शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

खळबळजनक! दोन रुपयांची 'पेप्सी' बनली ७ मुलांच्या मृत्यूचे कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 18:03 IST

Death Case : सकाळच्या सुमारास प्लॅस्टिकच्या पाईपमध्ये विकले जाणारे शीतपेय खाल्ल्याने प्रकृती खालावल्याचे मुलांच्या कुटुंबीयांनी वैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले.

सिरोही - सरूपगंजजवळील फुलाबाई खेडा येथे ७ बालकांचा मृत्यू झाल्याने वैद्यकीय विभागात खळबळ उडाली आहे. फुलाबाई खेडा येथे बालकांच्या मृत्यूचे कारण शोधण्यात ब्लॉक, जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरीय वैद्यकीय पथके गुंतलेली आहेत. गुरुवारी सकाळी आणखी दोन मुलांची प्रकृती खालावली, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सकाळच्या सुमारास प्लॅस्टिकच्या पाईपमध्ये विकले जाणारे शीतपेय खाल्ल्याने प्रकृती खालावल्याचे मुलांच्या कुटुंबीयांनी वैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले. 

डॉ. रामसिंग यादव म्हणाले की, अहवालाच्या आधारे असे मानले जाऊ शकते की, पाण्यापासून बनलेल्या  पदार्थांमध्ये आईस्क्रीम, कोल्ड ड्रिंक्स आणि इतर द्रवपदार्थ यांना प्रथमतः मृत्यूचे कारण मानले जात आहे. वैद्यकीय विभागाने गावातील अर्धा डझनहून अधिक लहान-मोठ्या दुकानांतून या पेप्सीचे नमुने घेतले असून इतर कोणत्याही बालकाला याचा फटका बसू नये म्हणून त्यांची विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. 

बुधवारी एकाच कुटुंबातील दोन मुलांचा मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी वैद्यकीय विभाग आणि पिंडवाडा उपविभागीय अधिकारी हसमुख कुमार यांनी संपूर्ण गावात घरोघरी जाऊन पाहणी करून आजारी मुलांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. फुलाबाई खेड्यात पसरलेल्या या आजाराने 7 बालकांचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे. वैद्यकीय पथक गावात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत आहे. एकाच कुटुंबातील तीन मुलांचा मृत्यू झाल्याने जणू दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सकाळपासूनच वैद्यकीय, प्रशासन व इतर पथके पीडित कुटुंबाकडून माहिती गोळा करत आहेत. गुरुवारी सकाळी अचानक दोन मुलांची प्रकृती खालावल्याने त्यांना सरपंच विपेश गरसिया यांनी रुग्णालयात नेले. एका मुलाची प्रकृती चिंताजनक आहे.तणाव आणि रक्ताच्या उलट्या यामुळे मुलांचा मृत्यू झालापीडित कुटुंबातील सदस्य ताराराम जानवा यांनी सांगितले की, त्यांच्या कुटुंबातील तीन मुलांचा एकत्र मृत्यू झाला. तिन्ही मुलांना तणाव, जखडणे आणि रक्ताच्या उलट्या झाल्या. मृत्यूच्या कारणाबाबत त्यांच्याकडे कोणतीही माहिती नाही.बनावट 'पेप्सी' बनवणाऱ्या कंपन्यांवर कारवाईची गरजनफ्यासाठी २ रुपयांची 'पेप्सी' बनणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे. ते बनवताना गुणवत्तेची काळजी घेतली जात नाही. गंजलेल्या भांड्यांमध्ये बर्फ साठवून ते तयार केले जाते. कोणता रंग आणि पाणी वापरले जाते, हेही तपासले पाहिजे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थानPoliceपोलिसDeathमृत्यूMedicalवैद्यकीय