मध्य प्रदेशातील इंदूर येथील रहिवासी राजा रघुवंशीच्या हत्या प्रकरणात मेघालय पोलीस सतत तपास करत आहेत. दररोज नवीन खुलासे होत आहेत. आता राजा रघुवंशी आणि सोनमबद्दल काही नवीन गोष्टी समोर आल्या आहेत. लग्नाच्या एक दिवस आधी झालेल्या कार्यक्रमात स्टेजवर सूत्रसंचालकाची भूमिका बजावणारा राजा रघुवंशीचा मित्र राज कुलहारे याने मोठा खुलासा केला आहे. लग्न ठरल्यानंतर सोनम राजाला बोलण्यासाठी वेळच देत नव्हती.
राज कुलहारे आणि राजा रघुवंशी हे एकमेकांचे चांगले मित्र होते. दोघेही त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल गोष्टी शेअर करायचे. राज कुल्हारे याने विस्तार न्यूजशी बोलताना सोनम आणि राजा रघुवंशीबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. "लग्न ठरल्यानंतर राजा आणि सोनम दिवसातून फक्त १० मिनिटं बोलत होते. अनेकदा सोनम व्यस्त असल्याचं कारण दाखवून राजाशी बोलण्यास नकार देत असे."
बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
"सोनमने त्याला इतका कमी वेळ दिला असला तरी, राजा रघुवंशीने कधीही याबद्दल तक्रार केली नाही. राजा खूप समजूतदार होता आणि तो म्हणायचा की, मीही व्यस्त आहे, पण मी तिच्यासाठी वेळ काढतो. लग्नानंतर सोनमला या सर्व गोष्टी समजाव्यात अशी अपेक्षा आहे. मी राजाला शॉपिंगसाठी घेऊन जायचो तेव्हा मी अनेकदा विचारायचो की वहिणीचा फोन आला की नाही?"
"आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
"माझा मित्र म्हणायचा की, ती जास्त बोलत नाही. सोनम स्वतः फोन करत नव्हती. अनेकदा राजाच तिला स्वतः फोन करायचा" असं राज कुलहारेने म्हटलं आहे. राजा रघुवंशी आणि त्याची पत्नी सोनम हनिमूनसाठी मेघालयला गेले होते. ते बेपत्ता झाले. त्यानंतर २ जून राजाचा मृतदेह आढळला. सोनमचा शोध सुरू असतानाचा काही दिवसांनी सोनमला हत्या प्रकरणात अटक करण्यात आली.