शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

प्रियकरासोबत पळून गेली दोन मुलांची आई, एक वर्षाने परतली तर पंचायतने दिली 'ही' शिक्षा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 11:47 IST

दोन मुलांची आई एका अविवाहित तरूणाच्या प्रेमात पडली आणि दोन्ही मुलांना व पतीला सोडून त्याच्यासोबत पळून गेली.

'जब प्यार किया तो डरना क्या' तुम्ही हा डायलॉग तर नक्कीच ऐकला असेल. मात्र, झारखंडच्या एका प्रेमी युगुलाला प्रेम करणं आणि पुन्हा गावात परत येणं चांगलंच महागात पडलं आहे. चतरा या गावातील दोन मुलांची आई एका अविवाहित तरूणाच्या प्रेमात पडली आणि दोन्ही मुलांना व पतीला सोडून त्याच्यासोबत पळून गेली. इतकेच नाही तर महिला आधीच विवाहित असूनही दोघांनी लग्नही केलं.

इथपर्यंत तर सगळं काही ठिक होतं. पण जेव्हा पळून गेल्यावर आणि लग्न केल्यावर एक वर्षांनी जेव्हा दोघे गावात परतले तेव्हा तिथेच नाही तर आजूबाजूच्या गावातही एकच गोंधळ उडाला. घाईघाईत चार गावातील लोकांनी पंचायत बोलवली आणि पती-पत्नीला शिक्षा सुनावली. दोघांना गाव सोडून जाण्याचा आदेश देण्यात आला. जेव्हा यानेही मन नाही भरलं तर गावातील महिलांनी आधी तरूणाने तर नंतर महिलेचे केस कापण्याचा प्रयत्न केला. (हे पण वाचा : बुलेट दिली नाही म्हणून नवरदेवाचा हाय व्होल्टेज ड्रामा, घोडीवरून उतरून सर्वांसमोर काढले कपडे आणि...)

महिलेच्या या वागण्याने तिचा पती इतका संतापला होता की, त्याने पत्नीच्या प्रियकराच्या वडिलांना मारहाण केली. त्यानंतर पंचायतने पती-पत्नीला गाव सोडून जाण्याचा आदेश दिला. गावात राहणाऱ्या राजेश भुईयांने गावातीलच विशेश्वर भुईयांची पत्नी बबीता देवीसोबत फरार झाला होता. ती दोन मुलांची आई आहे. आरोपी महिलेला घेऊन साधारण १ वर्षापर्यंत फऱार होता. जेव्हा गावातील लोकांना याबाबत समजलं तर त्यांनी त्यांच्या बहिष्कार घातला. (हे पण वाचा : अजबच! स्वत:च्या अपत्यासोबत विवाह करण्याची इच्छा, परवानगीसाठी घेतली कोर्टात धाव)

पंचायतने त्यांना शिक्षा सुनावताना हेही सांगितले की, गावात पुन्हा अशी घटना घडू नये म्हणून हा निर्णय घेतला जात आहे. यादरम्यान काही लोक संतापले आणि त्यांनी दोघांचं टक्कल करून त्यांना चपलांचा हार घालून त्यांची धींड काढण्याची मागणी केली होती. तर महिलेच्या पहिल्या पतीने तिच्या दुसऱ्या पतीच्या वडिलांना भर लोकांमद्ये बेदम मारहाण केली. 

टॅग्स :JharkhandझारखंडCrime Newsगुन्हेगारी