शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पुढचे 72 तास निर्णायक, पाकिस्तानच्या रेल्वे मंत्र्याचे वक्तव्य   

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2019 17:55 IST

पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद अहमद यांनी आज युद्ध झाल्यास हे तिसरे आणि शेवटचे युद्ध असेल अशी धमकी देत पुढील ७२ तास निर्णायक असतील असे शेख यांनी सांगितले. 

ठळक मुद्देया कारवाईमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर युद्ध झालंच तर दुसऱ्या युद्धापेक्षा हे सर्वात मोठं आणि अंतिम युद्ध असेल अशी माहिती शेख यांनी दिली.येत्या ७२ तासांत शांततेचा पवित्रा घेणार की युद्ध पुकारणार याबाबत निर्णय घेण्यात येईल असे शेख पुढे म्हणाले. 

इस्लामाबाद - भारतीय हवाई दलाने (IAF) मंगळवारी मध्यरात्री नियंत्रण रेषा (LOC)ओलांडून धडाकेबाज कारवाई करत जैश ए मोहम्मदचं कंबरडं मोडलं. पुलवामातील हल्ल्याची जबाबदारी जैशने स्वीकारली होती. या हल्ल्याच्या सुत्रधारांचा भारतीय लष्कर आणि काश्मीर पोलिसांनी 100 तासांमध्ये खात्मा केला. या कारवाईमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद अहमद यांनी आज युद्ध झाल्यास हे तिसरे आणि शेवटचे युद्ध असेल अशी धमकी देत पुढील ७२ तास निर्णायक असतील असे शेख यांनी सांगितले. 

शेख यांनी पुढे सांगितले की, "हे एक भयानक युद्ध असेल कारण पाकिस्तान पूर्णपणे तयार आहे. पाकिस्तानात जवळजवळ युद्धजन्य स्थितीत आहे. रेल्वे आधीच आपत्कालीन परिस्थितीच्या कायद्यांचे पालन करीत आहे, "असे ते म्हणाले. जर युद्ध झालंच तर दुसऱ्या युद्धापेक्षा हे सर्वात मोठं आणि अंतिम युद्ध असेल अशी माहिती शेख यांनी दिली. येत्या ७२ तासांत शांततेचा पवित्रा घेणार की युद्ध पुकारणार याबाबत निर्णय घेण्यात येईल असे शेख पुढे म्हणाले.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानwarयुद्धIndiaभारतrailwayरेल्वेministerमंत्री