शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

NCBचा मोठा खुलासा, दाऊदचा निकटवर्तीय हाजी अलीच्या सांगण्यावरुन ड्रग्ज भारतात आले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 19:11 IST

Drugs Seized: एनसीबीने ऑपरेशन 'सागर मंथन'द्वारे 3300 किलो ड्रग्स जप्त केले आहे.

Navy NCB Operation Sagar Manthan: देशात अमली पदार्थाविरोधात काम करणाऱ्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने बुधवारी (28 फेब्रुवारी) ऑपरेशन 'सागर मंथन' अंतर्गत देशातील आतापर्यंतची ड्रग्सची सर्वात मोठी खेप जप्त केली. यापूर्वी एनसीबी केवळ जमिनीवर अंमली पदार्थांवर कारवाई करत असे, मात्र या कारवाईत नौदल आणि गुजरात एटीएसच्या मदतीने समुद्रात 3300 किलो ड्रग्ज जप्त करून एनसीबीने इतिहास रचला.

आंतरराष्ट्रीय बाजारात या ड्रग्सची किंमत सुमारे 1300 कोटी रुपये आहे. या प्रकरणी एनसीबीने 5 आरोपींना अटक केली होती, त्यापैकी 1 पाकिस्तानी आणि 4 इराणचे आहेत. आरोपींच्या चौकशीदरम्यान पाकिस्तानी कट उघडकीस आला. ड्रग्जच्या एवढ्या मोठ्या खेपेमागे पाकिस्तानचा सर्वात मोठा ड्रग स्मगलर आणि दाऊद इब्राहिमचा जवळचा हाजी सलीम याचा हात असल्याचेही तपासात समोर आले आहे. एनसीबी प्रकरणात पाकिस्तानचे नाव येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही एनसीबीने केलेल्या ऑपरेशन समुद्रगुप्तमध्ये दाऊदच्या जवळच्या हाजी सलीमचे नाव पुढे आले होते.

'दाऊदच्या जवळच्या व्यक्तीने कट रचला होता'

एनसीबीचे डीडीजी ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितले की, ''चौकशीदरम्यान पाकिस्तानी नागरिक मोहम्मद चारीझाईने सांगितले की, त्याने हाजी मोहम्मदच्या सांगण्यावरून ड्रग्जची इतकी मोठी खेप भारतात आणली होती. दाऊदचा जवळचा सहकारी हाजी सलीम प्रत्येक वेळी नवीन नाव वापरतो. यावेळी त्याने स्वत:चे नाव हाजी मोहम्मद असे ठेवले. हे पाच जण इराणच्या चाबहार बंदरातून एकत्र निघाले होते. त्या बंदरावरून ते थेट भारताच्या दिशेने आले.''

'एनसीबी प्रत्येक वेळी पाकिस्तानचे प्रयत्न हाणून पाडेल'ज्ञानेश्वर सिंह यांच्या म्हणण्यानुसार, ''पाकिस्तान भारताविरुद्ध सातत्याने मोठे षड्यंत्र रचत आहे. मात्र एनसीबी प्रत्येक वेळी पाकिस्तानचे प्रयत्न हाणून पाडत आहे. भारत भौगोलिकदृष्ट्या डेथ क्रेसेंट आणि डेथ ट्रँगल दरम्यान स्थित आहे. यामुळे, हा एक व्यवहार बिंदू आहे आणि इथला खपही मोठा आहे. जो काही पैसा येतो, तो सर्व पैसा गुन्हेगारी नेटवर्कमध्ये वापरला जातो. यातून आपल्याला कमकुवत आणि पोकळ करण्याचा कट आहे, ज्याला आम्ही योग्य उत्तर देत आहोत.''

'हवालाद्वारे पैसे हस्तांतरित केले'"एवढ्या मोठ्या ड्रग्जच्या खेपेचे पैसे हवालाच्या माध्यमातून हस्तांतरित करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. एवढेच नाही तर एनसीबीने 1 सॅटेलाइट फोन आणि 4 मोबाईल फोन जप्त केले आहेत. या संपूर्ण नेटवर्कला उखडून काढता यावे यासाठी फॉरेन्सिकली तपासणीही केली जात आहे. एनसीबी आता हे शोधण्याचा प्रयत्न करत आहे की ज्या व्यक्तीने भारतात अमली पदार्थांची एवढी मोठी खेप मिळवली, ती व्यक्ती कोण आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ कोणाकडे पोहोचणार होते. लवकरच याचा खुलासा होईल," असंही  ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितले.

 

टॅग्स :NCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोDrugsअमली पदार्थPakistanपाकिस्तानIndiaभारतGujaratगुजरात