शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
5
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
6
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
7
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
8
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
9
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
10
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
11
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
12
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
13
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
14
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
15
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
16
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
17
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
18
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
19
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
20
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

...अन्यथा खटला रद्द होईल, भीमा कोरेगाव प्रकरणी सुप्रिम कोर्टाने सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 16:47 IST

बुधवारी सुनावणी होऊपर्यंत संबधित मानवाधिकार कार्यकर्त्यांना नजर कैदेतच रहावे लागेल  

नवी दिल्ली - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी संपूर्ण देशभरात अटक करण्यात आलेल्या ५ मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या अटकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडली. सुनावणीवेळी कोर्टाने सर्व पुरावे पाहूनच यावर निर्णय घेण्यात येईल. जर यावर समाधानकारक पुरावे नसतील, तर हा खटला रद्दही होऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

त्याचप्रमाणे उभयपक्षांनी आपल्या भूमिका कोर्टात मांडल्या. महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात आपली बाजू मांडताना याप्रकरणी आमच्याकडे ठोस पुरावे आहेत. याआधारेच संबंधितांना अटक करण्यात आली असे सांगितले. मात्र, कोर्टाने यावर हे पुरावे पाहूनच निर्णय घेईल असे स्पष्ट करत पुढील सुनावणी बुधवारी निश्चित केली. पुढील सुनावणीच्या वेळी सरकारला आपले मत मांडण्यासाठी २० मिनिटे, तर पीडितांना १० मिनिटे देण्यात येणार आहेत. बुधवारी सुनावणी होईपर्यंत संबधित मानवाधिकार कार्यकर्त्यांना नजर कैदेतच रहावे लागेल. 

 

महाराष्ट्र सरकारने लॅपटॉप, हार्ड डिस्क यासारखे पुरावे मिळाल्याचे सांगितले आहे. याचिकाकर्त्यांनी कोर्टाकडे एसआयटी चौकशीची मागणी केली आहे. त्यावर कोर्टाने याचिकाकर्त्यांना याचिकेत तसे बदल करण्यास सांगितले आहे. याचिकाकर्त्यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी म्हणाले, की यामध्ये पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचा दावा केला जात आहे, परंतु पोलिसांच्या तक्रारीत तसा कोणताही उल्लेख नाही. महाराष्ट्र पोलिसांनी देशभरातून नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून सुधा भारद्वाज, वरवरा राव, गौतम नवलखा, अरूण फेरेरा आणि वेरनॉन गोंजाल्विस या ५ मानवाधिकार कार्यकर्त्यांना अटक केली होती.  

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSupreme Courtसर्वोच्च न्यायालयBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचार