शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्येपूर्वी लिहिली भावाला Whats Appवर चिठ्ठी; पोलिसांच्या त्रासाला कंटाळून महिला पोलिसाने स्वतःला संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2021 17:46 IST

Suicide Case : रोजच्या मानसिक त्रासाला कंटाळून वसईतील माणिकपूर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई तरुणीची पुण्यात राहत्या घरी आत्महत्या

वसई : मिरा भाईंदर वसई विरारपोलिस आयुक्तांलय अंतर्गत वसई झोन -३ मधील तुलिंज पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या सततच्या जाचाला कंटाळून एका 26 वर्षीय महिला पोलीस शिपाई कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी पहाटे उघडकीस आला आहे. 

धक्कादायक म्हणजे संबंधित तरुणीने पुण्याच्या दौंड तालुक्यातील देलवडी स्थित आपल्या गावच्या राहत्या घरी गुरुवारी पहाटे गळफास लावून ही आत्महत्या केली. तुलिंज पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या  वाल्मिक गजानन आहिरे या पोलीस कर्मचाऱ्याच्या सततच्या  मानसिक त्रासाला कंटाळून या पोलीस तरुणीने आत्महत्या केल्याची माहिती आता समोर आल्यानं राज्यातील संपूर्ण पोलीस दलच हादरुन गेलं आहे.

दिपाली बापूराव कदम (२६) असे आत्महत्या केलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या संदर्भात तिच्या भावाने यवत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर आरोपी वाल्मिक आहिरे याच्यावर विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे संबंधित पोलिस तरुणीने आत्महत्येपूर्वी तिने आपल्या भावाला एक पोलीस कर्मचारी सातत्याने त्रास देत असल्याचे मेसेज केले होते. व आत्महत्ये पूर्वी चिठ्ठी देखील लिहिली होती अशी माहिती असून ,आता या घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

वाल्मिक आहिरे हा वसई विरार पोलीस आयुक्तालंय झोन ३ मधील तुलिंज  पोलीस ठाण्यात पोलीस नाईक म्हणून कार्यरत आहे.तर मृत दीपाली कदम ही वसईत माणिकपूर पोलीस ठाण्यात कार्यरत होती मात्र तीचे लग्न जमल्यानंतर ती दोन महिन्यांपासून सुट्टीवर होती असे माणिकपूर पोलिसांनी लोकमत ला सांगितलेदरम्यान दिपालीच्या भावाने यवत पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिल्यानुसार, आरोपी वाल्मिक आहिरे विरोधात भारतीय दंड संहिता कलम 306,504,506 अन्वये यवत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यामुळे आता यवत पोलीस व वसई विरार पोलीस आयुक्तांलय या आरोपीविरुद्ध कशाप्रकारे कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

आरोपी विवाहित, फोन करुन वारंवार दायचा द्यायचा त्रास

दीपाली ही माणिकपूर पोलीस स्टेशनमध्ये पोलिस शिपाई म्हणून कार्यरत होती. दीड ते दोन महिन्यापूर्वी तिचे लग्न भोसरी येथील तरुणाशी ठरले होते. दरम्यान आरोपी वाल्मिक गजानन आहिरे हा दिपालीला वारंवार फोन करून मानसिक त्रास देत होता.याखेरीज तिचे लग्न जमल्यानंतर ही सासरच्या मंडळींना आरोपी वाल्मिक आहिरे याने फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. धक्कादायक म्हणजे, आरोपी हा विवाहित होता. तरीही दीपालीला तो वारंवार त्रास देत होता. दीपालीच्या भावाने त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण, त्याने त्यालाही उडवून लावत दमबाजी करून जीवे मारण्याची धमकी दिली.

टॅग्स :PoliceपोलिसDeathमृत्यूVasai Virarवसई विरारPuneपुणेWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप