शहरं
Join us  
Trending Stories
1
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
2
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
3
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
4
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
5
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
6
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
7
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
8
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
9
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
10
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
11
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
12
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
13
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
14
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
15
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
16
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
17
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
18
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
19
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
20
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

बापरे! सासरी जाणाऱ्या नववधूला लागली तहान; पाणी आणण्यासाठी नवरदेव गेला अन् हैराण झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2021 22:36 IST

Crime News : लग्नानंतर राजू आपल्या पत्नीला सासरी घेऊन जात होता. ज्यावेळी तो बस स्टँडवर पोहोचला तेव्हा नवरीने आपल्याला तहान लागल्याचं सांगितलं. यानंतर राजू तिच्यासाठी पाणी आणण्यासाठी गेला.

नवी दिल्ली - देशात फसवणुकीच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानंतर सासरी जाणाऱ्या नवरीने नवरदेवालाच गंडा घातल्याची घटना घडली आहे. नववधूने रस्त्यातच तहान लागल्याच कारण देत नवरदेवाला चकवा देत पळ काढला आहे. खूप शोधल्यानंतरही तिचा पत्ताच लागला नाही आणि या फसवणुकाची हा प्रकार उघड झाला. पीडित तरूण आणि त्याच्या वडिलांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून पसार झालेल्या नववधूचा शोध घेत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील करहल चौकात राहणाऱ्या तरुणीने कस्बा मार्गावर राहणाऱ्या तरुणासोबत लग्न केलं होतं. तरुण लग्न करून नवरीला घरी घेऊन जाण्यासाठी बस स्टँडवर पोहोचला. त्यावेळी तरुणी त्याला फसवून कॅश, ज्वेलरी घेऊन बेपत्ता झाली. या घटनेनंतर नवरदेवाला मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी येथील एक व्यक्ती मुलीचं लग्नाचं स्थळ घेऊन आले होते. पीडित तरुणाचे वडील राजेंद्र यांनी लग्नासाठी परवानगी दिली. मात्र या लग्नात मुलीला 80 हजार रुपये द्यावे लागतील अशी अट घातली. दोघांनीही हे मान्य केलं. शहरातील करहल चौकाजवळ राहणाऱ्या एका महिलेने ठराविक रक्कम घेतल्यानंतर 17 ऑगस्ट रोजी तरुणीसोबत लग्न केलं. 

नवरी जोमात, नवरदेव कोमात! 

राजेंद्रने आपल्या सुनेला सोन्याचे दागिने दिले. लग्नानंतर सायंकाळी राजू आपल्या पत्नीला सासरी घेऊन जात होता. ज्यावेळी तो बस स्टँडवर पोहोचला तेव्हा नवरीने आपल्याला तहान लागल्याचं सांगितलं. यानंतर राजू तिच्यासाठी पाणी आणण्यासाठी गेला. परत येऊन पाहिलं तर नवरी गायब झाली होती. बराच शोध घेतल्यानंतरही तिचा शोध लागला नाही. यानंतर राजूचे वडील राजेंद्र यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. करहल रोड येथे राहणाऱ्या महिलेने धोका दिल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

भयंकर! प्रेमात धोका मिळाल्याने प्रेयसीने काटा काढला; साखरपुड्याच्या दिवशी प्रियकराचा गळा चिरला

प्रेमात धोका मिळाल्याने एका प्रेयसीने टोकाचं पाऊल उचललं आहे. थेट प्रियकराचाच काटा काढला आहे. प्रियकराचं लग्न ठरल्यामुळे नाराज झालेल्या महिलेने त्याची हत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून याचा अधिक तपास सुरू आहे. प्रेयसीने आपला भाऊ आणि त्याच्या दोन मित्रांच्या मदतीनं साखरपुड्याच्याच दिवशीच प्रियकराची गळा चिरून हत्या केली आहे. यानंतर महिलेने प्रियकराचा मृतदेह एका नाल्यात फेकून दिला होता. पण मृतदेह तरंगत बाहेर आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं आहे.  

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmarriageलग्नPoliceपोलिस