शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

पोलीसांच्या खबऱ्या आणि महत्वाच्या खटल्यातील मुख्य साक्षीदाराचा खून 

By पूनम अपराज | Updated: August 20, 2018 17:17 IST

फरार आरोपी असलेल्या अविनाशच्या मित्राला पकडण्यासाठी पोलीसांची तयारी 

मुंबई -  २०११ सालच्या आंबोली येथील दुहेरी हत्याकांड प्रकरणातला मुख्य साक्षीदार असलेल्या अविनाश सोलंकी उर्फ बालीचा (वय - ३८)  मृतदेह अंधेरी पूर्वेतील महाकाली केव्ह्ज रोडवरील अपोलो इंडस्ट्रिअल इस्टेटमधील गाळा क्रमांक ३४ मध्ये  सापडला आहे. अविनाश हा पोलिसांचा गेल्या २० वर्षांपासून अत्यंत महत्वाचा खबरी होता. त्याच्या डोक्यावर, पोटावर आणि गुप्तांगावर धारदार शस्त्राने आणि जड वस्तूने प्रहार केल्याचे अविनाशच्या मृतदेहावर असलेल्या जखमांवरून दिसून येत होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून फरार दोन आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. अविनाशच्या मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. 

आंबोली येथे २०११ मध्ये एक दुहेरी हत्याकांड घडले होते आणि शहरात एकाच खळबळ माजली होती. या दुहेरी हत्याकांडात अविनाश हा मुख्य साक्षीदार होता. त्याने या प्रकरणात शेवटपर्यंत त्याची साक्ष बदलली नव्हती. त्याने दिलेल्या साक्षीमुळेच या प्रकरणातल्या चार आरोपींना २०१६ मध्ये आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. ऑक्टोबर २०१३ मध्ये किनान सॅन्टोस आणि रियुबन फर्नांडिस या दोघांची हत्या करण्यात आली. ही हत्या चार जणांनी केली होती. जितेंद्र राणा, सतीश सुलाह, सुनील बोध आणि दीपक तिवल अशी या चौघांची नावे होती. या चौघांनी किनान सॅन्टोस आणि रियुबन फर्नांडिस या दोघांनाही चाकू हल्ला करून ठार केले होते. या दोघांवरही अनेक वार करण्यात आले होते. हे दोघेही गंभीर जखमी असताना त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. किनानचा मृत्यू या घटनेनंतर रूग्णालयात दाखल करतानाच झाला, तर रियुबनचा मृत्यू रूग्णालयात उपचार घेताना काही दिवसांनी झाला. या प्रकरणात अविनाश बाली हा मुख्य साक्षीदार होता. तसेच २००९ साली झालेल्या दिवंगत चकमक फेम विजय साळसकर यांचा खबरी इरफान मकबूल हसन खान उर्फ इरफान चिंदी याच्या खूनप्रकरणी देखील अविनाशने साक्षीदार म्हणून महत्वाची भूमिका पार पाडली होती. पोलिसांचा खबरी म्हणून अविनाशचे गुन्हे शाखेतील अनेक पोलिसांशी चांगले संबंध होते. 

वाईट संगतीमुळे झाला खून ?

दहा वर्षांपूर्वी अविनाशच्या एका मित्राला अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली होती. पाहिजे आरोपी  सध्या जामीनावर बाहेर असून अविनाश आणि त्याची चांगली मैत्री आहे. त्या मित्राला अमली पदार्थाचे व्यसन असून मित्राच्या कौटुंबिक कलहात अविनाश मध्यस्थी म्हणून भूमिका पार पडायचा. मात्र, नेमकं अविनाश आणि त्याच्या मित्रामध्ये असं काय घडलं कि ज्यामुळे अविनाशच्या खून झाला. याबाबत पोलीस तपास करत आहेत. मात्र, पोलीसांचा प्राथमिक अंदाज हा अविनाशच्या खून मित्रानेच केला असल्याचा आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. तसेच हा पाहिजे आरोपी एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

२०११ साली झालेल्या दुहेरी हत्याकांडाबाबत अधिक महिती... चौघांना आजन्म कारावास

टॅग्स :Crimeगुन्हाMumbaiमुंबईAndheriअंधेरीMurderखूनPoliceपोलिस