शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

सैराटची पुनरावृत्ती! वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावून अपहरण करत वडिलांनीच केली लेकीची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 10:52 IST

Crime News : प्रेम विवाहामुळे नाराज झालेल्या एका वडिलांनी संतापाच्या भरात आपल्या मुलीची निर्घृण हत्या केली आहे.

नवी दिल्ली - हरियाणामध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. सैराटची पुनरावृत्ती झाली आहे. प्रेम विवाहामुळे नाराज झालेल्या एका वडिलांनी संतापाच्या भरात आपल्या मुलीची निर्घृण हत्या केली आहे. वाढदिवसाच्या बहाण्याने तिला घरी बोलावून अपहरण करत वडिलांनी मुलीची हत्या केल्याची भयंकर घटना उघड झाली आहे. सोनीपतमधील या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. आरोपी वडिलांनी मुलीच्या हत्येनंतर तिचा मृतदेह मेरठजवळील एका कालव्यात फेकून दिला आहे. अखेर आरोपीला अटक करण्यात पोलिसांनी यश आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राई पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील मुकीमपूर येथील ही धक्कादायक घटना आहे. तरुणीचा मृत्यूपूर्वीचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे, ज्यात ती म्हणत आहे की तिचा मृत्यू झाल्यास याला जबाबदार तिचे वडील, भाऊ आणि मित्र असतील. पोलिसांनी याप्रकरणी मुलीच्या वडिलांना अटक केली आहे. यानंतर आरोपीनं दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी तरुणीचा मृतदेह कालव्यात शोधण्यास सुरुवात केली आहे. तरुणीच्या पतीने वडील विजयपाल यांच्यासह इतरही चार नातेवाईकांवर अपहरणाचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. 

वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने आम्हाला दोघांना बोलावण्यात आलं होतं. तो काही अंतरावरच थांबला होता. यानंतर ठाण्याच्या समोरच त्याच्या पत्नीचं अपहरण केलं गेलं अशी माहिती तरुणीच्या पतीने पोलिसांना दिली आहे. मुकीमपूर येथील रहिवासी असलेल्या तरुणीने 2020 मध्ये शेजारीच राहणाऱ्या एका तरुणासोबत प्रेमविवाह केला होता. दोघांनीही आपल्या कुटुंबीयांच्या विरोधात जात घरातून पळून जाऊन लग्न केलं होतं. दोघांचं घर गावात शेजारीच होतं. या लग्नामुळे मुलीचे कुटुंबीय नाराज होते. लग्नानंतर हे दोघंही कुठेतरी लपून राहात होते.

लग्नामुळे नाराज असलेल्या मुलीच्या कुटुंबीयांनी तरुणीला आणि तिच्या पतीला खोटं सांगितलं की आता या लग्नाला त्यांचा विरोध नाही. तसेच जुन्या गोष्टी विसरून दोघांनाही परत येण्यास सांगण्यात आलं. यानंतर दोघंही कुटुंबीयांसोबत फोनवर बोलू लागले. मुलीचे वडील विजयपाल यांनी सहा जुलै रोजी आपल्या मुलीला फोन केला आणि म्हणाले की सात जुलैला त्यांचा वाढदिवस आहे. तुम्ही दोघंही वाढदिवस साजरा करण्यासाठी घरी या. सर्व मिळून मिठाई खायची आणि जुन्या गोष्टी विसरून नव्याने सुरुवात करायची. मुलांकडून चुका होत असतात.

दोघंही विजयपालच्या जाळ्यात अडकले आणि आपल्या वडिलांना फोन करत आपण राई ठाण्याच्या समोर उभं असल्याचं तरुणीने सांगितलं. विजयपाल काही आरोपींसोबत कारमध्ये आला आणि आपली मुलगी कनिका हिला सहा जुलै रोजी कारमध्ये घेऊन गेला. तरुणीचा पती वेदप्रकाश दूर उभा राहून हे सर्व पाहत होता. दोन दिवसांनंतर मुलीच्या पतीने आपल्या सासऱ्यांना फोन केला आणि पत्नीसोबत बोलायचं असल्याचं सांगितलं. यावर त्याला असं उत्तर मिळालं, की सध्या ती झोपली आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा फोन केला असता असं सांगण्यात आलं की ती आपल्या आत्याच्या घरी गेली आहे. दोन दिवसांनंतर पुन्हा फोन केला असता ती आपल्या मावशीच्या घरी गेल्याचं सांगण्यात आलं. 

वेदप्रकाशला संशय आला आणि त्यानं पोलिसांना याबाबत माहिती दिली. 20 जुलै रोजी वेदप्रकाश पुन्हा पोलीस ठाण्यात गेला आणि आपल्या पत्नीच्या हत्येची आणि अपहरणाची शंका त्यानं बोलून दाखवली. यानंतर पोलिसांनी पुन्हा तपास सुरू केला. तक्रारीनंतर पोलिसांनी कसून चौकशी करताच मुलीच्या वडिलांनी सांगितलं की सहा जुलै रोजीच ठाण्याच्या समोरून घेऊन जात मुलीची हत्या केली आणि तिचा मृतदेह मेरठजवळील एका कालव्यात फेकून दिला. तो तिला गावी घेऊन गेला नाही. सोबतच आपल्याला या गोष्टीचा काहीही पश्चाताप नसल्याचंही त्याने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीIndiaभारतPoliceपोलिस