शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

मल्ल्याची लवकरच कसाबच्या बराकमध्ये रवानगी, संसदीय समितीच्या सदस्यांनी दिली कारागृहाला भेट

By पूनम अपराज | Published: August 30, 2018 7:36 PM

या शिष्टमंडळाने तुरुंगातील सोयीसुविधांचा आढावा घेतला असून याचा अहवाल लवकरच संसदेत सादर करणार आहेत.

 मुंबई - किरकोळपासून गंभीर गुन्ह्यांप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या गुन्हेगारांनी खचाखच भरलेल्या मुंबई मध्यवर्ती कारागृह म्हणजेच आर्थर रोड तुरुंगाची पाहणी करण्यासाठी संसदीय समितीच्या सदस्यांचे शिष्टमंडळ आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास आर्थर रोड कारागृहात आले होते. या शिष्टमंडळाने तुरुंगातील सोयीसुविधांचा आढावा घेतला असून याचा अहवाल लवकरच संसदेत सादर करणार आहेत. आर्थर रोड कारागृहाला भेट देणाऱ्या संसदीय समितीच्या सदस्यांच्या शिष्टमंडळात भूपेंद्र यादव (भाजपा)  चेअरमन, संसदीय समिती, सोपान राज गुप्ता (भाजपा)  राज्यसभा सभासद, माजिद मेमन (राष्ट्रवादी) राज्यसभा सभासद,  डी. राजा (सीपीआय) राज्यसभा सभासद, केशव राव (टीआरएस) राज्यसभा सभासद, विवेक तनखा ( काँग्रेस) राज्यसभा सभासद आणि लोकसभा सभासद डॉ. संजू बलियान (भाजपा), कल्याण बॅनर्जी (टीआरएस), भगवंत मान (आप), बी. व्ही. नायर ( काँग्रेस), अॅडव्होकेट वर्मा (आरजेडी) यांचा समावेश होता. 

मुंबईतील आर्थर रोड जेलमधील बराक क्रमांक 12 चं स्वरुप बदलण्यासाठीचे काम गेल्या महिन्याभरापासून जोमाने सुरू आहे. बराकमधील फरश्या बदलण्यात आल्या आहेत, भिंतीवरील रंगकाम देखील पूर्ण झाले आहे आणि बाथरूमची दुरुस्ती करण्यात आली आहे. बँकांना तब्बल हजारो कोटी रुपयांचा चुना लाऊन परदेशात पसार झालेल्या मद्यसम्राट विजय माल्यासाठी हा सर्व खटाटोप सुरू आहे. दरम्यान, बराक क्रमांक 12 मध्ये यापूर्वी मुंबई 26/11 हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबला ठेवण्यात आले होते. त्यामुळे कसाबच्या बराकमध्ये मल्ल्याची रवानगी होणार यावर शिक्कामोर्तब आहे. तसेच नवी दिल्लीतून वेगाने सर्व हालचाली सुरु झाल्या असल्याचे चित्र आजच्या शिष्टमंडळाच्या कारागृह भेटीवरून स्पष्ट होत आहे. भारतीय कारागृहांची अवस्था अत्यंत वाईट असल्याचं सांगत विजय माल्यानं प्रत्यार्पणासाठी विरोध दर्शवला होता, यासाठी कारागृह प्रशासनाकडून एवढी जय्यत तयारी करण्यात येत असल्याचं बोललं जातं आहे. मल्ल्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यास  त्याला आर्थर रोड कारागृहात कसाबच्या बराकमध्ये ठेवण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, यापूर्वीही आर्थर रोड कारागृहाच्या सुरक्षिततेच्या संदर्भातील अहवाल भारताकडून लंडन कोर्टाला सादर करण्यात आला होता.    

तुरुंग प्रशासनाच्या अंतर्गत राज्यात ९ मध्यवर्ती, ३१ जिल्हा, १३ खुली कारागृहे आणि १७२ उपकारागृहे आहेत. परंतु अगदी किरकोळ गुन्ह्यापासून ते गंभीर गुन्ह्यातील अनेक टोळ्यांशी संबंधित असलेले गुन्हेगार आर्थर रोड तुरुंगात आहेत. त्यातच हे कारागृह भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत असल्याने महत्त्वाचे मानले जाते. 

विजय माल्याच्या 'जंगी स्वागता'साठी कायपण; आर्थर रोडच्या बराकीत टाइल्स, रंगकाम अन् कमोड

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArthur Road Jailआर्थररोड कारागृहdelhiदिल्ली