शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

बापरे! सासरी जाणाऱ्या नववधूला लागली तहान; पाणी आणण्यासाठी नवरदेव गेला अन् हैराण झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2021 22:36 IST

Crime News : लग्नानंतर राजू आपल्या पत्नीला सासरी घेऊन जात होता. ज्यावेळी तो बस स्टँडवर पोहोचला तेव्हा नवरीने आपल्याला तहान लागल्याचं सांगितलं. यानंतर राजू तिच्यासाठी पाणी आणण्यासाठी गेला.

नवी दिल्ली - देशात फसवणुकीच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानंतर सासरी जाणाऱ्या नवरीने नवरदेवालाच गंडा घातल्याची घटना घडली आहे. नववधूने रस्त्यातच तहान लागल्याच कारण देत नवरदेवाला चकवा देत पळ काढला आहे. खूप शोधल्यानंतरही तिचा पत्ताच लागला नाही आणि या फसवणुकाची हा प्रकार उघड झाला. पीडित तरूण आणि त्याच्या वडिलांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून पसार झालेल्या नववधूचा शोध घेत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील करहल चौकात राहणाऱ्या तरुणीने कस्बा मार्गावर राहणाऱ्या तरुणासोबत लग्न केलं होतं. तरुण लग्न करून नवरीला घरी घेऊन जाण्यासाठी बस स्टँडवर पोहोचला. त्यावेळी तरुणी त्याला फसवून कॅश, ज्वेलरी घेऊन बेपत्ता झाली. या घटनेनंतर नवरदेवाला मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी येथील एक व्यक्ती मुलीचं लग्नाचं स्थळ घेऊन आले होते. पीडित तरुणाचे वडील राजेंद्र यांनी लग्नासाठी परवानगी दिली. मात्र या लग्नात मुलीला 80 हजार रुपये द्यावे लागतील अशी अट घातली. दोघांनीही हे मान्य केलं. शहरातील करहल चौकाजवळ राहणाऱ्या एका महिलेने ठराविक रक्कम घेतल्यानंतर 17 ऑगस्ट रोजी तरुणीसोबत लग्न केलं. 

नवरी जोमात, नवरदेव कोमात! 

राजेंद्रने आपल्या सुनेला सोन्याचे दागिने दिले. लग्नानंतर सायंकाळी राजू आपल्या पत्नीला सासरी घेऊन जात होता. ज्यावेळी तो बस स्टँडवर पोहोचला तेव्हा नवरीने आपल्याला तहान लागल्याचं सांगितलं. यानंतर राजू तिच्यासाठी पाणी आणण्यासाठी गेला. परत येऊन पाहिलं तर नवरी गायब झाली होती. बराच शोध घेतल्यानंतरही तिचा शोध लागला नाही. यानंतर राजूचे वडील राजेंद्र यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. करहल रोड येथे राहणाऱ्या महिलेने धोका दिल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

भयंकर! प्रेमात धोका मिळाल्याने प्रेयसीने काटा काढला; साखरपुड्याच्या दिवशी प्रियकराचा गळा चिरला

प्रेमात धोका मिळाल्याने एका प्रेयसीने टोकाचं पाऊल उचललं आहे. थेट प्रियकराचाच काटा काढला आहे. प्रियकराचं लग्न ठरल्यामुळे नाराज झालेल्या महिलेने त्याची हत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून याचा अधिक तपास सुरू आहे. प्रेयसीने आपला भाऊ आणि त्याच्या दोन मित्रांच्या मदतीनं साखरपुड्याच्याच दिवशीच प्रियकराची गळा चिरून हत्या केली आहे. यानंतर महिलेने प्रियकराचा मृतदेह एका नाल्यात फेकून दिला होता. पण मृतदेह तरंगत बाहेर आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं आहे.  

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmarriageलग्नPoliceपोलिस