शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

अर्णब गोस्वामींसह अन्य आरोपींविरोधात वॉरंट काढा; सरकारी वकिलांचा अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2021 06:08 IST

Anvay naik Case:  पुढील सुनावणी ६ फेब्रुवारी रोजी. रायगड पोलिसांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अलिबाग येथील न्यायालयात ४ डिसेंबर रोजी दोषारोप पत्र दाखल केले होते. या प्रकरणात अर्णब गोस्वामी, फिरोज शेख, नितेश सारडा या तिघांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायधीशांनी दिले होते. मात्र तीनही आरोपी न्यायालयात हजर राहिले नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्क रायगड : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाच्या खटल्याची सुनावणी अलिबागच्या न्यायालयात गुरुवारपासून सुरू झाली आहे. सुनावणीला हजर राहण्याचे आदेश असतानाही आरोपी अर्णब गोस्वामीसह फिरोज शेख आणि नितेश सारडा हे न्यायालयात उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे त्यांच्या विरोधात अटक वॉरंट काढावे, अशी विनंती न्यायालयाला केली असल्याची माहिती जिल्हा सरकारी वकील भूषण साळवी यांनी ‘लोकमत’ला दिली. 

गोस्वामी यांना न्यायालयात हजर राहावेच लागणार आहे, असेही साळवी यांनी स्पष्ट केले. या प्रकरणी आता ६ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. रायगड पोलिसांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अलिबाग येथील न्यायालयात ४ डिसेंबर रोजी दोषारोप पत्र दाखल केले होते. या प्रकरणात अर्णब गोस्वामी, फिरोज शेख, नितेश सारडा या तिघांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायधीशांनी दिले होते. मात्र तीनही आरोपी न्यायालयात हजर राहिले नाहीत. अर्णब गोस्वामी हे दिल्ली येथे आहेत. कोरोना नियमांमुळे ते न्यायालयात हजर राहू शकले नाहीत, असे आरोपींच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. त्यानुसार न्यायालयाने ही विनंती मान्य केली. 

वकीलपत्रावर आरोपींच्या सह्याच नाहीत अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात दोषरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी आरोपींनी न्यायालयात उपस्थित राहणे गरजेचे होते. आरोपींच्या वकिलांनी दाखल केलेल्या वकीलपत्रावर आरोपीची सही नाही. आरोपी वकिलाच्या अर्जावर आम्ही हरकत घेऊ याची कल्पना वकिलांना नव्हती. त्यामुळे आरोपींविरोधात अटक वॉरंट काढा, असा अर्ज केला आहे.

टॅग्स :arnab goswamiअर्णब गोस्वामीAnvay Naikअन्वय नाईकCourtन्यायालय