शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

मुंब्रा येथील अपहृत मुलाची मध्य प्रदेशातून सुखरुप सुटका; ठाणे गुन्हे शाखेची कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 01:26 IST

आईवरील रागातून अपहरण, दिवा येथील रहिवासी रेश्मा राठोड (३०) यांनी २४ जानेवारी रोजी आपला सात वर्षीय मुलगा लकी याचे अपहरण झाल्याची तक्रार मुंब्रा पोलीस ठाण्यात केली होती.

ठाणे : मुब्रा येथून जवळच असलेल्या दिवा शहरातून अपहरण झालेल्या एका सात वर्षीय मुलाची मध्यप्रदेशातील इटारसी येथून सुटका करण्यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे. या मुलाचे अपहरण करणाऱ्या रिंकू सरोज (३५, रा. उत्तरप्रदेश ) याला इटारसी रेल्वे पोलिसांच्या मदतीने अटक करण्यात आली असून मुलाला मंगळवारी पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

दिवा येथील रहिवासी रेश्मा राठोड (३०) यांनी २४ जानेवारी रोजी आपला सात वर्षीय मुलगा लकी याचे अपहरण झाल्याची तक्रार मुंब्रा पोलीस ठाण्यात केली होती. या घटनेचा समांतर तपास मुंब्रा पोलीस आणि गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पथक करीत होते. दरम्यान, या महिलेसोबत राहणारा रिंकू सरोज हा तिला उत्तर प्रदेश येथे येण्यास आग्रह करीत होता. रेश्मा हिने मात्र उत्तरप्रदेशात जाण्यास त्याला स्पष्ट नकार दिला होता. यातूनच संतापलेल्या रिंकूने रेश्माच्या मुलाचे अपहरण केल्याची बाब तपासात समोर आली. या मुलासोबत रिंकू रेल्वेने प्रवास करीत असल्याची माहिती त्याच्या मोबाईलच्या आधाराने पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक माने यांच्या पथकाने मध्यप्रदेशातील प्रयागराज आणि इटारसी रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला. प्रयागराज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मीना, उपनिरीक्षक अमित द्वीवेदी आणि इटारसी रेल्वे पोलीस ठाण्याचे निरीक्षक देवेंद्र यांच्या पथकाने रिंकूला या मुलासह ताब्यात घेतले. त्यानंतर ठाणे गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक माने यांच्या पथकाने या मुलाला ताब्यात घेतले. आरोपी रिंकू याला २६ जानेवारी रोजी मुंब्रा पोलिसांच्या ताब्यात दिले असून या मुलाला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केल्याची माहिती निरीक्षक ठाकरे यांनी दिली.

पालकांना आनंद अवघा सात वर्षीय लकी दाेन दिवसांपासून दूर असल्याने त्याची आई रेश्मा अतिशय दु:खी होती. मंगळवारी पोलिसांनी लकीला पुन्हा तिच्या स्वाधीन करताच, रेश्माच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला. तिने पोलिसांचे आभार मानले.

टॅग्स :KidnappingअपहरणPoliceपोलिस