शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

'उद्धव ठाकरे सरकार होरपळून राख होईल'; उमा भारती संतांच्या हत्येवरून संतापल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 13:48 IST

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्या उमा भारती यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

नवी दिल्ली : पालघरमधील दोन संत आणि त्यांच्या चालकाला जमावाने ठार मारल्यामुळे देशातील वातावरण तापलेले आहे. उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना या प्रकरणाला जातीय़ रंग देऊ नका असे सांगितले आहे. तर ठाकरे सरकारवर चोहोबाजुंनी टीकेची झोड उठली आहे. खेळाडू, अभिनेते यांच्यासह भाजपाच्या नेत्यांनीही तोंडसुख घेतले आहे. अखेर या घटनेचा तपास सीआयडीकडे देण्यात आला आहे. 

पालघर मॉब लिंचिंगप्रकरणी राज्य सरकारवर विश्वास नसून याचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणीही विरोधाकांनी केली आहे. या प्रकरणी अद्याप १०१ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. प्रथमदर्शनी अफवेमुळे झालेल्या गैरसमजातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. 

या प्रकरणावरून माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्या उमा भारती यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. पालघरमध्ये या महान संतांच्या हत्येमध्ये ठाकरे सरकार जळून खाक होईल. या घटनेला मी कधीही विसरणार नाही, असा संताप भारती यांनी व्यक्त केला. त्यांनी ट्विट करून म्हटले की, महाराष्ट्रत संतांची जी निर्घृण हत्या झाली त्यामध्ये एक ७० वर्षांचेही संत होते. ही घटना भयानक असून अंतरात्म्याला खूप मोठे दु:ख झाले आहे. व्हिडीओमध्ये गुन्हेगार स्पष्ट दिसत आहेत. पोलिसही आहेत तरीही हे महापाप झाले, जिथे उद्धव ठाकरेंचे सरकार आहे. 

मला असे वाटत आहे की, उद्धव ठाकरे यांचे सरकार या संतांच्या हत्येमध्ये जळून राख होणार आहे. जुन्या आखाड्यासोबत जवळचे संबंध आहेत. मी या घटनेला कधीच विसरणार नाही. देशाने या घटनेची निंदा करायला हवी, अशी टीकी उमा भारती यांनी केली.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेUma Bhartiउमा भारतीpalgharपालघरBJPभाजपा