शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

पुलवामा हल्ला, काशिमिरातील स्फोट, रायगडात सापडलेल्या बॉम्बनंतर महाराष्ट्रात हाय अलर्ट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2019 21:13 IST

मुंबईनजीक अशा दोन घटना घडल्याने संबंध महाराष्ट्रात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

ठळक मुद्देमुंबईतील रेल्वे सेवा, रेल्वे स्थानकं, मेट्रो रेल्वे, मुंबईतली गर्दीची ठिकाणं, समुद्रकिनारे हे दहशतवाद्यांच्या टार्गेटवर आहेत. काशिमिरा येथील मॉलमध्ये झालेला छोटा स्फोट आणि रायगडमध्ये एसटीबसमध्ये सापडलेला बॉम्ब यामुळे मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा धोका सुरक्षा दलांनी अधोरेखीत केला आहे.

मुंबई - मिरा - भाईंदर पश्चिम द्रुतगती महामार्गावरील काशिमीरा ठाकूर मॉलजवळ नुकताच स्फोट झाला आहे. स्फोटानंतर घटनास्थळी पोलीस आणि बॉम्ब शोधक व नाशक पथके दाखल झाली. एका अज्ञात व्यक्तीने रस्त्यावर प्लास्टिकचा बॉल फेकल्याने त्याचा स्फोटा झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली. तर त्यानंतर दोन दिवसांपूर्वी कर्जत-आपटा एसटी बुधवारी रात्री आपटा एसटी डेपोत आली असता कंडक्टरला एसटी बसमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आली. मुंबईनजीक अशा दोन घटना घडल्याने संबंध महाराष्ट्रात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

एसटी बसमध्ये ही वस्तू आयईडी बॉम्ब असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री हा बॉम्ब निकामी केला. या घटनेनंतर रायगडजिल्ह्यात हाय अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला असून, लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. कर्जतहून आलेली एसटी क्र मांक एम एच १४, बीटी १५९६ आपटा बस डेपोमध्ये थांबली असताना कंडक्टरला पिशवीत बॉम्बसदृश्य वस्तू दिसली. त्याने माहिती देताच रसायनी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बॉम्बशोधक पथकाला या घटनेची माहिती दिली. याप्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला या घटना उघडकीस आल्यानंतर आता सुरक्षा यंत्रणांना डोळ्यांत तेल घालून पाहारा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर मुंबईसह महाराष्ट्रात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने देखील सतर्क राहण्याची गरज आहे. तुम्हाला अनोळखी संशयास्पद वस्तू आढळली तर संबंधित पोलिसांना कळवा. 

मुंबईतील रेल्वे सेवा, रेल्वे स्थानकं, मेट्रो रेल्वे, मुंबईतली गर्दीची ठिकाणं, समुद्रकिनारे हे दहशतवाद्यांच्या टार्गेटवर आहेत. याआधीही मुंबईतल्या लोकलला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले आहे. काशिमिरा येथील मॉलमध्ये झालेला छोटा स्फोट आणि रायगडमध्ये एसटीबसमध्ये सापडलेला बॉम्ब यामुळे मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा धोका सुरक्षा दलांनी अधोरेखीत केला आहे. लोकांमध्ये दहशत पसरवण्यासाठी या दोन्ही घटना घडल्याचा पोलिसांचा दावा आहे. सगळ्याच ठिकाणांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

टॅग्स :High Alertहाय अलर्टMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिसBombsस्फोटकेKarjatकर्जत