शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

Video : "सनातन धर्म पाठशाळा ट्रस्ट" ही माझी व्यक्तिगत ट्रस्ट, याचा कुठल्याही संस्थेशी संबंध नाही - अजय श्रीवास्तव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 20:20 IST

Sanatan Dharma Pathshala Trust is my personal trust- Ajay Shrivastav : पहिले केंद्र बनवण्यास आम्ही दाऊद इब्राहिमच्या जागेची निवड केली आहे. तेथून आम्ही सनातन धर्म पाठशाळेची सुरुवात करणार आहोत, असे स्पष्टीकरण वकील अजय श्रीवास्तव यांनी लोकमतशी बोलताना दिले आहे.

नवाब मलिकांनी देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना सनातन संस्थेचा उल्लेख केला. कोकणातील दाऊदच्या नावाची जागा सनातन संस्थेने घेतल्याचं मलिक म्हणाले. मात्र, लिलावात दाऊदची जागा खरेदी करणाऱ्या वकील अजय श्रीवास्तव यांनी केला हा खुलासा केला आहे. ''सनातन धर्म पाठशाळा ट्रस्ट'' ही माझी व्यक्तिगत ट्रस्ट, याचा कुठल्याही संस्थेशी संबंध नाही आणि या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही मदरश्यातून ज्या प्रकारे शिक्षण दिले जाते, त्याप्रमाणे आम्ही सनातन धर्म पाठशाळेची सुरुवात करत आहोत. त्याचे पहिले केंद्र बनवण्यास आम्ही दाऊद इब्राहिमच्या जागेची निवड केली आहे. तेथून आम्ही सनातन धर्म पाठशाळेची सुरुवात करणार आहोत, असे स्पष्टीकरण वकील अजय श्रीवास्तव यांनी लोकमतशी बोलताना दिले आहे. 

रत्नागिरी  दाऊदच्या नावाची जागा सनातन संस्थेने घेतल्याचं मलिक म्हणाले.त्यावर आता सनातन संस्थेने सविस्तर खुलासा केला आहे. सनातन संस्थेने म्हटलं आहे की, मुंबईतील ड्रग्ज प्रकरणात अत्यंत हीन पातळीचे राजकारण चालू आहे. त्यातच आज नवाब मलिक यांनी स्वतःवर झालेल्या आरोपांच्या खुलाशासाठी सत्य जाणून न घेताच सनातन संस्थेच्या नावाचा विनाकारण वापर केला आहे. दाऊदची कोणतीही मालमत्ता सनातन संस्थेने खरेदी केलेली नसून प्रत्यक्षात रत्नागिरीतील वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार ती मालमत्ता दिल्लीतील अ‍ॅड. अजय श्रीवास्तव यांनी खरेदी केली आहे. त्या ठिकाणी लहान मुलांवर संस्कार करण्यासाठी ‘सनातन धर्म पाठशाळा’ नावाने गुरुकुल चालू करण्याचे त्यांनी घोषित केले आहे. सनातन संस्था आणि अ‍ॅड्. अजय श्रीवास्तव यांचा कोणताही संबंध नाही असं त्यांनी सांगितले.

तसेच पुरेशी माहिती न घेताच सनातन संस्थेसंदर्भात अशा प्रकारचे खोटे आरोप करून नवाब मलिक यांनी स्वतःचे हसे करू नये. सनातन संस्था आणि दाऊद यांची एकत्रित चर्चा करून समाजात हिंदु संस्थांविषयी अपसमज पसरवण्याची ही दुष्ट बुद्धी आहे. या प्रकरणी नवाब मलिक यांना महाराष्ट्र सरकारने समज द्यावी अशी मागणी सनातन संस्थेने केली आहे. 

 

टॅग्स :Dawood Ibrahimदाऊद इब्राहिमRatnagiriरत्नागिरीSanatan Sansthaसनातन संस्थाnawab malikनवाब मलिकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस