झाले आहे.५१३ सिमकार्ड जप्तआरोपींकडून मुख्य सर्वर, ९ सिम बॉक्स, ५१३ सिमकार्ड, ३ लॅपटॉप, ४ डेक्सटॉप, ७ वायफाय राऊटर, २ इंटरनेट टर्मिनेटिंग स्विच आणि ११ मोबाइल असा एकूण ६ लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.यापूर्वीच्या कारवायाभारतीय लष्कर तळांची आणि देशातील गुप्त माहिती मिळविण्यासाठी पाकिस्तानच्या आयएसआयकडून वापरण्यात येणाºया अवैध दूरसंचार यंत्रणेवर महाराष्ट्र एटीएसने २०१७ मध्ये कारवाई करत राज्यातील १२ केंद्रे उद्ध्वस्त केली होती. लातूरसह राज्यभरात आणि हैदराबादमध्ये अवैधरीत्या चालविण्यात येणाºया टेलिफोन एक्स्चेंज रॅकेट उद्ध्वस्त केले. एटीएसने या प्रकरणात शंकर बिरादार (३३) आणि रवी साबडे (२७) यांना अटक केली. त्यापाठोपाठ मुंबईतील गोवंडी, मानखुर्द, शिवाजीनगर आणि ट्रॉम्बे परिसरात सुरू असलेल्या टेलिफोन एक्स्चेंजचा पर्दाफाश केला. यात नूरमोहम्मद अश्रफ शेख, नासीर हुसैन कादीर हुसैन शेख, नाझीम मोहम्मद नसीम खान, शम्स आलम शेख आणि शाहिद जमाल जमालउद्दीन झाकी यांना अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस