शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

नक्षलवाद्यांचा घातपाताचा कट पोलिसांनी उधळला; जमिनीत पेरलेले २ भूसुरूंग केले नष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 19:30 IST

Police busted Naxalist plot : जवानांनी आगेकूच केली असता नक्षलवादी जेवण बनविण्याच्या तयारीत होते. पण पोलीस जवानांचे पथक आल्याची कुणकुण लागताच त्यांनी तेथून पळ काढला.

ठळक मुद्देपोलीस पथकाने त्या परिसरात पुन्हा शोध अभियान राबविले असता पहाडाच्या पूर्व दिशेला एक आणि पश्चिम दिशेला एक असे दोन इलेक्ट्रीक वायर दिसून आले.

गडचिरोली : नक्षलविरोधी अभियान राबविणाऱ्या पोलीस पथकासोबत घातपात घडविण्याचा नक्षलवाद्यांचा कट पोलिसांनी उधळून लावला आहे. जंगलात जमिनीत पेरून ठेवलेले १० किलोग्रॅमचे दोन भूसुरूंग पोलिसांनी शोधून काढत ते बॉम्बनाशक पथकाच्या मदतीने नष्ट केले. गडचिरोली पोलीस दलासाठी हे यावर्षीचे मोठे यश ठरले आहे. ही कारवाई एटापल्ली पोलीस उपविभागांतर्गत कोकोटी जंगल परिसरात मंगळवार आणि बुधवारी करण्यात आली.प्राप्त माहितीनुसार, नक्षलविरोधी अभियान पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून, विशेष कृती दल व कोटमी पोलीस मदत केंद्राचे जवान मंगळवारी सकाळी कोकोटी गावाच्या उत्तरेला असलेल्या जंगलातील पहाडावर शोधमोहीम राबवत होते. त्याचवेळी पहाडी भागात नक्षलवाद्यांचे शिबिर लागले असल्याच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या. जवानांनी आगेकूच केली असता नक्षलवादी जेवण बनविण्याच्या तयारीत होते. पण पोलीस जवानांचे पथक आल्याची कुणकुण लागताच त्यांनी तेथून पळ काढला.

पोलीस पथकाने त्या परिसरात पुन्हा शोध अभियान राबविले असता पहाडाच्या पूर्व दिशेला एक आणि पश्चिम दिशेला एक असे दोन इलेक्ट्रीक वायर दिसून आले. त्यामुळे बॉम्बशोधक-नाशक पथकाला पाचारण करण्यात आले. या पथकाने तपासणी केली असता नक्षलवाद्यांनी जमिनीत पेरून ठेवलेले १० किलो वजनाचे दोन भूसुरूंग आढळले. ते जमिनीच्या बाहेर काढणे धोक्याचे असल्याने जागेवरच नष्ट करण्यात आले.

याप्रकरणी नक्षल कंपनी क्रमांक ४ चा कमांडर प्रभाकर उर्फ रवी उर्फ प्रकाल वीर उर्फ पदकाला स्वामी उर्फ लोकेटी चंदर राव तसेच कसनसूर दलम कमांडर आणि त्याच्या सहकाऱ्यांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनात आणि अपर पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. घातपाताचा कट उधळून लावण्याच्या या कामगिरीचे पोलीस अधीक्षक गोयल यांनी कौतुक करत हे अभियान अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले.

साहित्य टाकून जंगलात पळाले

ज्या ठिकाणी ही कारवाई झाली त्या ठिकाणी बऱ्याच संख्येने नक्षलवादी कॅम्प लावून होते. पण पोलीस पथक आल्याची चाहुल लागताच त्यांनी सर्व साहित्य तिथेच सोडून जंगलाच्या दिशेने पळ काढला. यावेळी नक्षलवाद्यांच्या पिट्टू बॅग, प्लास्टिक शिट, स्वयंपाकाचे भांडे, भाजीपाला, किराणा सामान, पिण्याचे पाणी, चप्पल, बूट, कपडे आणि इतर जीवनावश्यक साहित्य पोलिसांच्या हाती लागले.

 

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोलीPoliceपोलिस