शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

करण परोपटे हत्याकांड : पोलिसांच्या चुकीमुळे कुख्यात आरोपींना जामीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 16:54 IST

Crime News : नव्वद दिवस उलटूनही दोषारोपपत्र सादर केलेच नाही

ठळक मुद्दे. न्यायालयात दोषारोपपत्र नव्वद दिवसात सादर झाले नाही. त्यामुळे न्यायालयाने सहा कुख्यात आरोपींना जामीन मंजूर केला.आरोपींच्या वकिलांनी दमदार युक्तिवाद केला यामुळे न्यायालयाने आरोपींना जामीन मंजूर केला.

यवतमाळ: यवतमाळातील स्टेट बँक चौक परिसरात कुख्यात अक्षय राठोड टोळीने त्याचा जावई करण परोपटे यांची गोळ्या झाडून हत्या केली. सायंकाळी वर्दळीच्या वेळेस हे हत्याकांड घडले. यात पोलिसांनी दहा जणांना अटक केली मात्र नंतर गुन्ह्याचा तपास वेळेत केला नाही. न्यायालयात दोषारोपपत्र नव्वद दिवसात सादर झाले नाही. त्यामुळे न्यायालयाने सहा कुख्यात आरोपींना जामीन मंजूर केला.

अक्षय राठोड टोळीने बाभुळगाव तालुक्यातील वर्धा नदी काठावर रेतीचे साम्राज्य उभे केले. वर्चस्वाच्या लढाईतून अक्षय राठोड याने स्वतःच्याच बहीण जावयाचा खून घडवून आणला मोक्का अंतर्गत अक्षय राठोड औरंगाबाद कारागृहात असताना त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने करण परोपटे याची हत्या घडवून आणली अशी तक्रार करणची पत्नी तथा अक्षय राठोडच्या बहिणीने पोलिसात दिली. त्यावरून पोलिसांनी दहा आरोपींना अटक केली. अक्षय टोळीचा कायमचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न पोलिसांनी सुरू केला. यवतमाळच्या तत्कालीन उपविभागीय अधिकारी माधुरी बाविस्कर यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास देण्यात आला. दरम्यान अक्षय गॅंग विरोधात मोक्काचा प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली. मात्र या गडबडीत ९० दिवसाच्या आत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यास पोलीस विसरले याचाच फायदा कुख्यात आरोपींना मिळाला. आरोपींनी ९० दिवसाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर २३ जून ते २३ सप्टेंबरपर्यंत कुठली हालचाल केली नाही. मात्र नंतर थेट अतिरिक्त सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला. आरोपींच्या वकिलांनी दमदार युक्तिवाद केला यामुळे न्यायालयाने आरोपींना जामीन मंजूर केला.

पोलीस आरोपींविरोधात मोक्काची प्रक्रिया करत असताना न्यायालयाकडे रीतसर अर्ज करून दोषारोपपत्र सादर करण्यासाठी मुदत वाढवून मागणे अपेक्षित होते. मात्र ही प्रक्रिया नियमानुसार झालीच नाही. नेमके याच चुकीचा फायदा आरोपींना मिळाला त्यांना तीन महिने पूर्ण होताच गंभीर गुन्ह्यात जामीन मंजूर झाला. सर्वांसमक्ष हे हत्याकांड घडले शिवाय गोळीबारात एक हॉटेल व्यवसायिक ही जखमी झाला होता. भक्कम पुरावे हातात असताना पोलिसांच्या चुकीमुळे आशिष उर्फ बगीरा रमेश दांडेकर, शुभम हरिप्रसाद बघेल, दिनेश उर्फ अमित मधुकर तूर्काने, धिरज उर्फ बँड सुनील मैद, ऋषिकेश उर्फ रघु दिवाकर रोकडे, प्रवीण उर्फ पिके कवडू केराम हे आरोपी कारागृहाबाहेर आले आहेत. गंभीर बाब म्हणजे मोक्का अंतर्गत औरंगाबाद कारागृहात असलेला मास्टर माईंड अक्षय राठोड यालासुद्धा प्रोडूस वारंटवर पोलिसांनी करण हत्याकांडात चौकशीसाठी ताब्यात घेतले नाही. या प्रकरणात पोलिसांच्या अनेक चुका होत गेल्या यामुळेच गंभीर गुन्हे शिरावर असलेले आरोपी कारागृहाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला.

टॅग्स :ArrestअटकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसYavatmalयवतमाळDeathमृत्यूCourtन्यायालय