शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

क्षुल्लक कारणावरुन शिकाऊ डॉक्टरची हत्या; ४८ तासांत आरोपीला केलं गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2021 8:56 PM

एमबीबीएस अंतिम वर्षाचा विद्यार्थी अशोक सुरेंद्र पाल (२४) रा. मेडिकल कॅम्पस याची मुलींच्या वसतिगृहाजवळच चाकूने भोसकून हत्या करण्यात आली

यवतमाळ : संपूर्ण राज्यात खळबळ निर्माण करणाऱ्या एमबीबीएस विद्यार्थ्याच्या हत्येतील आरोपींना पोलिसांनी अटक केली. आरोपींनी दिलेला कबुलीजबाब त्याहीपेक्षा धक्कादायक आहे. डॉक्टरला दुचाकीचा कट लागल्यावरून वाद झाला. या वादात त्याच्यावर चाकूने वार करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षकांनी शनिवारी सायंकाळी झालेल्या पत्रपरिषदेत सांगितले.

एमबीबीएस अंतिम वर्षाचा विद्यार्थी अशोक सुरेंद्र पाल (२४) रा. मेडिकल कॅम्पस याची मुलींच्या वसतिगृहाजवळच चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. या गुन्ह्यात सुरुवातीला वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. सुरेंद्र भुयार यांनी दिलेल्या तक्रारीवरून तुषार शंकर नागदेवते (२४), आकाश दिलीप गोफणे (२१) दोघे रा. वाघापूर यांना अटक करण्यात आली होती. मात्र त्यांच्या गुन्ह्यातील सहभागाबद्दल पोलिसांना ठोस पुरावे हाती लागले नव्हते. त्यामुळे या घटनेचा तपास सुरूच होता. त्यासाठी सहा पथके गठित करण्यात आली.

यात यवतमाळ शहर, अवधूतवाडी, स्थानिक गुन्हे शाखा, सायबर सेलचा समावेश होता. जवळपास शंभर खबऱ्यांच्या माध्यमातून घटनेच्या अनुषंगाने माहिती गोळा करण्यात आली. सीडीआर, एसडीआर, डमडाटा याची पडताळणी केल्यानंतर मुख्य आरोपीचा शोध लागला. ऋषिकेश गुलाबराव सवळे (२३) रा. महावीरनगर, प्रवीण संजीव गुंडजवार (२४) रा. सावित्रीबाई फुले सोसायटी व एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल, चाकू जप्त केला.

ही कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर अधीक्षक डाॅ.के.ए. धरणे, पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, नंदकिशोर पंत, सहायक निरीक्षक अमोल पुरी, गणेश वनारे, विवेक देशमुख, जनार्दन खंडेराव, योगेश रंधे, जमादार बंडू डांगे, नीलेश राठोड, बबलू चव्हाण, सलमान शेख, किशोर झेंडेकर, सुमित पाळेकर, अजय निंबोळकर, रोशनी जोगळेकर, गजानन क्षीरसागर, अमित कदम, मिलिंद दरेकर, नीलेश भुसे, अल्ताफ शेख यांनी केली.

तपास पथकाला एक लाखांचे बक्षीस

 

४८ तासात संपूर्ण राज्यात खळबळ निर्माण करणाऱ्या गुन्ह्यातील आरोपींना शस्त्रासह अटक केली. ही कारवाई करणाऱ्या पोलीस पथकांना एसपी डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी रोख एक लाख रुपयांचे बक्षीस, जीएसटी व सीनोट, गुड रिमार्क जाहीर केला.

अशी घडली घटना

तीनही आरोपी दुचाकीवरून दारूची खेप टाकून महाविद्यालय परिसरातून जात होते. त्यावेळी मुलींच्या वसतिगृहाजवळ दुचाकीचा अशोक पाल याला कट लागला. यावरून शाब्दिक वाद झाला. या वादातच आरोपीने अशोकच्या छातीत व पोटाच्या खाली वार केले. दोन्ही वार वर्मी लागल्याने अशोकचा जागीच मृत्यू झाला, अशी कबुली आरोपींनी दिली आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नका

त्रिपुरातील घटनेनंतर त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, चुकीच्या प्रचाराला बळी पडू नये असे आवाहन एसपी डाॅ. दिलीप पाटील भुजबळ यांनी केले आहे.

टॅग्स :PoliceपोलिसYavatmalयवतमाळ