शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

आत्महत्येपूर्वी लिहिली भावाला Whats Appवर चिठ्ठी; पोलिसांच्या त्रासाला कंटाळून महिला पोलिसाने स्वतःला संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2021 17:46 IST

Suicide Case : रोजच्या मानसिक त्रासाला कंटाळून वसईतील माणिकपूर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई तरुणीची पुण्यात राहत्या घरी आत्महत्या

वसई : मिरा भाईंदर वसई विरारपोलिस आयुक्तांलय अंतर्गत वसई झोन -३ मधील तुलिंज पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या सततच्या जाचाला कंटाळून एका 26 वर्षीय महिला पोलीस शिपाई कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी पहाटे उघडकीस आला आहे. 

धक्कादायक म्हणजे संबंधित तरुणीने पुण्याच्या दौंड तालुक्यातील देलवडी स्थित आपल्या गावच्या राहत्या घरी गुरुवारी पहाटे गळफास लावून ही आत्महत्या केली. तुलिंज पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या  वाल्मिक गजानन आहिरे या पोलीस कर्मचाऱ्याच्या सततच्या  मानसिक त्रासाला कंटाळून या पोलीस तरुणीने आत्महत्या केल्याची माहिती आता समोर आल्यानं राज्यातील संपूर्ण पोलीस दलच हादरुन गेलं आहे.

दिपाली बापूराव कदम (२६) असे आत्महत्या केलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या संदर्भात तिच्या भावाने यवत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर आरोपी वाल्मिक आहिरे याच्यावर विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे संबंधित पोलिस तरुणीने आत्महत्येपूर्वी तिने आपल्या भावाला एक पोलीस कर्मचारी सातत्याने त्रास देत असल्याचे मेसेज केले होते. व आत्महत्ये पूर्वी चिठ्ठी देखील लिहिली होती अशी माहिती असून ,आता या घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

वाल्मिक आहिरे हा वसई विरार पोलीस आयुक्तालंय झोन ३ मधील तुलिंज  पोलीस ठाण्यात पोलीस नाईक म्हणून कार्यरत आहे.तर मृत दीपाली कदम ही वसईत माणिकपूर पोलीस ठाण्यात कार्यरत होती मात्र तीचे लग्न जमल्यानंतर ती दोन महिन्यांपासून सुट्टीवर होती असे माणिकपूर पोलिसांनी लोकमत ला सांगितलेदरम्यान दिपालीच्या भावाने यवत पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिल्यानुसार, आरोपी वाल्मिक आहिरे विरोधात भारतीय दंड संहिता कलम 306,504,506 अन्वये यवत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यामुळे आता यवत पोलीस व वसई विरार पोलीस आयुक्तांलय या आरोपीविरुद्ध कशाप्रकारे कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

आरोपी विवाहित, फोन करुन वारंवार दायचा द्यायचा त्रास

दीपाली ही माणिकपूर पोलीस स्टेशनमध्ये पोलिस शिपाई म्हणून कार्यरत होती. दीड ते दोन महिन्यापूर्वी तिचे लग्न भोसरी येथील तरुणाशी ठरले होते. दरम्यान आरोपी वाल्मिक गजानन आहिरे हा दिपालीला वारंवार फोन करून मानसिक त्रास देत होता.याखेरीज तिचे लग्न जमल्यानंतर ही सासरच्या मंडळींना आरोपी वाल्मिक आहिरे याने फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. धक्कादायक म्हणजे, आरोपी हा विवाहित होता. तरीही दीपालीला तो वारंवार त्रास देत होता. दीपालीच्या भावाने त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण, त्याने त्यालाही उडवून लावत दमबाजी करून जीवे मारण्याची धमकी दिली.

टॅग्स :PoliceपोलिसDeathमृत्यूVasai Virarवसई विरारPuneपुणेWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप