शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

पोटात भुकेचा आगडोंब अन् तळपता सूर्य!जीवाची काहिली झालेल्या आजोबांची पोलिसांनी करून दिली कुटुंबियांशी भेट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 19:31 IST

Missing Grandfather : लोकमत आणि पोलिसांमुळे अनोळखी आजोबा कुटुंबात सुखरूप पोहोचले

ठळक मुद्देरील अशी वाटणारी ही रियल स्टोरी नागपुरातील अनेक व्हाट्सअप ग्रुपची कव्हर स्टोरी बनलेली आहे.

नरेश डोंगरेनागपूर : वृद्धत्त्वामुळे स्मरणशक्तीने दगा दिलेले ८५ वर्षीय आजोबा तीन दिवसांपासून हिंगणा मार्गावर भटकत जीवन मरणादरम्यानची लढाई लढत होते. उपाशी असल्यामुळे त्यांच्या पोटात भुकेचा आगडोंब उसळला होता आणि तीव्र उन्हामुळे त्यांच्या जीवाची काहिली होत होती. ते रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्याला मदतीची याचना करत होते. मात्र कोरोनाच्या धाकामुळे कुणीच त्यांना मदत करीत नव्हते. ही बाब एका सद्गृहस्थाने लोकमत प्रतिनिधीला कळवली. त्यांनी डीसीपी नूरुल हसन यांना कळवले. लगेच सूत्र हलले अन या आजोबांना केवळ वैद्यकीय उपचारच नव्हे तर पोलिसांनी त्यांचे कुटुंबीयही मिळवून दिले. रील अशी वाटणारी ही रियल स्टोरी नागपुरातील अनेक व्हाट्सअप ग्रुपची कव्हर स्टोरी बनलेली आहे.

 

एका सद्गृहस्थाने लोकमत प्रतिनिधीला शनिवारी दुपारी ३.३० ला फोन करून अनोळखी आजोबांचा व्हाट्सएपवर फोटो पाठविला. फोन करून त्यांची दयनीय अवस्थाही सांगितली. लोकमत प्रतिनिधीने पोलीस उपायुक्त नुरुल हसन यांना ही माहिती देऊन मदत मागितली. त्यांनी लगेच प्रतापनगरचे ठाणेदार दिनकर ठोसरे यांना वृद्धाच्या मदतीसाठी घटनास्थळी पाठवले. ठोसरे तसेच त्यांचे सहकारी किशोर इंगळे, विशाल गुडे, संजय वानेरे आणि गजानन पवार यांनी अनोळखी आजोबांना मदतीचा हात देऊन मेडिकलमध्ये पोहोचवले. त्यांना वृद्धत्वामुळे स्मरणशक्तीची समस्या असल्याने आपले नाव व पत्ता सांगता येत नव्हता. तीन दिवसांपासून उपाशी असलेल्या अनोळखी आजोबांवर मेडिकलमध्ये डॉक्टरांनी उपचार सुरू केले. दुसरीकडे पोलिसांनी आजोबांची ओळख पटविण्यासाठी शहरातील सर्व पोलीस ठाण्यातील बेपत्ता व्यक्तीची यादी शोधली. त्यातून धागा मिळाला. वाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका मिसिंग कंप्लेंट वरून त्यांच्या घरच्यांना संपर्क करण्यात आला आणि अनोळखी आजोबांची ओळख पटली. त्यांचे नाव शंकरराव महादेवराव इंगोले असल्याचे स्पष्ट झाले. ते वाडी कंट्रोलमध्ये राहतात. पोलिसांनी लगेच इंगोले परिवाराशी संपर्क करून त्यांना बोलवून घेतले. फोटो वरून ओळख पटविल्यानंतर त्यांचे दोन्ही मुले आणि इतर नातेवाईक रविवारी दुपारी मेडिकलमध्ये पोहोचले. तेथून त्यांनी शंकरराव यांना ताब्यात घेऊन आपल्या घरी नेले.भरल्या कंठाने आभार शंकरराव निवृत्त रेल्वे पोलिस कर्मचारी होय. त्यांना इंद्रकुमार आणि नंदू ही दोन मुले आणि तीन मुली आहेत. सगळ्यांचे लग्न झाले असून त्यांची आर्थिक स्थितीही चांगली आहे. ते २९ एप्रिलला घरून निघून गेले. तेव्हापासून त्यांचे कुटुंबीय त्यांना सारखे शोधत होते. आज दुपारी पोलिसांनी शंकराव आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घडवून आणल्यानंतर कुटुंबीय ओक्साबोक्शी रडले. लोकमत मुळे तुमचे वडील मिळाल्याचे पोलिसांनी त्यांना सांगितले. त्यानंतर इंद्रकुमार यांनी फोन करून भरल्या कंठाने लोकमतचे आभार मानले.
सोशल मीडिया मीडियावरही कौतुक शनिवारी दुपारी अनोळखी आजोबा आणि पोलिसांच्या तत्परतेची स्टोरी लोकमत प्रतिनिधीने व्हाट्सअप ग्रुप वर टाकली. तेव्हापासून सोशल मीडियावरही लोकमत तसेच पोलिसांवर अनेकांनी प्रशंसा केली.

टॅग्स :Missingबेपत्ता होणंPoliceपोलिसnagpurनागपूरFamilyपरिवार