शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

करमुसे मारहाण प्रकरण: गृहमंत्र्यांकडून जितेंद्र आव्हाड यांना वाचविण्याचा प्रयत्न, किरीट सोमय्यांनी केला आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2020 17:44 IST

Karamuse assault case : ‘त्या’ तीन पोलीस शिपायांच्या निलंबनाची मागणी

ठळक मुद्दे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून आव्हाड यांना वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी केला.

ठाणे : ठाण्यातील इंजिनिअर अनंत करमुसे यांच्या मारहाण प्रकरणात गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात यावी. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून आव्हाड यांना वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी केला.

गृहनिर्माणमंत्री आव्हाड यांच्या ठाण्यातील ‘नाथ’ बंगल्यावर करमुसे या अभियंत्याला 10 ते 15 जणांनी जबर मारहाण केली होती. याच प्रकरणात आधी आव्हाड यांच्या काही कार्यकत्र्याना अटकही झाली होती. त्यापाठोपाठ सहा महिन्यांनी यामध्ये आणखी तीन पोलिसांवर अटकेची कारवाई झाली. त्या तिघांचीही जामीनावर सुटका झाली आहे. दरम्यान, यातील मुख्य सूत्रधारावर कारवाई करावी. तसेच या प्रकरणात अटक केलेल्या तीन पोलिसांवर  निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे शुक्रवारी सोमय्या यांच्यासह ठाणो शहर अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे आणि नगरसेवक मनोहर डुंबरे यांच्या शिष्टमंडळाने केली.

आव्हाड यांच्या निवासस्थानी करमुसे यांना 5 एप्रिल रोजी मारहाण झाली होती. मंत्र्याच्या सुरक्षा व्यवस्थेतील तीन पोलीस कर्मचा:यांनीच  करमुसे यांना घरातून नेले होते. सहा महिन्यांनी या तीन पोलिसांना वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे. अद्यापी, या प्रकरणाच्या मुख्य सुत्रधारावर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. तसेच त्याची चौकशीही केलेली नाही. या पाश्र्वभूमीवर भाजपाने पोलीस आयुक्तांना हे निवेदन दिले. या प्रकरणात अटक झालेल्या पोलिसांच्या चौकशीत कोणत्या बाबी उघड झाल्या?  करमुसे यांना घरातून आणण्यासंदर्भात संबंधित त्यांना कोणी आदेश दिला होता? फिर्यादीत, एका मंत्र्यासमोर मारहाण झाल्याचा उल्लेख आहे. या संदर्भात गेल्या सहा महिन्यांच्या काळात पोलिसांनी कोणता तपास केला? त्याचबरोबर अटक केलेल्या तीन  पोलिस शिपायांविरोधात निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी भाजपाने केली आहे.मंत्री अनिल परब यांनी मध्यमवर्गीयांसाठी राखीव असलेल्या म्हाडाच्या भूखंडावर कब्जा केला आहे. तर सोशल मिडियावर मत व्यक्त करणा:याचे आव्हाड यांनी अपहरण केले. या दोघांवरही कारवाईची भाजपची मागणी असल्याचेही सोमय्या म्हणाले.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडAnil Deshmukhअनिल देशमुखthaneठाणेPoliceपोलिसcommissionerआयुक्त