शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

मुंब्रा येथील अपहृत मुलाची मध्य प्रदेशातून सुखरुप सुटका; ठाणे गुन्हे शाखेची कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 01:26 IST

आईवरील रागातून अपहरण, दिवा येथील रहिवासी रेश्मा राठोड (३०) यांनी २४ जानेवारी रोजी आपला सात वर्षीय मुलगा लकी याचे अपहरण झाल्याची तक्रार मुंब्रा पोलीस ठाण्यात केली होती.

ठाणे : मुब्रा येथून जवळच असलेल्या दिवा शहरातून अपहरण झालेल्या एका सात वर्षीय मुलाची मध्यप्रदेशातील इटारसी येथून सुटका करण्यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे. या मुलाचे अपहरण करणाऱ्या रिंकू सरोज (३५, रा. उत्तरप्रदेश ) याला इटारसी रेल्वे पोलिसांच्या मदतीने अटक करण्यात आली असून मुलाला मंगळवारी पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

दिवा येथील रहिवासी रेश्मा राठोड (३०) यांनी २४ जानेवारी रोजी आपला सात वर्षीय मुलगा लकी याचे अपहरण झाल्याची तक्रार मुंब्रा पोलीस ठाण्यात केली होती. या घटनेचा समांतर तपास मुंब्रा पोलीस आणि गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पथक करीत होते. दरम्यान, या महिलेसोबत राहणारा रिंकू सरोज हा तिला उत्तर प्रदेश येथे येण्यास आग्रह करीत होता. रेश्मा हिने मात्र उत्तरप्रदेशात जाण्यास त्याला स्पष्ट नकार दिला होता. यातूनच संतापलेल्या रिंकूने रेश्माच्या मुलाचे अपहरण केल्याची बाब तपासात समोर आली. या मुलासोबत रिंकू रेल्वेने प्रवास करीत असल्याची माहिती त्याच्या मोबाईलच्या आधाराने पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक माने यांच्या पथकाने मध्यप्रदेशातील प्रयागराज आणि इटारसी रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला. प्रयागराज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मीना, उपनिरीक्षक अमित द्वीवेदी आणि इटारसी रेल्वे पोलीस ठाण्याचे निरीक्षक देवेंद्र यांच्या पथकाने रिंकूला या मुलासह ताब्यात घेतले. त्यानंतर ठाणे गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक माने यांच्या पथकाने या मुलाला ताब्यात घेतले. आरोपी रिंकू याला २६ जानेवारी रोजी मुंब्रा पोलिसांच्या ताब्यात दिले असून या मुलाला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केल्याची माहिती निरीक्षक ठाकरे यांनी दिली.

पालकांना आनंद अवघा सात वर्षीय लकी दाेन दिवसांपासून दूर असल्याने त्याची आई रेश्मा अतिशय दु:खी होती. मंगळवारी पोलिसांनी लकीला पुन्हा तिच्या स्वाधीन करताच, रेश्माच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला. तिने पोलिसांचे आभार मानले.

टॅग्स :KidnappingअपहरणPoliceपोलिस