शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

म्यानमार, बांगलादेशातून भारतात सर्वाधिक तस्करी; ८३३ किलो सोने जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 06:49 IST

वर्षभरात डीआयआरने परदेशातून ४०५ कोटींचे सोने जप्त केले.

मुंबई : गेल्या आर्थिक वर्षात केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेने (डीआरआय) परदेशातून भारतात तस्करी करून आणलेले ८३३ किलो सोने पकडले आहे. या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ४०५ कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे, आजवर भारतात होणारी सोन्याची तस्करी ही मध्य-पूर्वेकडील देशांतून होत होती. आता मात्र या तस्करीच्या मार्गामध्ये लक्षणीय बदल झाला असून, सर्वाधिक तस्करी ही म्यानमार येथून होत असल्याची माहिती पुढे आली आहे.

सोमवारी डीआरआयने आपला सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा तस्करी अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालातून ही माहिती पुढे आली आहे. या अहवालानुसार, आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये डीआरआयने हे सोने पकडले आहे. पकडलेल्या एकूण सोन्यापैकी ३७ टक्के सोने हे म्यानमार येथून भारतात आले होते, तर २० टक्के सोने हे बांगलादेशाच्या सीमेकडून भारतात आले होते. सोन्याच्या तस्करीच्या बदललेल्या मार्गाचे विश्लेषण करताना डीआरआयने नमूद केले आहे की, कोविड काळामध्ये आंतरराष्ट्रीय आणि आंतरदेशीय विमान वाहतूक मोठ्या प्रमाणावर बंद होती, तसेच गेल्या काही वर्षांत विमानतळांवर तस्करी रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित आहेत. त्यामुळेच तस्करांनी आपला मार्ग बदलत ईशान्य भारताच्या मार्गे तस्करी सुरू केली आहे. भौगोलिकदृष्ट्या, ईशान्य भारतातून म्यानमार, बांगलादेश, भूतान, नेपाळ आणि चीन, अशा पाच देशांच्या सीमा भारताशी जोडल्या जातात. आजवर येथून तस्करी फारशी होत नव्हती. मात्र, आता हा ट्रेण्ड सुरू झाल्याचे दिसून येते.

अमली पदार्थांच्या तस्करीतही विक्रमी वाढगेल्या आर्थिक वर्षात देशात अमली पदार्थांच्या तस्करीत त्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत विक्रमी वाढ झाली आहे. कोकेनच्या तस्करीमध्ये ३६ टक्क्यांची वाढ झाली आहे. ३१० किलो कोकेन, ८८४ किलो मेथामॅफ्टाइन, ३४१० किलो हेरॉइन, २६,९४६ किलो गांजादेखील जप्त केला आहे. देशात विविध ठिकाणी झालेल्या अमली पदार्थांच्या तस्करीच्या प्रकरणात डीआरआयने एकूण १३१ लोकांना अटक केली आहे.

टॅग्स :Smugglingतस्करी