शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

नवरदेवाला लावली जात होती हळद, गर्लफ्रेन्डच्या हत्येप्रकरणी उचलून घेऊन गेले पोलीस!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2021 9:26 AM

कॅंट पोलीस स्टेशन क्षेत्रातील कोल्हूपुरामध्ये पोलिसांनी फिल्मी स्टाइल केली आणि घरात हळद लावत असलेल्या नवरदेवाला उचलून घेऊन गेले.

(Image Credit : Aajtak)

अनेक सिनेमात आपण पाहिले असेल की, लग्न सुरू असतं आणि ऐनवेळी पोलीस येऊन एखाद्या गुन्ह्यात नवरदेवाला उचलून घेऊन जातात. मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh Crime News) गुनामधून(Guna) अशीच एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. कॅंट पोलीस स्टेशन क्षेत्रातील कोल्हूपुरामध्ये पोलिसांनी फिल्मी स्टाइल केली आणि घरात हळद लावत असलेल्या नवरदेवाला उचलून घेऊन गेले. नवरदेव बनलेल्या संजय कोरीला अटक झाल्यावर जो खुलासा झाला त्याने सर्वांनाच धक्का बसला.

Aajtak ने दिलेल्या वृत्तानुसार, शिवपुरी जिल्ह्यातील बदरवासमध्ये ब्युटी पार्लर चालवणारी महिला लक्ष्मी तोमरचा मृतदेह ३० एप्रिलला बेवारस स्थितीत आढळून आला होता. कोरोना कर्फ्यू दरम्यान महिलेचा मृतदेह आढळून आल्याने पोलिसही हैराण झाले होते. त्यात महिलेजवळ पोलिसांना असा कोणताही पुरावा मिळाला नाही ज्याने ते पुढे तपास करू शकतील. (हे पण वाचा : काकाने केली पुतण्याची हत्या; शेतीवरून झालेला वाद जीवावर बेतला )

 

पोलिसांनी महिलेची ओळख पटवण्यासाठी सोशल मीडियावर महिलेच्या मृतदेहाचा फोटो शेअऱ केला होता. तेव्हा ५ मे रोजी पोलिसांना माहिती मिळाली की, महिला ब्युटी पार्लर चालवत होती आणि तिचं नाव लक्ष्मी तोमर आहे. नंतर एक एक धागा जोडत पोलिसांनी शेवटी संजय कोरीला अटक केली.  आरोपीने पोलिसांसमोर कबूल केलं की, त्याचे आणि महिलेचे अनैतिक संबंध होते. आरोपीने सांगितले की,  महिला त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती. आणि त्याला तिच्यासोबत लग्न करायचं नव्हतं. महिलेचा आधीच घटस्फोट झाला होता. (हे पण वाचा : दे धक्का! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पत्नीने पतीला मागितले २० लाख रूपये, कॉल करून म्हणाली - '...तर तुझा जीव घेईन!')

आरोपीने पोलिसांना सांगितले की, महिला लक्ष्मी तोमर बदरवासमध्ये ब्युटी पार्लर चालवत होती. ती नेहमी खरेदीसाठी गुना येथे जात होती. गुनात महिलेची भेट संजयसोबत झाली. दोघांचं प्रेम प्रकरण सुरू झालं. महिलेचा घटस्फोट झाला होता. त्यामुळे तिने संजयसोबत लग्न करण्याचा विचार केला होता. मात्र, संजय यावरून नाराज होता. संजयला घरातील लोकांच्या मर्जीनुसार लग्न करायचं होतं. नंतर संजयने महिलेला दूर करण्याचा प्रयत्न केला. पण ते शक्य  झालं नाही.

नंतर संजयने महिलेच्या हत्येचा कट रचला. बदरवासला पोहोचल्यावर संजयने महिलेला गुना येथे येण्यास तयार केलं. संजयने तिला सांगितले की, लग्न करूया. संजयच्या बोलण्यात ती फसली आणि त्याच्यासोबत गेली. मात्र, रस्त्याच्या मधेच ३० एप्रिलला संजयने महिलेचा गळा चिरून तिची हत्या केली. नंतर तिचा मृतदेह झाडांमध्ये फेकून दिला.

८ मे रोजी संजयचं लग्न होणार होतं. त्याआधीच हळदीला पोलिसांनी संजयला अटक केली. हळदीचा कार्यक्रम सुरू असताना पोलिसांना त्याला उचललं. संजयच्या मोबाइलमध्ये दोघांच्या अनैतिक संबंधाचे अनेक रहस्य होते. तो मोबाइल त्याने नाल्यात फेकला होता. नंतर हा मोबाइल शोधण्यात आला.  त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारी