शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

मध्य प्रदेशचा रमन राघव! 8 वर्षात 33 जणांची निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 09:28 IST

मी 33 जणांना मुक्ती दिली, असं त्यांना हसत हसत पोलिसांना सांगितलं

भोपाळ: गेल्या 8 वर्षात 33 जणांची हत्या करणाऱ्या टोळीला मध्य प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीनं मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड आणि ओदिशात 33 जणांचे खून केले. ट्रक चालक आणि क्लिनर्सचे खून करुन ट्रकमधील मालाची विक्री करायची, अशी या टोळीची मोडस ऑपरेन्डी होती. गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनी या टोळीची चौकशी सुरू केली. त्यातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या असून अनेक हत्या प्रकरणांचं गूढ उलगडलं आहे. मध्य प्रदेशच्या मंडीदिप भागात टेलरिंगचं काम करणारा आदेश खामरा या टोळीचा म्होरक्या होता. 2010 साली त्यानं अमरावतीमध्ये पहिला खून केला. त्यानंतर दुसरी हत्या नाशिकमध्ये केली. यानंतर हत्यांचं सत्र सुरू झालं. यानंतर खामरा आणि त्याच्या टोळीनं मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये अनेकांचे खून केले. ट्रक चालक आणि क्लिनर्सची हत्या करुन त्यांची ओळख पटेल, असे पुरावे नष्ट करायचे आणि मग त्यांचे मृतदेह निर्जन स्थळी गाडून टाकायचे, अशा पद्धतीनं ही टोळी काम करायची. मात्र तरीही काही मृतदेह आढळून आले आणि पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांकडून या हत्यांचा तपास सुरू असताना गेल्या आठवड्यात आदेश खामराला अटक करण्यात आली. त्यानं तब्बल 30 हत्यांची कबुली दिल्यानं पोलीस चक्रावून गेले. यानंतर त्यानं काल आणखी तीन खुनांची माहिती पोलिसांना दिली. उत्तर प्रदेशमधील सुलतानपूरच्या जंगलातून खामराला ताब्यात घेण्यात आलं. यानंतर त्यानं एका पाठोपाठ एक खुनांची कबुली दिली. यामुळे गेल्या आठ वर्षांमध्ये शेजारच्या राज्यांमध्ये झालेल्या खुनांचा उलगडा होऊ लागला. आशियाई क्रीडा स्पर्धेत तायक्वांदोत कांस्य पदक पटकावणाऱ्या आणि सध्या पोलीस अधीक्षक म्हणून काम करणाऱ्या बिट्टू शर्मा यांनी मोठ्या हिमतीनं खामराला अटक केली. विशेष म्हणजे खामराला ताब्यात घेताना शर्मा यांना त्यांची पार्श्वभूमी इतकी गंभीर असेल, याबद्दल कोणतीही कल्पना नव्हती. इतक्या जणांना संपवण्याचं कारण काय, असा प्रश्न पोलिसांनी चौकशीदरम्यान खामराला विचारला. त्यावर ती सर्व माणसं अतिशय हलाखीत जगत होती. त्यामुळे मी त्यांना मुक्ती दिली, असं उत्तर खामरानं हसत हसत पोलिसांना दिलं. 

टॅग्स :MurderखूनMadhya Pradeshमध्य प्रदेशMaharashtraमहाराष्ट्रUttar Pradeshउत्तर प्रदेशBiharबिहार