शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
2
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
3
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
4
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
5
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
6
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
7
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
8
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
9
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
10
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
11
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
12
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
13
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा
14
विजेच्या धक्क्याने तडफडत होता मुलगा, लोकांची जवळ जाण्याची होत नव्हती हिंमत, तेवढ्यात एक तरुण धावला आणि...  
15
१० हजारांच्या आत AI, ५जी फोन; सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा पण चकीत केले; कसा आहे A95?
16
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
17
इकडून सोने टाका अन् तिकडून पैसे काढा.. सोने खरेदी-विक्रीसाठी बाजारात आलंय ATM
18
शर्मिष्ठा राऊतच्या घरी पाळणा हलला! लग्नानंतर ४ वर्षांनी अभिनेत्री झाली आई, थाटामाटात केलं बारसं
19
भारतीय संशोधकांनी लावलेल्या शोधाचा चीनने घेतला लाभ, अमेरिका, रशियाही अवाक्, भारताने संधी दवडली  
20
दुर्दैवी! टॅम्पोचा अपघात; मदत करण्याऐवजी तेल लुटण्यासाठी उडाली झुंबड, क्लिनरचा जागीच मृत्यू

जालना: मोबाईल खराब केला... सातवी शिकणाऱ्या मुलाने महिलेची दगडाने केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 13:03 IST

वापरायला दिलेला मोबाईल पाण्यात पाडला आणि खराब झाला. त्यामुळे चिडलेल्या मुलाने चक्क महिलेची दगडानेच हत्या केली. 

Maharashtra Crime: हादरवून टाकणारी एक घटना जालना जिल्ह्यात घडली आहे. सातवीत शिकणाऱ्या एका मुलाने एका महिलेची डोक्यात दगडाने हल्ला करून हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्याने हत्या केल्याची कबुली दिली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात ही घटना घडली आहे. टेंभी अंतरवाली गावातील मीराबाई बोंढारे या महिलेने शेतातच शेजारी राहणाऱ्या मुलाकडून मोबाईल घेतला. कॉल करण्यासाठी महिलेने मोबाईल घेतला होता. 

वाचा >>"साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा"; ढसाढसा रडत पतीची पोलिसांत धाव

महिलेकडून चुकीने मोबाईल पाण्यात पडला आणि खराब झाला. महिलेने पाण्यात पाडून मोबाईल खराब केल्याचा मुलाला राग आला. १३ वर्षाच्या मुलाने रागाच्या भरात मीराबाई यांच्या डोक्यात दगड घातला आणि हत्या केली. 

हत्या केल्याचे कसे आले उघडकीस?

२५ मार्च रोजी ही घटना घडली होती. हत्या झाल्याचे समोर आले. पण, हत्या कोणी केली आणि का केली? याबद्दल कोणतीही माहिती प्राथमिक तपासात कळली नाही. 

त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी संबंधित मुलालाही ताब्यात घेऊन चौकशी केली. पोलिसांना घाबरून त्याने महिलेची हत्या केल्याची कबुली दिली. मोबाईल खराब केल्याच्या रागातून हत्या केल्याचेही त्याने सांगितले. 

पोलिसांनी या मुलाला बालसुधारगृहात पाठवले असून, ही घटना समोर आल्यानंतर पंचक्रोशीतील गावांमध्ये खळबळ उडाली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalna Policeजालना पोलीसDeathमृत्यूPoliceपोलिस