शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
4
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
5
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
6
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
7
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
8
किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
9
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
10
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
11
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
12
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
13
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
14
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
15
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
16
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
17
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
18
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
19
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
20
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 

प्रियकरासोबत पळून गेली दोन मुलांची आई, एक वर्षाने परतली तर पंचायतने दिली 'ही' शिक्षा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 11:47 IST

दोन मुलांची आई एका अविवाहित तरूणाच्या प्रेमात पडली आणि दोन्ही मुलांना व पतीला सोडून त्याच्यासोबत पळून गेली.

'जब प्यार किया तो डरना क्या' तुम्ही हा डायलॉग तर नक्कीच ऐकला असेल. मात्र, झारखंडच्या एका प्रेमी युगुलाला प्रेम करणं आणि पुन्हा गावात परत येणं चांगलंच महागात पडलं आहे. चतरा या गावातील दोन मुलांची आई एका अविवाहित तरूणाच्या प्रेमात पडली आणि दोन्ही मुलांना व पतीला सोडून त्याच्यासोबत पळून गेली. इतकेच नाही तर महिला आधीच विवाहित असूनही दोघांनी लग्नही केलं.

इथपर्यंत तर सगळं काही ठिक होतं. पण जेव्हा पळून गेल्यावर आणि लग्न केल्यावर एक वर्षांनी जेव्हा दोघे गावात परतले तेव्हा तिथेच नाही तर आजूबाजूच्या गावातही एकच गोंधळ उडाला. घाईघाईत चार गावातील लोकांनी पंचायत बोलवली आणि पती-पत्नीला शिक्षा सुनावली. दोघांना गाव सोडून जाण्याचा आदेश देण्यात आला. जेव्हा यानेही मन नाही भरलं तर गावातील महिलांनी आधी तरूणाने तर नंतर महिलेचे केस कापण्याचा प्रयत्न केला. (हे पण वाचा : बुलेट दिली नाही म्हणून नवरदेवाचा हाय व्होल्टेज ड्रामा, घोडीवरून उतरून सर्वांसमोर काढले कपडे आणि...)

महिलेच्या या वागण्याने तिचा पती इतका संतापला होता की, त्याने पत्नीच्या प्रियकराच्या वडिलांना मारहाण केली. त्यानंतर पंचायतने पती-पत्नीला गाव सोडून जाण्याचा आदेश दिला. गावात राहणाऱ्या राजेश भुईयांने गावातीलच विशेश्वर भुईयांची पत्नी बबीता देवीसोबत फरार झाला होता. ती दोन मुलांची आई आहे. आरोपी महिलेला घेऊन साधारण १ वर्षापर्यंत फऱार होता. जेव्हा गावातील लोकांना याबाबत समजलं तर त्यांनी त्यांच्या बहिष्कार घातला. (हे पण वाचा : अजबच! स्वत:च्या अपत्यासोबत विवाह करण्याची इच्छा, परवानगीसाठी घेतली कोर्टात धाव)

पंचायतने त्यांना शिक्षा सुनावताना हेही सांगितले की, गावात पुन्हा अशी घटना घडू नये म्हणून हा निर्णय घेतला जात आहे. यादरम्यान काही लोक संतापले आणि त्यांनी दोघांचं टक्कल करून त्यांना चपलांचा हार घालून त्यांची धींड काढण्याची मागणी केली होती. तर महिलेच्या पहिल्या पतीने तिच्या दुसऱ्या पतीच्या वडिलांना भर लोकांमद्ये बेदम मारहाण केली. 

टॅग्स :JharkhandझारखंडCrime Newsगुन्हेगारी