शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

बायको ‘पागल’ म्हणाली म्हणून दु:ख अनावर; नवऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 14:56 IST

पोलिसांच्या माहितीनुसार जयपूरच्या श्याम नगर परिसरात भाड्याने राहणाऱ्या रवी कुमार यांनी रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

जयपूर – राजस्थान जयपूरमध्ये एका किरकोळ कारणावरुन पतीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. श्याम नगर परिसरात राहणाऱ्या व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं उघड झालं. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यानंतर मृतदेह पोस्टमोर्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार जयपूरच्या श्याम नगर परिसरात भाड्याने राहणाऱ्या रवी कुमार यांनी रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. रवी कुमार नोकरीच्या निमित्ताने जयपूर येथे राहत होता. मृत्युपूर्वी रवी कुमारने मोबाईलमध्ये व्हिडीओ शूट केला होता. यामध्ये त्याने सांगितले की, मी माझ्या बायकोवर खूप प्रेम करतो, पण आज ती मला पागल म्हणाली त्यामुळे मी आत्महत्या करत आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी कामाच्या निमित्ताने जयपूर येथे राहत होता. तो मूळचा बिहारचा रहिवासी आहे. त्याचे कुटुंब बिहारला त्याच्या मूळ गावी आहे. मंगळवारी दुपारी रवीने जयपूर येथे राहत्या घरात आत्महत्या केली. मात्र आत्महत्या करण्यापूर्वी रवीने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली होती. यामध्ये आत्महत्या का केली याचं कारण त्याने सांगितले आहे.

रवी कुमार आणि त्याच्या बायकोमध्ये फोनवरुन भांडण झालं. यावेळी बायकोने रागात रवीला पागल म्हणाली होती. मात्र पागल म्हणाल्याने रवीला ते सहन झालं नाही. माझे पत्नीवर खूप प्रेम आहे. पण ती मला पागली म्हणाली, त्यामुळे मला दु:ख झालं आहे. म्हणून मी माझे आयुष्य संपवत आहे असं रवीने व्हिडीओत नमूद केले आहे. घरातील केबरच्या वायरीने मंगळवारी दुपारी रवीने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळी पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी बिहारमधील रवी कुमारच्या घरच्यांना बोलावून घेतलं. त्यांच्याकडे चौकशी करणार आहेत असंही पोलिसांनी सांगितले.  तत्पूर्वी मृतदेहाची कोरोना चाचणीही करण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केले आहे. सध्या रवीचा मृतदेह हॉस्पिटलमधील शवगृहात ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :PoliceपोलिसSuicideआत्महत्या