शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
5
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
6
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
7
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
8
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
9
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
10
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
11
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
12
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
13
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
14
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
15
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
16
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
17
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
18
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
19
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
20
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

भरला संसार मोडून प्रियकरासोबत पळाली ३ मुलांची आई, जाताना पैसे अन् दागिनेही लुटून गेली; पतीची पोलिसांत धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 08:47 IST

Crime UP : प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. पण कधी कधी प्रेम माणसाला इतकं स्वार्थी बनवतं की, त्याला रक्ताच्या नात्याचीही किंमत उरत नाही.

प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. पण कधी कधी प्रेम माणसाला इतकं स्वार्थी बनवतं की, त्याला रक्ताच्या नात्याचीही किंमत उरत नाही. अशीच एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या झांसी जिल्ह्यात घडली आहे. इथे एका निर्दयी आईने आपल्या तीन निरागस मुलांना वाऱ्यावर सोडून प्रियकरासोबत पळ काढला. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय घडलं?

ढिवकई गावात रामनरेश यादव नावाचा एक कष्टकरी व्यक्ती आपल्या कुटुंबासोबत राहत होता. मोलमजुरी करून तो आपल्या पत्नी आणि तीन मुलांचा सांभाळ करत होता. घरची सगळी जबाबदारी त्याच्या खांद्यावर होती.

रामनरेश दिवसभर कामावर बाहेर असताना, त्याच्या पत्नीचे दुसऱ्या गावातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले. हळूहळू हे संबंध इतके वाढले की, तिने आपल्या कुटुंबाचा, मुलांचा आणि समाजाचा विचार न करता एक धक्कादायक निर्णय घेतला.

मुलांना सोडून प्रियकरासोबत पळाली!

काही दिवसांपूर्वी रामनरेशची पत्नी घरातून अचानक गायब झाली. जाताना तिने घरातील रोकड आणि दागिनेही सोबत नेले. इतकंच नव्हे, तर तिने आपल्या तीन लहान मुलांनाही घरी एकटं सोडलं. ज्या आईने आपल्या मुलांची काळजी घ्यायला हवी, तीच त्यांना सोडून गेली.

रामनरेश कामावरून घरी आल्यावर त्याला पत्नी घरात नसल्याचे कळले. तेव्हा त्याच्या शेजाऱ्यांनी घडलेला प्रकार त्याला सांगितला. आई सोडून गेल्यामुळे निरागस मुलं घरात रडत होती. त्यांच्या रडण्याचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी त्यांची काळजी घेतली.

पतीची पोलिसांत तक्रार

या घटनेने रामनरेशला मोठा धक्का बसला आहे. पत्नीने विश्वासघात केल्याची भावना त्याच्या मनात आहे. त्याने पत्नी आणि तिच्या प्रियकराविरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पत्नीने घर सोडून जाण्यापूर्वी मुलांचा विचारही केला नाही, अशी तक्रार त्याने केली आहे.

सध्या मुलांची काळजी रामनरेशचे कुटुंबीय आणि गावकरी घेत आहेत. पण, मुलांच्या डोळ्यात आईपासून दूर राहिल्याचे दुःख स्पष्ट दिसत आहे. या घटनेमुळे ढिवकई गावात संतापाचे वातावरण आहे. एका आईने असं कृत्य कसं काय केलं, असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mother of three elopes with lover, steals cash, jewelry.

Web Summary : In Uttar Pradesh, a mother abandoned her three children, eloping with her lover and stealing cash and jewelry. The husband has filed a police complaint, and the community is outraged by her actions.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश