शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

"माझ्या मुलाला पोलीस ऑफिसर व्हायचं होतं"; एकुलत्या एका लेकाच्या हत्येनंतर वडिलांचा टाहो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 10:33 IST

नववीच्या वर्गात शिकणाऱ्या वैभवच्या हत्येने त्याचं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे.

दिल्लीतील वजिराबाद येथे नववीच्या वर्गात शिकणाऱ्या वैभवच्या हत्येने त्याचं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. वैभवचे वडील विकास गर्ग यांनी मुलाच्या हत्येनंतर टाहो फोडला. तो आमचा एकुलता एक मुलगा होता. माझ्या मुलाला पोलीस ऑफिसर व्हायचं होतं. माझ्या कुटुंबाचा एकमेव आधार, वंशाचा दिवा गेला असं म्हटलं आहे. वैभवला पोलीस व्हायचं असल्याने तो रोज व्यायाम करायचा. त्याची उंची ६ फूट होती. तीन दिवसांपूर्वीपर्यंत सर्व काही चांगलं चाललं होतं. अचानक सर्व उद्ध्वस्त झालं असं वैभवच्या आईने सांगितलं.

विकास गर्ग यांनी मुलाच्या अपहरणापासून ते खंडणी कॉल आणि हत्येपर्यंतच्या संपूर्ण घटनेबद्दल सांगितलं. "वैभव २३ मार्च रोजी संध्याकाळी ७:२५ वाजता घराबाहेर पडला होता. त्याने त्याच्या आईला सांगितलं होतं की १५ ते २० मिनिटांत परत येईन. मी कामावर गेलो होतो. रात्री ९.३० वाजता कामावरून घरी परत आलो तेव्हा पत्नीने वैभवचा मोबाईल स्विच ऑफ असल्याचं सांगितलं."

"वैभवचा फोन आला नाही"

"मला वाटलं की, फोनची बॅटरी संपली असावी, कारण असं अनेक वेळा घडलं. जेव्हा फोनची बॅटरी संपली तेव्हा तो मित्राच्या किंवा ओळखीच्या व्यक्तीच्या मोबाईलवरून कॉल करायचा. त्या रात्री कुटुंबातील सदस्यांनी ११ वाजेपर्यंत वाट पाहिली. वैभवचा फोन आला नाही. मी रात्री ११ ते १२ च्या सुमारास चौकशी केली. जेव्हा काहीच माहिती मिळाली नाही तेव्हा थेट पोलीस स्टेशनला गेलो. त्यांना सर्व माहिती दिली."

"तुमचा मुलगा आमच्या ताब्यात आहे"

"सोमवारी (२४ मार्च) दुपारी १:४० वाजता वैभवच्या नंबरवरून खंडणीचा फोन आला. फोन करणाऱ्या मुलाने म्हटले, तुमच्याकडे तीन दिवसांचा वेळ आहे, १० लाख रुपये खंडणी द्या. तुमचा मुलगा आमच्या ताब्यात आहे, जर तुम्ही पोलिसांना सांगितलं तर आम्ही तुमच्या मुलाला मारून टाकू. हे ऐकून मला धक्काच बसला. यानंतर कॉल डिस्कनेक्ट झाला. मोबाईलही बंद झाला. त्यानंतर दुसरा कोणताही फोन आला नाही" असं विकास गर्ग यांनी सांगितलं आहे. वैभवचं अपहरण करून नंतर त्याची हत्या करण्यात आली.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरणPoliceपोलिसdelhiदिल्ली