शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
3
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
4
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
5
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
6
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
8
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
9
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
10
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
11
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
12
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
13
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
14
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
15
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
16
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
17
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
18
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
19
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
20
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
Daily Top 2Weekly Top 5

फुटबॉलच्या मैदानावर भीषण नरसंहार; दहशतवाद्यांकडून 50 लोकांची निर्घृण हत्या

By हेमंत बावकर | Updated: November 11, 2020 14:58 IST

ISIS terrorists : दहशतवाद्यांनी महिला आणि मुलांचे अपहरण केले आहे. रायफली हातात घेऊन दहशतवादी नारे देत होते. त्यांनी ग्रामस्थांच्या घरांना आगीदेखील लावल्या.

आफ्रिकी देश मोझांबिकमध्ये मोठा नरसंहार झाला आहे. काबो डेलडागो प्रांतामध्ये इसिसच्यादहशतवाद्यांनी एका फुटबॉल मैदानात 50 हून अधिक लोकांची मुंडकी उडविली आहेत. एवढेच नाही तर त्यांच्या शरिराचे तुकडे तुकडे करण्यात आले. या हत्याकांडामध्ये 15 मुलांचाही समावेश आहे. 

या लोकांच्या मृतदेहांचे तुकडे गावाच्या आजुबाजुच्या जंगलात तसेट फुटबॉल मैदानात सापडले आहेत. मोझांबिकच्या सरकारी मीडियानुसार दहशतवाद्यांनी सोमवारी अनेक गावांवर हल्ला केला. यानंतर तेथील लोकांना फुटबॉलच्या मैदानावर घेऊन गेले. येथे त्यांची क्रूरतेने हत्या करण्यात आली. 

दहशतवाद्यांनी महिला आणि मुलांचे अपहरण केले आहे. रायफली हातात घेऊन दहशतवादी नारे देत होते. त्यांनी ग्रामस्थांच्या घरांना आगीदेखील लावल्या. काबोच्या डेलडागो प्रांतामध्ये आयएसआयएसचे दहशतवादी 2017 पासूनच असे हल्ले करत आले आहेत. तेव्हा 200 हून जास्त लोकांची हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत 2000 हून अधिक लोक मारले गेले आहेत. तर चार लाखांहून अधिक लोक बेघर झाले आहेत. 

गेल्या मार्चमध्ये अफगाणिस्तानची राजधानी काबुल ISIS च्या दहशतवाद्यांनी केलेल्या मोठ्या हल्ल्याने हादरली होती. मध्यरात्रीच्या सुमारास शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या गुरुद्वारावर आत्मघातकी दहशतवाद्यांनी बेछुट गोळीबार केला. या हल्ल्यामध्ये 27 जणांचा मृत्यू झाला होता. तर आठ जण जखमी झाले होते. दरम्यान दुसऱ्या दिवशी पुन्हा शीखांच्या निवासी कॅम्पजवळ बॉम्बहल्ला करण्यात आला होता. या प्रकारावर भारतीय दूतावासाने नाराजी व्यक्त केली आहे.

हा हल्ला या देशांतील अल्पसंख्यांकांवर झालेल्या मोठ्या हल्ल्यांपैकी एक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त केला होता. तसेच दु:ख व्यक्त केले होता. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही निषेध व्यक्त करताना कोरोना व्हायरस पसरलेला असताना अल्पसंख्यांकांच्या धार्मिक स्थळांवर हल्ला करणे भ्याडपणाचे लक्षण आहे. यामुळे हल्लेखोरांची सैतानी मानसिकता उघड होत आहे, असे म्हटले होते. 

भारत लक्ष्यावरदहशतवादासंदर्भात संयुक्त राष्ट्र संघाच्या एका अहवालात चेतावणी देण्यात आली आहे की, केरळ आणि कर्नाटकात ISIS च्या दहशतवाद्यांची संख्या सर्वाधिक असू शकते आणि भारतीय उपखंडातील अल कायदाच्या दहशतवादी संघटना या भागात असल्याचेही त्यांनी नमूद करत  हल्ला घडवून आणण्यासाठी कट रचत आहेत. या दहशतवादी संघटनेत भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि म्यानमारमधील 150 ते 200 दहशतवादी असल्याचा या अहवालात म्हटले आहे.

टॅग्स :ISISइसिसSouth Africaद. आफ्रिकाTerror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवाद