शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
5
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
6
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
7
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
8
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
9
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
10
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
11
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
12
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
13
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
14
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
15
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
16
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
17
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
18
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
19
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
20
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...

लग्नमंडपात पोहोचला नवरदेव पण क्षणात झालं होत्याचं नव्हतं; सप्तपदी आधीचं झाला गोळीबार अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 12:21 IST

Crime News : वरात घेऊन नवरा मुलगा हा नवरीकडे आला असता काही लोकांनी त्याला गोळी मारली. यामध्ये नवरदेव गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मो

नवी दिल्ली - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना अनेक धक्कादायक घटना सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक घटना बिहारमध्ये घडली आहे. लग्नमंडपात नवरदेव पोहचताच एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं आहे. सप्तपदी आधीचं गोळीबार झाल्याची भयंकर घटना समोर आली आहे. वरात घेऊन नवरा मुलगा हा नवरीकडे आला असता काही लोकांनी त्याला गोळी मारली. यामध्ये नवरदेव गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोतिहारीमधील एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, मुरली गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. बाईक वरून आलेल्या आरोपींनी नवरदेवावर गोळीबार केला आणि ते पसार झाले. घटनेने एकच खळबळ उडाली. लग्नमंडपात यामुळे गोंधळ झाला आणि लोकांमध्ये भीतीचे वातावरण देखील निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. नवरदेवाची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. गोळीबाराचा आवाज ऐकून लग्नासाठी उपस्थित असलेल्या लोकांनी खूपच आरडाओरडा सुरू केला. काही वेळ गोंधळाचं वातावरण आणि लोकांची धावाधाव सुरू होती. 

मनोज कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरदेवाच्या कार चालकाला ताब्यात घेण्यात आलं असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. नवरदेवावर नेमका का गोळीबार करण्यात आला याचा पोलीस शोध घेत असून या प्रकरणाचा अधिक तपास केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  उत्तर प्रदेशच्या एटामध्ये एक अजब घटना घडली आहे. नवरी एक आणि वराती दोन असं काहीसं पाहायला मिळालं आहे. लग्न मंडपात एकाच मुलीसोबत लग्न करण्यासाठी चक्क दोन वराती आल्या. त्यानंतर हैराण करणारी बाब म्हणजे नवरीने आधी आलेल्या नवरदेवाच्या गळ्यात हार घातला आणि नंतर आलेल्या नवरदेवासोबत सात फेरे घेऊन नांदायला गेली. या प्रकाराने वऱ्हाडी मात्र चांगलेच चक्रावून गेले आहेत. 

एका लग्नाची अजब गोष्ट! नवरी एक आणि वराती दोन; एकाच्या गळ्यात घातला हार, दुसऱ्यासोबत नांदायला

उत्तर प्रदेशच्या एटा जिल्ह्यातील सिरांव या गावात ही अजब घटना घडली आहे. सिरांवमध्ये एक नवरदेव वरात घेऊन नवरीच्या घरी आला. त्यामुळे नवरीने नवरदेवाच्या गळ्यात हार घातला. त्यानंतर काही वेळाने तिच्या घरी दुसरी वरात आली. तेव्हा नवरीने ज्याच्या गळ्यात हार घातला तो नवरदेव वयाने मोठा असल्याचं सांगून त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर दुसऱ्या नवरदेवाबरोबर सात फेरे घेतले आणि त्याच्याबरोबर नांदायला गेली. यामुळे आधी आलेली वऱ्हाडी मंडळी संतप्त झाली आणि त्यांनी गोंधळ घातला. मुलाकडच्यांनी नवरी आणि तिच्या कुटुंबियांविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच पोलिसांनी मुलीचे वडील आणि काका यांना ताब्यात घेतलं असून या प्रकरणाची अधिक चौकशी केली जात आहे. सिरांव गावातील या लग्नाची सध्या सर्वत्रच जोरदार चर्चा रंगली आहे.

टॅग्स :marriageलग्नBiharबिहारPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी