शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Ranchi Violence : माझा मुलगा हिंसाचारात सहभागी नव्हता, तरीही पोलिसांनी गोळ्या घातल्या; मृत तरुणाच्या वडिलांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 18:16 IST

Ranchi Violence : पोलिसांवर आरोप करताना ते असेही म्हणाला की, 'पोलिसांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या.'

Ranchi Violence:रांचीमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर झालेल्या हिंसाचारात दोन मुस्लिम तरुणांचा मृत्यू झाला, त्यापैकी एकाचे नाव साहिल आहे. मृत तरुणाच्या वडिलांनी एबीपी न्यूजच्या टीमशी संवाद साधला आणि दावा केला की, 'त्यांचा मुलगा हिंसाचारात सहभागी नव्हता'. पोलिसांवर आरोप करताना ते असेही म्हणाला की, 'पोलिसांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या.'

मृताचे वडील मोहम्मद अफजल यांनी एबीपी न्यूजला सांगितले की, माझा मुलगा साहिल हिंसाचारात सहभागी नव्हता. शुक्रवारी ही घटना घडलेल्या मुख्य रस्त्यावरील एका दुकानात साहिल कामाला होता. हिंसाचार सुरू झाल्यावर सर्व दुकाने बंद होऊ लागली. माझा मुलगा मुख्य रस्त्याने घरी जात असताना पोलिसांनी त्याच्या पाठीमागे गोळी झाडली. मोहम्मद अफझल यांनी दावा केला की, "माझा मुलगा आंदोलनात सहभागी नव्हता. मी पोलिसांवर गुन्हा दाखल केला आहे, मला न्याय आणि नुकसानभरपाई हवी आहे."

माझ्या एकुलत्या एक मुलाला गोळ्या का घातल्या?, त्याचा दोष काय?; आईचा संतप्त सवालइस्लाम जिंदाबाद, नुपूर शर्मा मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्याशुक्रवारच्या नवाजनंतर मोठ्या संख्येने मुस्लीम समाजाचे लोक मुख्य मार्गावर निदर्शने करत असल्याचे सांगण्यात येत होते. इस्लाम जिंदाबाद, नुपूर शर्मा मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. घटनेच्या दिवशी स्थानिक मुलांचा निदर्शनात सहभाग होता पण सर्वजण शांततेने निदर्शने करत होते. पोलिसांच्या मागे उभ्या असलेल्या लोकांनी आधी दगडफेक केल्याचा दावा केला जात आहे, त्यानंतर आंदोलक संतप्त झाले आणि पोलिसांनी टोकाचे पाऊल उचलले. काही वेळातच निदर्शनाचे हिंसाचारात रूपांतर झाले. आंदोलकांनी दगडफेक सुरू केली. मंदिर आणि आजूबाजूची दुकाने, वाहने, पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी गोळीबार सुरू केला. ज्यात दोन आंदोलकांचा मृत्यू झाला.

 

टॅग्स :FiringगोळीबारCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यूJharkhandझारखंड