शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

बदल्याची आग! बॉयफ्रेंडने दिला धोका, मुलाच्या अपहरणाचा कट; ५ मुलांच्या आईने घेतला सूड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 18:49 IST

एका मुलाच्या अपहरण प्रकरणाची उकल करताना पोलिसांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे.

बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यातील मनियारी पोलीस स्टेशन हद्दीतील जमरुआ गावात एका मुलाच्या अपहरण प्रकरणाची उकल करताना पोलिसांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आता मुलाच्या आईलाच अटक केली आहे. पाच मुलांच्या या आईने तिच्या प्रियकराला धडा शिकवण्यासाठी अपहरणाचा खोटा कट रचला होता. पण पोलिसांनी तिचा कट उधळून लावला आणि मुलाला शोधून काढलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, १८ जानेवारी रोजी रेणू देवी नावाच्या महिलेने मुझफ्फरपूरच्या मनियारी पोलीस ठाण्यात तिच्या मुलाच्या अपहरणाची तक्रार दाखल केली होती.  तक्रारीत तिने वैशाली जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या कौशल कुमार आणि अभिषेक कुमार या दोन ओळखीच्या लोकांविरुद्ध एफआयआर दाखल केला. पोलिसांनी १९ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला. सर्वप्रथम आरोपींचं लोकेशन शोधलं.

आवश्यक माहिती आणि पुरावे गोळा केल्यानंतर, पोलिसांनी आरोपी नंबर एक कौशल कुमारला बोलावलं. त्याच्याशी झालेल्या संभाषणानंतर भलतीच माहिती समोर आली. आरोपीने सांगितलं की त्याचे त्या महिलेसोबत प्रेमसंबंध होते. तो तिला नियमितपणे पैसे पाठवत असे. पण काही महिन्यांपूर्वीच त्याचं लग्न झाल्यामुळे तिने त्याच्यासोबतचे नातं संपवलं. त्याला त्या महिलेवर मुलाचं अपहरण केल्याचा संशय होता. या प्रकरणाबाबत पोलीसही आता अधिक सतर्क झाले.

पोलिसांसमोर धक्कादायक सत्य

रेणू देवीच्या मागे पोलिसांचं पथक तैनात करण्यात आलं. ती तिच्या आईवडिलांच्या घरी पोहोचली तेव्हा पोलिसांनी तिथे छापा टाकला. पोलिसांसमोर एक धक्कादायक सत्य समोर आलं. महिलेने ज्या मुलाचं अपहरण झाल्याचा आरोप केला होता तो तिच्या बहिणीसोबत तिच्या माहेरी होता. पोलीस पथकाने महिलेला पोलीस ठाण्यात आणलं. तिची कसून चौकशी केली असता तिने संपूर्ण सत्य सांगितलं. तिने प्रेमसंबंधाची कबुली दिली आणि कट रचल्याचं उघड झालं.

प्रियकरासोबत करायचं होतं लग्न

रेणू देवी यांनी पोलिसांना सांगितलं की, तिला तिच्या प्रियकरासोबत लग्न करायचं होतं. पण त्याने तिला फसवलं आणि दुसऱ्या मुलीशी लग्न केलं. तिला याच हे खूप वाईट वाटलं. त्याला धडा शिकवण्यासाठी तिने हा कट रचला. यानंतर तिने आपल्या मुलाला बहिणीकडे पाठवलं आणि अपहरणाचा गुन्हा दाखल केला. तिचा प्रियकर बंगळुरूमध्ये काम करतो. तिला वाटत होतं की, पोलिसांनी त्याला अटक करावी आणि बिहारला आणावं जेणेकरून त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होईल.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहारPoliceपोलिसKidnappingअपहरण