Shocking! ऐनवेळी गर्लफ्रेन्डने लग्नास नकार दिला, तरूणाने उचललं हे धक्कादायक पाउल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 17:21 IST2021-08-12T17:18:39+5:302021-08-12T17:21:57+5:30
दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, मध्य प्रदेशच्या धारमधील शेतकरी आई-वडिलांचा मुलगा राजेश भामेचं पोलीस दलात भरती होण्याचं स्वप्न होतं.

Shocking! ऐनवेळी गर्लफ्रेन्डने लग्नास नकार दिला, तरूणाने उचललं हे धक्कादायक पाउल
प्रेयसीसोबतचं लग्न फिसकटल्याने तणावात असलेल्या तरूणानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कॉलेजमध्ये असताना तरूणीसोबत मैत्री आणि नंतर प्रेम झालं. इतकंच नाही तर दोघांच्या लग्नाची बोलणीही सुरू होती. पण अचानक तरूणीने संपर्क तोडला. त्यामुळे एकाएकी धक्का बसल्याने त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, मध्य प्रदेशच्या धारमधील शेतकरी आई-वडिलांचा मुलगा राजेश भामेचं पोलीस दलात भरती होण्याचं स्वप्न होतं. त्यासाठीच्या तयारीसाठी तो इंदुरला जाण्यासही तयार होता. त्याच्या वडिलांनी त्याला शिक्षणासाठी इंदूरला पाठवलं. काही दिवसांत त्याची बहिणदेखील शिक्षणासाठी इंदूरला आली आणि ते दोघं एकाच घरात राहून शिक्षण पूर्ण करत होते. (हे पण वाचा : "मी तिला विसरू शकत नाही..."; सुसाईड नोट लिहून पतीनं स्मशानभूमीतच घेतला गळफास)
इंदुरला शिकत असताना राजेशची ओळख कॉलेजमधील एका तरूणीशी झाली. नंतर प्रेम आणि लग्नाची बोलणीही सुरू होती. आपल्या आवडत्या मुलीसोबत लग्न होणार असल्याने राजेश आनंदी होता. पण तरूणीने अचानक राजेशसोबतचा संपर्क तोडला. त्याला भेटणंही ती टाळत होती. यामुळे तो तणावात होता.
रिपोर्टनुसार, आत्महत्येपूर्वी त्यानं लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये त्याच्या प्रेमप्रकरणाविषयी सविस्तर माहिती दिली आहे. मात्र त्यातील तपशील पोलिसांनी अद्याप जाहीर केला नाही. बुधवारी राजेश आणि त्याची बहिण जेवण करून झोपले होते. बहिणीला सकाळी जाग आली, तेव्हा समोर जे दिसलं ते पाहून बहिणीला धक्का बसला. तिला राजेशचा छताला लटकणारा मृतदेह दिसला. तिनं तातडीनं पोलिसांना फोन करून याची कल्पना दिली. पोलीस या प्रकऱणी अधिक तपास करत आहेत.