शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

भारत-वेस्ट इंडीज क्रिकेट सामन्याला सुरक्षा पुरवण्यास मुंबई पोलीस असमर्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 9:58 PM

मरिन लाईन्स येथील वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या भारत-वेस्ट इंडीज टी-20 क्रिकेट सामन्याला सुरक्षा देणे शक्‍य नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले

ठळक मुद्देअयोध्येतील बाबरी मशीद ६ डिसेंबर १९९२ रोजी पाडण्यात आली होती. अयोध्या निकाल सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिल्याने ६ डिसेंबरला सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर विशेष महत्त्व आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनासाठी ६ डिसेंबरला लाखो अनुयायी मुंबईत दादर, चैत्यभूमी  येथे दाखल होतात.

मुंबई - भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात ६ डिसेंबरला वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या टी-20 सामन्याला सुरक्षा पुरवण्यास मुंबई पोलिसांनी असमर्थता व्यक्त केली आहे. त्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तसंजय बर्वे यांची भेट घेऊन सामन्याला सुरक्षा देण्याची विनंती केली.अयोध्येतील बाबरी मशीद ६ डिसेंबर १९९२ रोजी पाडण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या हिंसाचारामुळे हा दिवस संवेदनशील मानला जातो. त्याचबरोबर अयोध्या निकाल सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिल्याने ६ डिसेंबरला सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर विशेष महत्त्व आले आहे. त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनासाठी ६ डिसेंबरला लाखो अनुयायी मुंबईत दादर, चैत्यभूमी  येथे दाखल होतात. त्यामुळे मरिन लाईन्स येथील वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या भारत-वेस्ट इंडीज टी-20 क्रिकेट सामन्याला सुरक्षा देणे शक्‍य नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असल्याची माहिती पोलीस आयुक्त प्रणय अशोक यांनी दिली आहे. त्यानंतर एमसीएच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्या भेटीची वेळ मागितली होती. त्यानुसार एमसीएच्या शिष्टमंडळाने आज पोलीस आयुक्त बर्वे यांची भेट घेऊन चर्चा केली. मुंबई पोलिसांकडे मनुष्यबळ अपुरे असल्यामुळे क्रिकेट सामन्यादरम्यान वानखेडे स्टेडियमला सुरक्षा देण्यास पोलिसांनी नकार दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे हा सामना होण्याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, याबाबत पोलीस आयुक्त आणि एमसीएच्या भेटीबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळू शकली नाही. एमसीएने अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतला नसल्याचे सांगण्यात आले आहे. 

टॅग्स :Sanjay Barveसंजय बर्वेPoliceपोलिसcommissionerआयुक्तT20 Cricketटी-20 क्रिकेट