शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

करमुसे मारहाण प्रकरण: गृहमंत्र्यांकडून जितेंद्र आव्हाड यांना वाचविण्याचा प्रयत्न, किरीट सोमय्यांनी केला आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2020 17:44 IST

Karamuse assault case : ‘त्या’ तीन पोलीस शिपायांच्या निलंबनाची मागणी

ठळक मुद्दे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून आव्हाड यांना वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी केला.

ठाणे : ठाण्यातील इंजिनिअर अनंत करमुसे यांच्या मारहाण प्रकरणात गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात यावी. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून आव्हाड यांना वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी केला.

गृहनिर्माणमंत्री आव्हाड यांच्या ठाण्यातील ‘नाथ’ बंगल्यावर करमुसे या अभियंत्याला 10 ते 15 जणांनी जबर मारहाण केली होती. याच प्रकरणात आधी आव्हाड यांच्या काही कार्यकत्र्याना अटकही झाली होती. त्यापाठोपाठ सहा महिन्यांनी यामध्ये आणखी तीन पोलिसांवर अटकेची कारवाई झाली. त्या तिघांचीही जामीनावर सुटका झाली आहे. दरम्यान, यातील मुख्य सूत्रधारावर कारवाई करावी. तसेच या प्रकरणात अटक केलेल्या तीन पोलिसांवर  निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे शुक्रवारी सोमय्या यांच्यासह ठाणो शहर अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे आणि नगरसेवक मनोहर डुंबरे यांच्या शिष्टमंडळाने केली.

आव्हाड यांच्या निवासस्थानी करमुसे यांना 5 एप्रिल रोजी मारहाण झाली होती. मंत्र्याच्या सुरक्षा व्यवस्थेतील तीन पोलीस कर्मचा:यांनीच  करमुसे यांना घरातून नेले होते. सहा महिन्यांनी या तीन पोलिसांना वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे. अद्यापी, या प्रकरणाच्या मुख्य सुत्रधारावर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. तसेच त्याची चौकशीही केलेली नाही. या पाश्र्वभूमीवर भाजपाने पोलीस आयुक्तांना हे निवेदन दिले. या प्रकरणात अटक झालेल्या पोलिसांच्या चौकशीत कोणत्या बाबी उघड झाल्या?  करमुसे यांना घरातून आणण्यासंदर्भात संबंधित त्यांना कोणी आदेश दिला होता? फिर्यादीत, एका मंत्र्यासमोर मारहाण झाल्याचा उल्लेख आहे. या संदर्भात गेल्या सहा महिन्यांच्या काळात पोलिसांनी कोणता तपास केला? त्याचबरोबर अटक केलेल्या तीन  पोलिस शिपायांविरोधात निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी भाजपाने केली आहे.मंत्री अनिल परब यांनी मध्यमवर्गीयांसाठी राखीव असलेल्या म्हाडाच्या भूखंडावर कब्जा केला आहे. तर सोशल मिडियावर मत व्यक्त करणा:याचे आव्हाड यांनी अपहरण केले. या दोघांवरही कारवाईची भाजपची मागणी असल्याचेही सोमय्या म्हणाले.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडAnil Deshmukhअनिल देशमुखthaneठाणेPoliceपोलिसcommissionerआयुक्त