शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

...अन्यथा खटला रद्द होईल, भीमा कोरेगाव प्रकरणी सुप्रिम कोर्टाने सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 16:47 IST

बुधवारी सुनावणी होऊपर्यंत संबधित मानवाधिकार कार्यकर्त्यांना नजर कैदेतच रहावे लागेल  

नवी दिल्ली - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी संपूर्ण देशभरात अटक करण्यात आलेल्या ५ मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या अटकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडली. सुनावणीवेळी कोर्टाने सर्व पुरावे पाहूनच यावर निर्णय घेण्यात येईल. जर यावर समाधानकारक पुरावे नसतील, तर हा खटला रद्दही होऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

त्याचप्रमाणे उभयपक्षांनी आपल्या भूमिका कोर्टात मांडल्या. महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात आपली बाजू मांडताना याप्रकरणी आमच्याकडे ठोस पुरावे आहेत. याआधारेच संबंधितांना अटक करण्यात आली असे सांगितले. मात्र, कोर्टाने यावर हे पुरावे पाहूनच निर्णय घेईल असे स्पष्ट करत पुढील सुनावणी बुधवारी निश्चित केली. पुढील सुनावणीच्या वेळी सरकारला आपले मत मांडण्यासाठी २० मिनिटे, तर पीडितांना १० मिनिटे देण्यात येणार आहेत. बुधवारी सुनावणी होईपर्यंत संबधित मानवाधिकार कार्यकर्त्यांना नजर कैदेतच रहावे लागेल. 

 

महाराष्ट्र सरकारने लॅपटॉप, हार्ड डिस्क यासारखे पुरावे मिळाल्याचे सांगितले आहे. याचिकाकर्त्यांनी कोर्टाकडे एसआयटी चौकशीची मागणी केली आहे. त्यावर कोर्टाने याचिकाकर्त्यांना याचिकेत तसे बदल करण्यास सांगितले आहे. याचिकाकर्त्यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी म्हणाले, की यामध्ये पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचा दावा केला जात आहे, परंतु पोलिसांच्या तक्रारीत तसा कोणताही उल्लेख नाही. महाराष्ट्र पोलिसांनी देशभरातून नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून सुधा भारद्वाज, वरवरा राव, गौतम नवलखा, अरूण फेरेरा आणि वेरनॉन गोंजाल्विस या ५ मानवाधिकार कार्यकर्त्यांना अटक केली होती.  

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSupreme Courtसर्वोच्च न्यायालयBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचार