शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

बदल्याची आग! बॉयफ्रेंडने दिला धोका, मुलाच्या अपहरणाचा कट; ५ मुलांच्या आईने घेतला सूड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 18:49 IST

एका मुलाच्या अपहरण प्रकरणाची उकल करताना पोलिसांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे.

बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यातील मनियारी पोलीस स्टेशन हद्दीतील जमरुआ गावात एका मुलाच्या अपहरण प्रकरणाची उकल करताना पोलिसांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आता मुलाच्या आईलाच अटक केली आहे. पाच मुलांच्या या आईने तिच्या प्रियकराला धडा शिकवण्यासाठी अपहरणाचा खोटा कट रचला होता. पण पोलिसांनी तिचा कट उधळून लावला आणि मुलाला शोधून काढलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, १८ जानेवारी रोजी रेणू देवी नावाच्या महिलेने मुझफ्फरपूरच्या मनियारी पोलीस ठाण्यात तिच्या मुलाच्या अपहरणाची तक्रार दाखल केली होती.  तक्रारीत तिने वैशाली जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या कौशल कुमार आणि अभिषेक कुमार या दोन ओळखीच्या लोकांविरुद्ध एफआयआर दाखल केला. पोलिसांनी १९ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला. सर्वप्रथम आरोपींचं लोकेशन शोधलं.

आवश्यक माहिती आणि पुरावे गोळा केल्यानंतर, पोलिसांनी आरोपी नंबर एक कौशल कुमारला बोलावलं. त्याच्याशी झालेल्या संभाषणानंतर भलतीच माहिती समोर आली. आरोपीने सांगितलं की त्याचे त्या महिलेसोबत प्रेमसंबंध होते. तो तिला नियमितपणे पैसे पाठवत असे. पण काही महिन्यांपूर्वीच त्याचं लग्न झाल्यामुळे तिने त्याच्यासोबतचे नातं संपवलं. त्याला त्या महिलेवर मुलाचं अपहरण केल्याचा संशय होता. या प्रकरणाबाबत पोलीसही आता अधिक सतर्क झाले.

पोलिसांसमोर धक्कादायक सत्य

रेणू देवीच्या मागे पोलिसांचं पथक तैनात करण्यात आलं. ती तिच्या आईवडिलांच्या घरी पोहोचली तेव्हा पोलिसांनी तिथे छापा टाकला. पोलिसांसमोर एक धक्कादायक सत्य समोर आलं. महिलेने ज्या मुलाचं अपहरण झाल्याचा आरोप केला होता तो तिच्या बहिणीसोबत तिच्या माहेरी होता. पोलीस पथकाने महिलेला पोलीस ठाण्यात आणलं. तिची कसून चौकशी केली असता तिने संपूर्ण सत्य सांगितलं. तिने प्रेमसंबंधाची कबुली दिली आणि कट रचल्याचं उघड झालं.

प्रियकरासोबत करायचं होतं लग्न

रेणू देवी यांनी पोलिसांना सांगितलं की, तिला तिच्या प्रियकरासोबत लग्न करायचं होतं. पण त्याने तिला फसवलं आणि दुसऱ्या मुलीशी लग्न केलं. तिला याच हे खूप वाईट वाटलं. त्याला धडा शिकवण्यासाठी तिने हा कट रचला. यानंतर तिने आपल्या मुलाला बहिणीकडे पाठवलं आणि अपहरणाचा गुन्हा दाखल केला. तिचा प्रियकर बंगळुरूमध्ये काम करतो. तिला वाटत होतं की, पोलिसांनी त्याला अटक करावी आणि बिहारला आणावं जेणेकरून त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होईल.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहारPoliceपोलिसKidnappingअपहरण