शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

अपहरण, हत्याकांडामुळे पोलिसांचा नेभळटपणा उघड; गुन्हेगारांना पूरक भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 21:38 IST

हे दोन्ही गुन्हे अजनी पोलीस ठाण्यात दाखल आहेत. पोलिसांनी यावेळी जुजबी कारवाई करून प्रकरण मिटवले. त्यामुळे त्या प्रकरणातील आरोपी  सनी आणि साथीदार  मोकाट राहिले.

नरेश डोंगरे

नागपूर : सनी जागींड अपहरण आणि हत्या प्रकरणामुळे नागपुरातील गुन्हेगारी टोळ्यांमधील आपसी वैमनस्य आणि पोलिस ठाण्यातील  अधिकार्‍यांचा हलगर्जीपणा उघड झाला आहे. गुन्हेगारी टोळ्यांमध्ये धुसफूस सुरू असताना पोलीस कशी नेभळट भूमिका वठवीत आहे, तेसुद्धा उघड झाले असून या थरारकांडामुळे अजनी पोलीस आरोपीच्या पिंजऱ्यात अडकले आहे.

या प्रकरणाच्या निमित्ताने  गुन्हेगारी वर्तुळात सुरु असलेल्या चर्चेनुसार, फेब्रुवारी २०२० मध्ये आरोपी ललित रेवतकर याच्यावर सनी जांगिड आणि साथीदारांनी कुर्‍हाडीने हल्ला केला होता.  त्यानंतर २० मे रोजी आरोपी स्मारक जाधव आणि  त्याचा भाऊ सुदर्शन जाधव या दोघांवर सनी जांगिड आणि साथीदारांनी प्राणघातक हल्ला चढवला होता.

हे दोन्ही गुन्हे अजनी पोलीस ठाण्यात दाखल आहेत. पोलिसांनी यावेळी जुजबी कारवाई करून प्रकरण मिटवले. त्यामुळे त्या प्रकरणातील आरोपी  सनी आणि साथीदार  मोकाट राहिले. त्याचमुळे  जाधव, रेवतकर आणि त्याच्या साथीदारांनी  सनीच्या  अपहरण आणि हत्येचा कट रचला अन हा गुन्हा घडला. अजनी पोलिसांनी उपरोक्त दोन्ही गुन्ह्यातील गुन्हेगारांवर कडक कारवाई करून त्यांना कारागृहात डांबले असते  तर हा भयंकर गुन्हा टळला असता. अजनी पोलिसानी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार न पाडता गुन्हेगारांना पूरक भूमिका घेतली. त्याचमुळे हे घडले. म्हणून या अपहरण आणि हत्याकांडाला अजनी पोलिसही जबाबदार असल्याची जोरदार चर्चा आहे.

कुठे आहे पोलिसांचे लक्ष

 एका मोपेडवर भर दुपारी तिघे गुन्हेगार प्रतिस्पर्धी गुन्हेगाराला करकचून पकडून बसवतात. त्याचे अपहरण करून पाच ते सात किलोमीटर दूर भरवस्तीतून चौबल सीट नेले जाते. त्यांच्याकडे कोणत्याच पोलिसाचे लक्ष कसे जात नाही, हा कळीचा मुद्दा आहे.

आठ तास छळ, पाच लाखांसाठी फिरवले

आरोपी मोनू रायडर, ललित रेवतकर आणि आकाश शेवारे यांनी सनी जागींडचे शनिवारी दुपारी २.३० ला अपहरण केले. त्याला हुडकेश्वरच्या जंगलात नेऊन तासभर मारहाण केली. जागोजागी चटके दिले. सनी सोडून देण्यासाठी गयावया करीत होता. आरोपींनी त्याला ५ लाख देशील तर सोडून देऊ, असे म्हटले. सनीने तयारी दाखविताच आरोपींनी त्याला नागपूरात आणले. उमरेड मार्गाने इकडे तिकडे फिरवले. सनीने एका ठिकाणी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आरोपींनी त्याला पुन्हा जंगलात नेले आणि रात्री ११ च्या सुमारास त्याची हत्या केल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितल्याचे समजते.

वरिष्ठांचे आदेश धाब्यावर

या गुन्ह्यामुळे अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या आहेत.आपल्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांवर, त्यांच्या हालचालीवर सूक्ष्म नजर ठेवा. आणि त्यांच्या गुन्हेगारी कारवाया नियंत्रित करा, असे आदेश वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून प्रत्येक पोलिस अधिकाऱ्याला वारंवार दिले जातात. पोलीस ठाण्यातील अधिकारी वरिष्ठांच्या आदेशवजा सूचना फारशी गांभीर्याने घेत नसल्याचेही या गुन्ह्यातून स्पष्ट झाले आहे.

कसला हिशेब चालतो दिवसभर?

गुन्हेगार मोकाट फिरून अपहरण हत्या सारखे गंभीर गुन्हे करत असताना पोलिस ठाण्यातील अधिकारी दिवसभर कोणता हिशेब तपासण्यात व्यस्त असतात, असा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे. पदावरील काही मंडळी प्रीती, मोह, मायात गुंतल्याने सैरभैर झाली आहे. त्यामुळे गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी आणि बेजबाबदार अधिकाऱ्यांना दुरुस्त करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतात, त्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी